शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

बदलत्या हवामानाने संसर्गजन्य आजारांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 02:31 IST

लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावी काळजी : हृदयविकारग्रस्तांनी राहावे सावधान !

पुणे : दिवसभरात कधी कडक ऊन, कधी गडद ढग दाटून येणे, अचानक सुटलेली थंड हवा या सगळ्यात भर म्हणजे अवचित पावसाची सर येणे, अशा लहरी वातावरणाने लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याच्या समस्या मात्र वाढल्या आहेत. सर्दी, खोकला, जुलाब, डेंगी आणि मलेरिया यासारख्या संसर्गजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बेभरवशी वातावरणातील बदलामुळे खासकरून थंडहवेच्या झोताने ज्येष्ठांच्या हातापायांना मोठ्या प्रमाणात कंप जाणवू लागला आहे.

सकाळी थंडी, दुपारी उष्मा आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस असा तिन्ही ऋतूंचा अनुभव आता एकाच दिवशी मिळत आहे. मात्र, याचा परिणाम ज्येष्ठांसोबत लहान मुलांना सहन करावा लागत आहे. ढगाळ हवामानामुळे पुन्हा दमा, सांधेदुखी, गुडघादुखी अशा दुखण्यांनी डोके वर काढल्याने ज्येष्ठांच्या डोकेदुखीत आणखी भर पडली आहे. ढगाळ हवामान आणि धुक्याने हवामानाचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला असून, साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. खासकरून लहान मुलांच्या आरोग्यावर याचा होणारा परिणाम, याविषयी बालरोग व शिशुतज्ज्ञ डॉ. सचिन आठमुठे यांनी सांगितले, की बदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप, खोकला, सारखे विषाणुजन्य आजार वाढले आहेत. अनेकांना डेंगीची लक्षणे दिसून आली आहेत. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर एक ते पाच वर्षांमधील मुलांना ‘हँड, फूट अँड माऊथ डिसीज’ची लागण झालेली आहे. त्याचप्रमाणे ढगाळ हवामानामुळे बालदम्याचे रुग्ण वाढले असून पाणीबदलाने उलट्या आणि जुलाबाने लहान मुले त्रस्त आहेत.

काही दिवसांपूर्वी ऐन दिवाळीत पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीने वातावरण कमालीचे बदलले आहे. अशा बेभरवशी वातावरणामुळे हवामानाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. सध्या सकाळी थंडी जाणवते, तर दुपारी उन्हाचा कडाका सोसावा लागत आहे.रात्री उकाडा जाणवतो, तर पहाटे गारवा; त्यामुळे एकाच वेळी विविध ऋतूंचा सामना करावा लागत आहे. अशा वातावरणाचा त्रास हृदयविकाराच्या रुग्णांना सहन करावा लागत आहे. हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना अशा वातावरणात प्रामुख्याने न्युमोनियासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. सामान्य लोकांच्या तुलनेत हृदयविकाराच्या रुग्णांना याची लागण लगेच होते. वय वर्षे ६०च्या पुढील आणि १५ वर्षांखालील मुलांमध्ये श्वासोच्छ्वासाच्या आणि हृदयविषयक तक्रारी दिसू लागतात. यावर वेळेवर लसीकरण करून घेणे आणि कुठल्याही प्रकारच्यासर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष न करणे, याची काळजी त्यांनी घ्यावी,असे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत कोकणे सांगतात.काय करावे ? संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांपासून दूर राहावे1 अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांचीही भीती कायम आहे. साठलेल्या पाण्यामुळे डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण वाढण्याचा धोका वाढताना दिसत आहे. यामुळे किरकोळ ताप किंवा सर्दीकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळीच उपचार घेऊन स्वच्छतेला महत्त्व द्यावे लागणार आहे.

2दिवाळी म्हटले, की घरोघरी गोडधोड पदार्थांचीरेलचेल असते. काहींना या तेलकट पदार्थांनी घसादुखीचा त्रास जाणवतो; मात्र त्याकडेदुर्लक्ष केले जाते. अशा प्रक ारचे दुर्लक्ष आरोग्याकरिता धोकादायक ठरू शकते.वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. सर्दीमुळे अनेकांनासायनसने हैराण केले आहे. तर, लहान मुलांच्या कानाचे दुखणे वाढू लागले आहे. कानात पाणी साठणे, कानात पू होणे अशा प्रकारचा त्रास त्यांना होत आहे. विषाणुजन्य आजाराने नाक, कान आणि घशाच्या आजारांत वाढ झालेली आहे.- डॉ. समीर जोशी (कान-नाक-घसा तज्ज्ञ)

टॅग्स :Healthआरोग्यPuneपुणे