शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

Jayant Patil: "मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला", जयंत पाटलांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 17:00 IST

महाविकास आघाडीला सत्तेत येण्याचा पूर्णपणे आत्मविश्वास आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण देणे, जातनिहाय जनगणना करणे याचा महाविकास आघाडीच्या विकासाच्या पंचसुत्रीत समावेश असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले

जुन्नर: केंद्र शासनाने महाराष्ट्राला सातत्याने दुजाभावाची वागणुक दिली आहे. महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प गुजरातला नेले आहेत. भाजप व मित्रपक्षाने महागाई वाढवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला असल्याची टीका जयंत पाटील यांनी जुन्नर येथे केली. महविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. 

पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक सर्वसामान्य घरात घरखर्च करण्याची समस्या भेडसावत आहे. देशात चुकीची राजनीती व आर्थिक नीती सुरू आहे.  .जीएसटी मुळे साध्या जीवनावश्यक गोष्टी देखील महागल्या आहेत. राज्य शासन केंद्र शासनाला जाब विचारू शकत नाही. महायुतीचे राजकारण केवळ लाडक्या खुर्चीसाठी चालले आहे. महाविकास आघाडीला सत्तेत येण्याचा पूर्णपणे आत्मविश्वास आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण देणे, जातनिहाय जनगणना करणे याचा महाविकास आघाडीच्या विकासाच्या पंचसुत्रीत समावेश असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

त्यांच्या उपकाराची जाणीव पक्ष ठेवणार 

 शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन मोठा त्याग केला आहे. तसेच ज्येष्ठ नेते शरद लेंडे, अंकुश ढमाले यांनी केलेल्या त्यागाची, उपकाराची जाणीव पक्ष ठेवणार आहे. पक्ष त्यांच्या पाठीशी राहील. यासाठी त्यांचे मी आभार मानायला आलो आहे . अशी कृतज्ञता जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

आता खासदार कोल्हे व सत्यशील शेरकर ही नवीन जोडी

आदीवासी समाजातील कृष्णराव मुंडें यांना शरद पवार यांनी जुन्नर तालुक्याचे आमदार केले . आदिवासी समाजाला जिल्हा परीषदेचे अध्यक्षपद असेही जयंत पाटील यांनी सांगितले. पुर्वी जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे व इथले आमदार यांची जोडी होती. ही जोडी आताही एकत्र आहे असे प्रचारात सांगितले जाते. परंतु शरद पवार ,खासदर कोल्हे यांच्यावर टीका केल्याने ही जोडी आता तुटली आहे. आता खासदार कोल्हे व सत्यशील शेरकर ही नवीन जोडी लोकांनी केली आहे. जोड्या लावायला व जोड्या तोडायला लोक हुशार आहे अशी टीप्पणी जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

साहेबांच्या आशीर्वादाने विजय निश्चित 

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचा आशीर्वाद असल्याशिवाय जुन्नर तालुक्यात निवडणूक लढवता येत नाही .सद्यस्थितीत पवार साहेबांचा आशीर्वाद सत्यशील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसjunnar-acजुन्नरSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीInflationमहागाई