शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

मतदार व आधार जोडून मतदार याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:09 IST

लोकसभा निवडणुकीनंतरच्या फक्त ५ महिन्यात वाढलेल्या ४० लाख मतदारांचा मुद्दा काँग्रेसने पुढे केला होता

पुणे : निवडणूक आयोग आता मतदार कार्ड व आधार कार्ड जोडणी (लिंक) करणार आहे. यातील तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी पावले उचलत असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. त्यावरून काँग्रेसनेमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीनंतरच्या फक्त ५ महिन्यात वाढलेल्या ४० लाख मतदारांचा मुद्दा पुढे केला असून आयोगाचा निर्णय आमच्या शंकांना, आरोपाला पुष्टी देणाराच आहे असे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत त्याआधी फक्त ५ महिने आधीच झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा तब्बल ४० लाख मतदार वाढले. मागील ५ वर्षातही राज्यात इतके मतदार वाढले नव्हते. त्यामुळे या वाढलेल्या मतदारसंख्येविषयी काँग्रेसने संशय व्यक्त केला होता. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत तर पक्षाने निवडणूक आयोगाला याविषयी खुलासा करण्याची मागणी केली होती. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच काँग्रेसने आपले आरोप लावून धरले होते, त्याचबरोबर राज्यातील ३० विधानसभा मतदारसंघांमधील मतदारांची मतदार यादीनिहाय तपासणी करण्यासाठी मोहीम सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदार कार्ड व आधार कार्ड एकमेकांशी लिंक करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयानेच याबाबत आयोगाला निर्देश दिले होते, मात्र त्यानुसार लवकर कार्यवाही होत नव्हती. आता आयोग याबाबतीत लवकरच तज्ज्ञ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या निर्णयाची अंमलजबजावणी करणार आहे. काँग्रेसने यावरून, आम्ही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत ज्या शंका व्यक्त केल्या आहेत त्या खऱ्याच असल्याचे यावरून दिसत असल्याचे म्हटले आहे. पक्षाने मतदार याद्यांबाबत संशय व्यक्त केला होता. आता आधार कार्ड जोडणी करून या याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

पक्षाच्या केंद्रीय समितीने म्हटले आहे की, मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या आयोगाच्या प्रत्येक प्रयत्नाला पक्षाची साथ आहे, मात्र आता झालेल्या किंवा वाटत असलेल्या संशयास्पद प्रकारांचे काय?, या प्रश्नाचे उत्तर आयोग देत नाही. आधार व मतदार कार्ड यांची जोडणी करणे याचे स्वागतच आहे, मात्र आयोगाचा हा निर्णय विनाचर्चा करण्यात आला. याबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर आयोगाने चर्चा करणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की, लोकशाही राज्यव्यवस्थेत मतदार यादी मूलभूत आहे व निवडणूक प्रक्रियेचे स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे. आयोगाच्या हा मतदार कार्ड व आधार कार्ड जोडणी करण्याचा निर्णय प्रत्यक्षात आल्यानंतर जोडणी झालेली नाही. म्हणून कोणत्याही भारतीय प्रौढ नागरिकाला किंवा मतदानाला पात्र असलेल्या कोणालाही मतदानाचा अधिकार नाकारला जाऊ नये अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसSocialसामाजिकAdhar Cardआधार कार्डElectionनिवडणूक 2024Maharashtraमहाराष्ट्र