शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

Jayant Patil: "मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला", जयंत पाटलांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 17:00 IST

महाविकास आघाडीला सत्तेत येण्याचा पूर्णपणे आत्मविश्वास आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण देणे, जातनिहाय जनगणना करणे याचा महाविकास आघाडीच्या विकासाच्या पंचसुत्रीत समावेश असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले

जुन्नर: केंद्र शासनाने महाराष्ट्राला सातत्याने दुजाभावाची वागणुक दिली आहे. महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प गुजरातला नेले आहेत. भाजप व मित्रपक्षाने महागाई वाढवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला असल्याची टीका जयंत पाटील यांनी जुन्नर येथे केली. महविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. 

पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक सर्वसामान्य घरात घरखर्च करण्याची समस्या भेडसावत आहे. देशात चुकीची राजनीती व आर्थिक नीती सुरू आहे.  .जीएसटी मुळे साध्या जीवनावश्यक गोष्टी देखील महागल्या आहेत. राज्य शासन केंद्र शासनाला जाब विचारू शकत नाही. महायुतीचे राजकारण केवळ लाडक्या खुर्चीसाठी चालले आहे. महाविकास आघाडीला सत्तेत येण्याचा पूर्णपणे आत्मविश्वास आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण देणे, जातनिहाय जनगणना करणे याचा महाविकास आघाडीच्या विकासाच्या पंचसुत्रीत समावेश असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

त्यांच्या उपकाराची जाणीव पक्ष ठेवणार 

 शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन मोठा त्याग केला आहे. तसेच ज्येष्ठ नेते शरद लेंडे, अंकुश ढमाले यांनी केलेल्या त्यागाची, उपकाराची जाणीव पक्ष ठेवणार आहे. पक्ष त्यांच्या पाठीशी राहील. यासाठी त्यांचे मी आभार मानायला आलो आहे . अशी कृतज्ञता जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

आता खासदार कोल्हे व सत्यशील शेरकर ही नवीन जोडी

आदीवासी समाजातील कृष्णराव मुंडें यांना शरद पवार यांनी जुन्नर तालुक्याचे आमदार केले . आदिवासी समाजाला जिल्हा परीषदेचे अध्यक्षपद असेही जयंत पाटील यांनी सांगितले. पुर्वी जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे व इथले आमदार यांची जोडी होती. ही जोडी आताही एकत्र आहे असे प्रचारात सांगितले जाते. परंतु शरद पवार ,खासदर कोल्हे यांच्यावर टीका केल्याने ही जोडी आता तुटली आहे. आता खासदार कोल्हे व सत्यशील शेरकर ही नवीन जोडी लोकांनी केली आहे. जोड्या लावायला व जोड्या तोडायला लोक हुशार आहे अशी टीप्पणी जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

साहेबांच्या आशीर्वादाने विजय निश्चित 

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचा आशीर्वाद असल्याशिवाय जुन्नर तालुक्यात निवडणूक लढवता येत नाही .सद्यस्थितीत पवार साहेबांचा आशीर्वाद सत्यशील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसjunnar-acजुन्नरSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीInflationमहागाई