शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

राज्यामध्ये येत्या ५ दिवसांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता; दिवसा गारवाही जाणवणार

By श्रीकिशन काळे | Updated: November 24, 2023 20:42 IST

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छ. संभाजीनगर परिसरात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता

पुणे : राज्यामध्ये येत्या पाच दिवसांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छ. संभाजीनगर परिसरात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज आहे.

राज्यात २३ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पावसाचे वातावरण असणार आहे. त्यानंतर बुधवारी (दि.२९)पासून वातावरण निवळून त्यापुढील ३ आठवड्यापर्यंत दुपारच्या कमाल तापमानात घट जाणवून दिवसाचा ऊबदारपणा कमी होईल. तसेच दिवसाही काहीसा गारवा जाणवू शकतो. तर शुक्रवार ८ डिसेंबरपासून किमान तापमानताही हळूहळू घसरण होवून थंडीला सुरवात होवू शकते, असे हवामानतज्ज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी सांगितले.

सध्या गारपीट होण्याचा काळ नाही. तरी देखील गारपीट होण्याची शक्यता जाणवत आहे. अरबी समुद्रात मालदीव ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत पश्चिम किनारपट्टी समांतर पृष्टभागापासून दीड किमी उंचीच्या जाडीच्या हवेच्या कमी दाबाचा आस निर्माण झाला आहे. वायव्य उत्तर भारतातून थेट मध्यप्रदेश, गुजरातमधून उत्तर महाराष्ट्रापर्यंत तसेच तेथून दक्षिण कोकण किनारपट्टीसमोर अरबी समुद्रात ६ किमी. उंचीच्यावर निर्मित हवेच्या कमी दाबाच्या आसामुळे येऊ घातलेल्या पश्चिमी झंजावाताचा परिणाम म्हणजे होणारी गारपीट आहे.

तमिळनाडू, केरळ भू -भाग ओलांडून दीड ते दोन किमी. उंचीपर्यंत 'पुरवी' वारा प्रणाली अरबी समुद्रात उतरून विकसित होईल. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी समांतर उत्तरेकडे आगेकूच करून वरील पश्चिमी झंजावात प्रणालीत होणाऱ्या विलीनिकरणामुळे दोन प्रणाल्याच्या संयोगातून गारपीटीची शक्यता वाढली आहे, असे खुळे यांनी सांगितले.

पुण्यात ढगाळ वातावरण

पुण्यात किमान तापमान १७.३ नोंदवले गेले. त्यामुळे थंडी थोडी कमी झाल्याचे जाणवत आहे. २५ नोव्हेंबर रोजी आकाश ढगाळ राहील. मेघगर्जनासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसTemperatureतापमानenvironmentपर्यावरणHealthआरोग्य