शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

जीवनशैलीमधे बदल करणे गरजेचे -  अशोकराव गोडसे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 5:12 PM

प्रत्येक माणसाचे शरीर जर निरोगी, सदृढ राहायचे असेल तर जीवनशैलीमधे बदल करणे गरजेचे आहे. व्यायाम, आहार याकडे लक्ष दिले पाहीजे.

 पुणे - प्रत्येक माणसाचे शरीर जर निरोगी, सदृढ राहायचे असेल तर जीवनशैलीमधे बदल करणे गरजेचे आहे. व्यायाम, आहार याकडे लक्ष दिले पाहीजे. हल्ली जन्मजातच काही रोग होतात. भारतामध्ये सर्वांत जास्त मधुमेहग्रस्त नागरिक असणे, ही खुपच चिंताजनक बाब आहे. प्रत्येकाने आपापल्या शरीराची काळजी घेवून भारत सदृढ होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांनी व्यक्त केले.

        ह्दयमित्र प्रतिष्ठान आयोजित डॉ. सुहास पांडे लिखित ‘मधुमेह स्त्रिया व ह्दयविकार’ या पुस्तकाचे प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी डॉ.वनिता जगताप, डॉ. संदीप बुटाला, राजाभाऊ घोडके, डॉ. सुहास पांडे, संयोजक श्रीकांत मुंदडा उपस्थित होते.

      श्रीकांत मुदंडा म्हणाले, ह्दयमित्र प्रतिष्ठान महाराष्ट्रभर चांगले काम करत आहे. ह्दयरोग व मधुमेहावर उपचार पध्दती यावर प्रतिष्ठान सातत्याने विनामूल्य प्रशिक्षण देत असते. महिलामध्ये ह्दयविकाराचे प्रमाण वाढले आहे, त्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. मधुमेहाची पुढची पायरी ही ह्दयविकाराची असते. शरीराच्या बाबतीत सर्वानी गांभीर्य घेवून त्याची काळजी घेतली पाहिजे़

         डॉ. एरंडे म्हणाले, मधुमेह हा आजार पूर्वकल्पना न देता होणारा आजार आहे़ जे लोक सातत्याने बसून राहतात़ त्यांच्यामधे मधुमेह हा आजार जास्त बळावतो. स्त्रिया व्यायामाला जास्त महत्व देत नाहीत़ वजनाच्या बाबतीत ते शरीराकडे जास्त लक्ष देत नाहीत़ स्त्रियांना कमी महत्व देण्याची ऐतिहासिक पध्दत यामुळे स्त्रियामध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. आज जगामध्ये ४२ कोटी रूग्ण मधुमेहाचे आहेत़ त्यामध्ये निम्म्या स्त्रिया आहेत़ भारतामधे मधुमेहाचे ७ कोटींच्या  आसपास रूग्ण आहेत. जगामधे दरवर्षी २ करोड मृत्यू मधुमेहामुळे होतात. मानसिक ताणतणाव, नैराश्य, स्थूलपणा, वैद्यकीय सोयीची अपूर्तता यामुळेही मधुमेहाचे प्रमाण वाढल्याचे आढळून येत आहे.

टॅग्स :Puneपुणे