शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

बदलत्या हवामानाने संसर्गजन्य आजारांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 02:31 IST

लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावी काळजी : हृदयविकारग्रस्तांनी राहावे सावधान !

पुणे : दिवसभरात कधी कडक ऊन, कधी गडद ढग दाटून येणे, अचानक सुटलेली थंड हवा या सगळ्यात भर म्हणजे अवचित पावसाची सर येणे, अशा लहरी वातावरणाने लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याच्या समस्या मात्र वाढल्या आहेत. सर्दी, खोकला, जुलाब, डेंगी आणि मलेरिया यासारख्या संसर्गजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बेभरवशी वातावरणातील बदलामुळे खासकरून थंडहवेच्या झोताने ज्येष्ठांच्या हातापायांना मोठ्या प्रमाणात कंप जाणवू लागला आहे.

सकाळी थंडी, दुपारी उष्मा आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस असा तिन्ही ऋतूंचा अनुभव आता एकाच दिवशी मिळत आहे. मात्र, याचा परिणाम ज्येष्ठांसोबत लहान मुलांना सहन करावा लागत आहे. ढगाळ हवामानामुळे पुन्हा दमा, सांधेदुखी, गुडघादुखी अशा दुखण्यांनी डोके वर काढल्याने ज्येष्ठांच्या डोकेदुखीत आणखी भर पडली आहे. ढगाळ हवामान आणि धुक्याने हवामानाचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला असून, साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. खासकरून लहान मुलांच्या आरोग्यावर याचा होणारा परिणाम, याविषयी बालरोग व शिशुतज्ज्ञ डॉ. सचिन आठमुठे यांनी सांगितले, की बदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप, खोकला, सारखे विषाणुजन्य आजार वाढले आहेत. अनेकांना डेंगीची लक्षणे दिसून आली आहेत. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर एक ते पाच वर्षांमधील मुलांना ‘हँड, फूट अँड माऊथ डिसीज’ची लागण झालेली आहे. त्याचप्रमाणे ढगाळ हवामानामुळे बालदम्याचे रुग्ण वाढले असून पाणीबदलाने उलट्या आणि जुलाबाने लहान मुले त्रस्त आहेत.

काही दिवसांपूर्वी ऐन दिवाळीत पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीने वातावरण कमालीचे बदलले आहे. अशा बेभरवशी वातावरणामुळे हवामानाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. सध्या सकाळी थंडी जाणवते, तर दुपारी उन्हाचा कडाका सोसावा लागत आहे.रात्री उकाडा जाणवतो, तर पहाटे गारवा; त्यामुळे एकाच वेळी विविध ऋतूंचा सामना करावा लागत आहे. अशा वातावरणाचा त्रास हृदयविकाराच्या रुग्णांना सहन करावा लागत आहे. हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना अशा वातावरणात प्रामुख्याने न्युमोनियासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. सामान्य लोकांच्या तुलनेत हृदयविकाराच्या रुग्णांना याची लागण लगेच होते. वय वर्षे ६०च्या पुढील आणि १५ वर्षांखालील मुलांमध्ये श्वासोच्छ्वासाच्या आणि हृदयविषयक तक्रारी दिसू लागतात. यावर वेळेवर लसीकरण करून घेणे आणि कुठल्याही प्रकारच्यासर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष न करणे, याची काळजी त्यांनी घ्यावी,असे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत कोकणे सांगतात.काय करावे ? संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांपासून दूर राहावे1 अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांचीही भीती कायम आहे. साठलेल्या पाण्यामुळे डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण वाढण्याचा धोका वाढताना दिसत आहे. यामुळे किरकोळ ताप किंवा सर्दीकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळीच उपचार घेऊन स्वच्छतेला महत्त्व द्यावे लागणार आहे.

2दिवाळी म्हटले, की घरोघरी गोडधोड पदार्थांचीरेलचेल असते. काहींना या तेलकट पदार्थांनी घसादुखीचा त्रास जाणवतो; मात्र त्याकडेदुर्लक्ष केले जाते. अशा प्रक ारचे दुर्लक्ष आरोग्याकरिता धोकादायक ठरू शकते.वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. सर्दीमुळे अनेकांनासायनसने हैराण केले आहे. तर, लहान मुलांच्या कानाचे दुखणे वाढू लागले आहे. कानात पाणी साठणे, कानात पू होणे अशा प्रकारचा त्रास त्यांना होत आहे. विषाणुजन्य आजाराने नाक, कान आणि घशाच्या आजारांत वाढ झालेली आहे.- डॉ. समीर जोशी (कान-नाक-घसा तज्ज्ञ)

टॅग्स :Healthआरोग्यPuneपुणे