शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

पाणीपुरवठ्याबाबत मुख्यमंत्र्यांचा शब्द हवेतच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 2:11 AM

पाणीपुरवठा कमी करण्यास रोखणारा लेखी आदेश नाहीच : शहराला ११५० एमएलडीच पाणी, टंचाईचा करावा लागणार सामना

पुणे : दिवाळीनंतरही पुण्याचे पाणी दररोज १३५० दशलक्ष लिटरच राहील, हे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन वाऱ्यावरच विरले आहे. पाणीकपात करू नये, याबाबत कोणताही लेखी किंवा तोंडी आदेश जलसंपदा विभागाला अद्यपी मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी पुण्याच्या पाण्यात कपात करण्याची तयारी सुरू केली आहे. ११५० दशलक्ष लिटर दररोज याप्रमाणेच पुण्याला खडकवासला धरणातून पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे.

पुणे शहराची पाण्याची दररोजची गरज १५०० ते १६०० दशलक्ष लिटर इतकी आहे. हे पाणी मंजूर कोट्यापेक्षा जास्त होत, असा जलसंपदाचा आरोप आहे. त्यामुळेच त्यांनी मध्यंतरी थेट खडकवासला धरणावरील महापालिकेच्या पंप हाऊसमध्ये पोलीस बंदोबस्तासह जाऊन पंप बंद केले होते. त्यानंतर शहराला १३५० दशलक्ष लिटर पाणी देण्यात येऊ लागले आहे. त्यातही कपात करून ते ११५० दशलक्ष लिटर करावे, असा जलसंपदाचा आग्रह आहे. तशी तंबी देणारे लेखी पत्रच त्यांनी महापालिकेला दिले आहे. त्यातच दिवाळीनंतरही मंजूर कोटा आहे त्याप्रमाणे ११५० दशलक्ष लिटर पाणीच घ्यावे, त्यापेक्षा जास्त पाणी घेतल तर पुन्हा पंप बंद करण्याची कारवाई करणार, असे स्पष्टपणे म्हटले आहे.

आम्ही पत्र दिले आहे त्याप्रमाणे महापालिकेला यापुढे धरणातून दररोज ११५० दशलक्ष लिटर इतकेच पाणी देण्यात येणार आहे, अशीही माहिती दिली. लोकसंख्या व राष्ट्रीय जल प्राधिकरणाच्या माणशी १३५ लिटरप्रमाणे त्यापेक्षा कितीतरी जास्त हे पाणी आहे, असे जलसंपदाचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना होणारा पाणी पुरवठा योग्यच आहे. गळती होत असेल तर ती कशी थांबवायची हा महापालिकेचा प्रश्न आहे, त्यांनी तो त्वरेने सोडवावा, नागरिकांना पाणी काटकसरीने वापरायचे आवाहन करावे, असे जलसंपदातील काही अधिकाºयांनी सांगितले. जलसंपदाने दररोज ११५० दशलक्ष लिटर पाणी देण्यास सुरुवात केली तर महापालिकेची भंबेरी उडणार आहे. आधीच पाण्यात कपात झाल्यामुळे त्यांनी रोज सलग ५ तास पण एकवेळ याप्रमाणे नवे वेळापत्रक तयार करून उपलब्ध पाणी व लोकसंख्या यांचे मेळ घातला आहे. अजूनही शहराच्या काही भागात विशेषत: उपनगरांमध्ये पिण्याचे पाणी नियमितपणे मिळत नाही. त्यामुळे ११५० पाणी मिळू लागले तर ते संपूर्ण शहराला पुरवायचे कसा, असा प्रश्न महापालिकेसमोर निर्माण झाला आहे.महापौर मुक्ता टिळक यांच्यासह सर्वच पदाधिकाºयांनी दिवाळीपूर्वी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे दौºयात त्यांना दिवाळीनंतरही पुणे शहराला १३५० दशलक्ष लिटरच पाणी ठेवावे, अशी विनंती केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तोंडी आश्वासन तर दिलेच होते, शिवाय जलसंपदा सचिवांबरोबर बोलून त्यांना तसे आदेश त्वरित जारी करण्यास सांगितले आहे, असे महापौरांनी सांगितले होते. मात्र पंधरापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. दिवाळी संपूनही चार दिवस झाले. तरीही जलसंपदा खात्याच्या पुणे विभागाला असे कोणतेही लेखी किंवा तोंडी आदेश मिळालेले नाहीत. तेथील वरिष्ठ अधिकाºयांनीच तसे स्पष्ट केले आहे.पुणेकर जास्त पाणी वापरतात म्हणून शेतीला पाणी कमी मिळते, अशी एक तक्रार जºहाड व अन्य काही शेतकºयांनी जलसंपदाकडे केली आहे. त्याची सध्या सुनावणी सुरू आहे.मुंबईत नुकत्याच झालेल्यायासंबंधीच्या बैठकीत जलसंपदाने महापालिकेला त्यांच्या वाढीव लोकसंख्या, फ्लोटिंग लोकसंख्या याविषयीची अधिकृत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी १३ डिसेंबरला आहे. 

टॅग्स :WaterपाणीPuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस