शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

इंद्रायणीची स्वच्छता १ दिवसाचं काम नाही; स्वच्छतेसाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जातील - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 17:29 IST

जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्याठिकाणी जातं ते सगळं एकत्र करून ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे

पुणे : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी (दी. ४) पहिल्यांदाच तीर्थक्षेत्र आळंदीत दाखल झाले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी माऊलींच्या समाधीला अभिषेक व महापूजा करत 'श्रींचे' दर्शन घेतले. दरम्यान आळंदी शहरात भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत केले. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जातील असे आश्वासन त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.

फडणवीस म्हणाले, इंद्रायणी प्रदूषित आहे. इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललंय. आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्याठिकाणी जातं ते सगळं एकत्र करून ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे. त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. मागेच लॉन्च केला आहे. सगळ्या वेगवेगळ्या गावांना ग्रामपंचायतींना, नगरपालिकांना, महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देतो आहोत. उद्योग विभागाला देखील आपण सांगितलेलं आहे. त्यासाठी व्यवस्था उभी करावी लागते ती व्यवस्था उभे करण्याचं काम हे सुरू केलेलं आहे.

महाराष्ट्र भविष्यातही पुढे जात राहील

खरं म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादानं एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि त्यानंतर आळंदीला येण्याची संधी मिळाली. माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. मला असं वाटतं की प्रत्येकाकरता हा क्षण अतिशय सुखाचा असतो. तो क्षण मला अनुभवायला मिळालेला आहे. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊलींपासून तर जगतगुरु तुकाराम महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे. या विचाराने आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेलाय आणि भविष्यातही पुढे जात राहील असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरindrayaniइंद्रायणीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसriverनदीpollutionप्रदूषण