शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

बदलत्या हवामानाने संसर्गजन्य आजारांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 02:31 IST

लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावी काळजी : हृदयविकारग्रस्तांनी राहावे सावधान !

पुणे : दिवसभरात कधी कडक ऊन, कधी गडद ढग दाटून येणे, अचानक सुटलेली थंड हवा या सगळ्यात भर म्हणजे अवचित पावसाची सर येणे, अशा लहरी वातावरणाने लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याच्या समस्या मात्र वाढल्या आहेत. सर्दी, खोकला, जुलाब, डेंगी आणि मलेरिया यासारख्या संसर्गजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बेभरवशी वातावरणातील बदलामुळे खासकरून थंडहवेच्या झोताने ज्येष्ठांच्या हातापायांना मोठ्या प्रमाणात कंप जाणवू लागला आहे.

सकाळी थंडी, दुपारी उष्मा आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस असा तिन्ही ऋतूंचा अनुभव आता एकाच दिवशी मिळत आहे. मात्र, याचा परिणाम ज्येष्ठांसोबत लहान मुलांना सहन करावा लागत आहे. ढगाळ हवामानामुळे पुन्हा दमा, सांधेदुखी, गुडघादुखी अशा दुखण्यांनी डोके वर काढल्याने ज्येष्ठांच्या डोकेदुखीत आणखी भर पडली आहे. ढगाळ हवामान आणि धुक्याने हवामानाचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला असून, साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. खासकरून लहान मुलांच्या आरोग्यावर याचा होणारा परिणाम, याविषयी बालरोग व शिशुतज्ज्ञ डॉ. सचिन आठमुठे यांनी सांगितले, की बदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप, खोकला, सारखे विषाणुजन्य आजार वाढले आहेत. अनेकांना डेंगीची लक्षणे दिसून आली आहेत. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर एक ते पाच वर्षांमधील मुलांना ‘हँड, फूट अँड माऊथ डिसीज’ची लागण झालेली आहे. त्याचप्रमाणे ढगाळ हवामानामुळे बालदम्याचे रुग्ण वाढले असून पाणीबदलाने उलट्या आणि जुलाबाने लहान मुले त्रस्त आहेत.

काही दिवसांपूर्वी ऐन दिवाळीत पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीने वातावरण कमालीचे बदलले आहे. अशा बेभरवशी वातावरणामुळे हवामानाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. सध्या सकाळी थंडी जाणवते, तर दुपारी उन्हाचा कडाका सोसावा लागत आहे.रात्री उकाडा जाणवतो, तर पहाटे गारवा; त्यामुळे एकाच वेळी विविध ऋतूंचा सामना करावा लागत आहे. अशा वातावरणाचा त्रास हृदयविकाराच्या रुग्णांना सहन करावा लागत आहे. हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना अशा वातावरणात प्रामुख्याने न्युमोनियासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. सामान्य लोकांच्या तुलनेत हृदयविकाराच्या रुग्णांना याची लागण लगेच होते. वय वर्षे ६०च्या पुढील आणि १५ वर्षांखालील मुलांमध्ये श्वासोच्छ्वासाच्या आणि हृदयविषयक तक्रारी दिसू लागतात. यावर वेळेवर लसीकरण करून घेणे आणि कुठल्याही प्रकारच्यासर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष न करणे, याची काळजी त्यांनी घ्यावी,असे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत कोकणे सांगतात.काय करावे ? संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांपासून दूर राहावे1 अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांचीही भीती कायम आहे. साठलेल्या पाण्यामुळे डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण वाढण्याचा धोका वाढताना दिसत आहे. यामुळे किरकोळ ताप किंवा सर्दीकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळीच उपचार घेऊन स्वच्छतेला महत्त्व द्यावे लागणार आहे.

2दिवाळी म्हटले, की घरोघरी गोडधोड पदार्थांचीरेलचेल असते. काहींना या तेलकट पदार्थांनी घसादुखीचा त्रास जाणवतो; मात्र त्याकडेदुर्लक्ष केले जाते. अशा प्रक ारचे दुर्लक्ष आरोग्याकरिता धोकादायक ठरू शकते.वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. सर्दीमुळे अनेकांनासायनसने हैराण केले आहे. तर, लहान मुलांच्या कानाचे दुखणे वाढू लागले आहे. कानात पाणी साठणे, कानात पू होणे अशा प्रकारचा त्रास त्यांना होत आहे. विषाणुजन्य आजाराने नाक, कान आणि घशाच्या आजारांत वाढ झालेली आहे.- डॉ. समीर जोशी (कान-नाक-घसा तज्ज्ञ)

टॅग्स :Healthआरोग्यPuneपुणे