शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी एकत्र यावे : मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 4:38 PM

शिक्षण, विज्ञान आणि संशोधन यांच्या समन्वयातून विद्यार्थी निर्माण करावयाचे आहेत.

ठळक मुद्देएमआयटीत छात्र संसदेचा घंटानाद 

पुणे: ‘वाढत जाणाऱ्या दहशतवादी घटनांना थोपविण्यासाठी जगातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन त्याचा नायनाट करावा लागेल. तरच जगातील सर्व नागरिक सुखी व समाधानी होतील. वसुधैव कुटुंबकमची शिकवण देणारा भारत हा संपूर्ण विश्व आपले मानतो.’असे प्रतिपादन केंद्र्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केले.भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या वतीने विज्ञान भवन नवी दिल्ली येथे २० ते २३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत १० व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या करीता कोथरूड येथील एमआयटी कॅम्पसवर लोकशाहीचा घंटानाद डॉ. निशंक यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.यावेळी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड,कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू प्रा.डॉ.एन.टी.राव, प्र-कुलगुरू प्रा.डी.पी. आपटे व भारतीय छात्र संसदेचा राष्ट्रीय समन्वयक विराज कवाडिया, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्टुडंट कौन्सिलचा अध्यक्ष अविनाश टेंबे व जनरल सक्रेटरी हिमांशू चौधरी उपस्थित होते.शिक्षण, विज्ञान आणि संशोधन यांच्या समन्वयातून शिक्षण देऊन असे विद्यार्थी निर्माण करावयाचे आहेत,असे नमूद करून निशंक म्हणाले,‘आपल्या नेतृत्व गुणांच्या आधारे संकटांवर मात करतील असे विद्यार्थी घडविणे हाच केंद्र्र सरकारचा मुख्य उद्देश आहे. तरूणांनी स्वप्ने पहायला शिकावे आणि त्यांना सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करावा. भारत हा विश्व गुरू असून तो पुढेही राहणारच. त्याकरीता तरूणांचा सहभाग महत्वाचा आहे.’

टॅग्स :PuneपुणेmitएमआयटीTerrorismदहशतवादCentral Governmentकेंद्र सरकार