शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

मतदार व आधार जोडून मतदार याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:09 IST

लोकसभा निवडणुकीनंतरच्या फक्त ५ महिन्यात वाढलेल्या ४० लाख मतदारांचा मुद्दा काँग्रेसने पुढे केला होता

पुणे : निवडणूक आयोग आता मतदार कार्ड व आधार कार्ड जोडणी (लिंक) करणार आहे. यातील तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी पावले उचलत असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. त्यावरून काँग्रेसनेमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीनंतरच्या फक्त ५ महिन्यात वाढलेल्या ४० लाख मतदारांचा मुद्दा पुढे केला असून आयोगाचा निर्णय आमच्या शंकांना, आरोपाला पुष्टी देणाराच आहे असे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत त्याआधी फक्त ५ महिने आधीच झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा तब्बल ४० लाख मतदार वाढले. मागील ५ वर्षातही राज्यात इतके मतदार वाढले नव्हते. त्यामुळे या वाढलेल्या मतदारसंख्येविषयी काँग्रेसने संशय व्यक्त केला होता. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत तर पक्षाने निवडणूक आयोगाला याविषयी खुलासा करण्याची मागणी केली होती. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच काँग्रेसने आपले आरोप लावून धरले होते, त्याचबरोबर राज्यातील ३० विधानसभा मतदारसंघांमधील मतदारांची मतदार यादीनिहाय तपासणी करण्यासाठी मोहीम सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदार कार्ड व आधार कार्ड एकमेकांशी लिंक करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयानेच याबाबत आयोगाला निर्देश दिले होते, मात्र त्यानुसार लवकर कार्यवाही होत नव्हती. आता आयोग याबाबतीत लवकरच तज्ज्ञ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या निर्णयाची अंमलजबजावणी करणार आहे. काँग्रेसने यावरून, आम्ही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत ज्या शंका व्यक्त केल्या आहेत त्या खऱ्याच असल्याचे यावरून दिसत असल्याचे म्हटले आहे. पक्षाने मतदार याद्यांबाबत संशय व्यक्त केला होता. आता आधार कार्ड जोडणी करून या याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

पक्षाच्या केंद्रीय समितीने म्हटले आहे की, मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या आयोगाच्या प्रत्येक प्रयत्नाला पक्षाची साथ आहे, मात्र आता झालेल्या किंवा वाटत असलेल्या संशयास्पद प्रकारांचे काय?, या प्रश्नाचे उत्तर आयोग देत नाही. आधार व मतदार कार्ड यांची जोडणी करणे याचे स्वागतच आहे, मात्र आयोगाचा हा निर्णय विनाचर्चा करण्यात आला. याबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर आयोगाने चर्चा करणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की, लोकशाही राज्यव्यवस्थेत मतदार यादी मूलभूत आहे व निवडणूक प्रक्रियेचे स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे. आयोगाच्या हा मतदार कार्ड व आधार कार्ड जोडणी करण्याचा निर्णय प्रत्यक्षात आल्यानंतर जोडणी झालेली नाही. म्हणून कोणत्याही भारतीय प्रौढ नागरिकाला किंवा मतदानाला पात्र असलेल्या कोणालाही मतदानाचा अधिकार नाकारला जाऊ नये अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसSocialसामाजिकAdhar Cardआधार कार्डElectionनिवडणूक 2024Maharashtraमहाराष्ट्र