शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मतदार व आधार जोडून मतदार याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:09 IST

लोकसभा निवडणुकीनंतरच्या फक्त ५ महिन्यात वाढलेल्या ४० लाख मतदारांचा मुद्दा काँग्रेसने पुढे केला होता

पुणे : निवडणूक आयोग आता मतदार कार्ड व आधार कार्ड जोडणी (लिंक) करणार आहे. यातील तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी पावले उचलत असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. त्यावरून काँग्रेसनेमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीनंतरच्या फक्त ५ महिन्यात वाढलेल्या ४० लाख मतदारांचा मुद्दा पुढे केला असून आयोगाचा निर्णय आमच्या शंकांना, आरोपाला पुष्टी देणाराच आहे असे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत त्याआधी फक्त ५ महिने आधीच झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा तब्बल ४० लाख मतदार वाढले. मागील ५ वर्षातही राज्यात इतके मतदार वाढले नव्हते. त्यामुळे या वाढलेल्या मतदारसंख्येविषयी काँग्रेसने संशय व्यक्त केला होता. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत तर पक्षाने निवडणूक आयोगाला याविषयी खुलासा करण्याची मागणी केली होती. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच काँग्रेसने आपले आरोप लावून धरले होते, त्याचबरोबर राज्यातील ३० विधानसभा मतदारसंघांमधील मतदारांची मतदार यादीनिहाय तपासणी करण्यासाठी मोहीम सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदार कार्ड व आधार कार्ड एकमेकांशी लिंक करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयानेच याबाबत आयोगाला निर्देश दिले होते, मात्र त्यानुसार लवकर कार्यवाही होत नव्हती. आता आयोग याबाबतीत लवकरच तज्ज्ञ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या निर्णयाची अंमलजबजावणी करणार आहे. काँग्रेसने यावरून, आम्ही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत ज्या शंका व्यक्त केल्या आहेत त्या खऱ्याच असल्याचे यावरून दिसत असल्याचे म्हटले आहे. पक्षाने मतदार याद्यांबाबत संशय व्यक्त केला होता. आता आधार कार्ड जोडणी करून या याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

पक्षाच्या केंद्रीय समितीने म्हटले आहे की, मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या आयोगाच्या प्रत्येक प्रयत्नाला पक्षाची साथ आहे, मात्र आता झालेल्या किंवा वाटत असलेल्या संशयास्पद प्रकारांचे काय?, या प्रश्नाचे उत्तर आयोग देत नाही. आधार व मतदार कार्ड यांची जोडणी करणे याचे स्वागतच आहे, मात्र आयोगाचा हा निर्णय विनाचर्चा करण्यात आला. याबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर आयोगाने चर्चा करणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की, लोकशाही राज्यव्यवस्थेत मतदार यादी मूलभूत आहे व निवडणूक प्रक्रियेचे स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे. आयोगाच्या हा मतदार कार्ड व आधार कार्ड जोडणी करण्याचा निर्णय प्रत्यक्षात आल्यानंतर जोडणी झालेली नाही. म्हणून कोणत्याही भारतीय प्रौढ नागरिकाला किंवा मतदानाला पात्र असलेल्या कोणालाही मतदानाचा अधिकार नाकारला जाऊ नये अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसSocialसामाजिकAdhar Cardआधार कार्डElectionनिवडणूक 2024Maharashtraमहाराष्ट्र