शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता! उन्हाळ्यात टाळा उष्माघात, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 09:34 IST

भरउन्हात महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर जवळपास ६०० नागरिकांना उष्माघाताचा त्रास तर १२ हून अधिक नागरिकांचा मृत्यू

पुणे : आपल्या शरीराचे नाॅर्मल तापमान हे ३७ अंश डिग्री सेल्सिअस इतके असते; परंतु जर त्यापेक्षा ते वाढले तर घाम येताे आणि थरीर थंड होण्याची प्रक्रिया सुरू होते; परंतु शरीरातील पाणी संपले तर घाम येणे बंद हाेऊन ताेंडाला काेरड पडून उष्माघाताची शक्यता वाढते. त्यासाठी उन्हात जाताना काही गाेष्टींची काळजी घेणे गरजेचे असल्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

खारघरमध्ये भरउन्हात महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर जवळपास ६०० नागरिकांना उष्माघाताचा त्रास झाला व त्यापैकी १२ हून अधिक नागरिकांचा मृत्यूही झाला. बहुतेकांनी उन्हातून आल्यावर थंड पाणी पिल्यानंतर त्यांना हा त्रास झाला असे बाेलले जात आहे. यावरून उष्माघात किती जीवघेणा ठरू शकताे, ही बाब समाेर आली आहे. म्हणून या उन्हाळ्यात जर स्वत:चा बचाव करायचा असेल तर काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे डाॅक्टर सांगतात.

यंदा मार्च महिन्यापासूनच राज्यात उष्णता वाढली आहे. राज्यातील सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस व त्यापुढे जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे उष्माघाताचे रुग्णही वाढले आहेत. राज्यात मार्च ते १३ एप्रिलदरम्यान उष्माघाताचे ३५७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक संशयित रुग्ण मुंबई उपनगर, नंदुरबार आणि उस्मानाबाद येथील आहेत, तर पुण्यातील दाेन संशयित रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसला तरी ही बाब गंभीर आहे. राज्याच्या साथराेग विभागाने ही माहिती दिली आहे.

काय काळजी घ्याल?

- वाढत्या तापमानात कष्टाची कामे करणे टाळावे.

- उष्णता शोषूण घेणारे कपडे घालावेत.- सावलीत बसून भरपूर पाणी प्यावे.

जाेखीम काेणाला?

- ६५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती- ० ते ५ वर्षे वयोगटातील मुले, गर्भवती माता, मधुमेह, हृदयविकाराचे रुग्ण- अतिउष्ण वातावरणामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती यांना उष्माघाताची जाेखीम आहे.

कारणे 

- उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे- कारखान्यांच्या बॉयलर रूममध्ये काम करणे- काच कारखान्यातील कामे- घट्ट कपड्यांचा वापर

लक्षणे 

- पुरळ/घामाेळे- उष्णतेने स्नायूमध्ये पेटके येणे- पाय, घोटा आणि हातांना सूज- थकवा येणे, बेशुद्ध होणे

उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता

शरीराचे तापमान जर ३६.८ अंश सेल्सिअसच्यापुढे गेले तर शरीरातील इतर क्रियांवर परिणाम हाेताे. जर हे तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले, तर मग मेंदूतील तापमान नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेवर परिणाम हाेताे. यावेळी घाम येऊन शरीरातील पाणी संपले, तर मग लघवी बंद हाेते. डाेळ्यापुढे अंधारी येते, मेंदूचा रक्तपुरवठा मंदावताे. अशावेळी उष्माघात हाेऊन वेळेवर उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता वाढते. - डाॅ. अविनाश भाेंडवे, माजी अध्यक्ष, आयएमए

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यTemperatureतापमानWaterपाणीHeat Strokeउष्माघात