शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
6
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
7
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
8
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
9
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
10
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
13
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
14
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
15
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
16
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
17
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
18
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
19
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
20
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे

सत्ताधारी असोत किंवा विरोधक,महात्मा गांधी यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही

By राजू इनामदार | Updated: March 1, 2025 09:44 IST

डॉ. कुमार सप्तर्षी : गांधी विचारांची आजच खरी गरज

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी विचार साहित्य संमेलन पुण्यात गांधी भवनमध्ये ७, ८ व ९ मार्च रोजी होत आहे. ज्येष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवर संमेलनाचे अध्यक्ष असून राज्यसभेचे खासदार मनोज कुमार झा उद्घाटक आहेत. पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या हस्ते संमेलनाचा समारोप होईल. त्यानिमित्त आयोजक व गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्याबरोबर झालेली बातचीत.

प्रश्न : महात्मा गांधी व त्यांचे विचार आता ‘आउटडेटेड’ झालेत असे बोलले जात असल्याच्या काळात गांधी विचार साहित्य संमेलन भरवण्याचे कारण काय?

डॉ. सप्तर्षी : तेच तर कारण आहे. महात्मा गांधी शरीराने गेले, नव्हे त्यांना घालवण्यात आले, मात्र त्यांचा विचार आजही आहे, याचा अर्थ तो विचार मारता आलेला नाही. जगातील ८० पेक्षा जास्त देशात गांधींजींचे पुतळे आहेत, देशीविदेशी भाषेतील त्यांच्यावरील पुस्तकांची संख्या लाखापेक्षा जास्त आहे. जगातील अनेक देशांच्या स्वातंत्र्यचळवळीचे प्रणेते गांधीजी आहेत. देशात आजही सत्ताधारी असोत किंवा विरोधक, महात्मा गांधी यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. हे सगळे महात्मा गांधी व त्यांचे विचार ‘आउटडेटेड’ झाल्याचे चिन्ह आहे का? विद्यमान सत्ताधारी किंवा त्यांचे प्रायोजक असलेले तरी महात्मा गांधींना उघडपणे नाकारू शकतील काय? या विचारांची नव्याने उजळणी व्हावी, नव्या पिढीलाही गांधी काय होते ते कळावे यासाठी हे संमेलन आहे.

-- नव्या पिढीला याचे आकर्षण वाटेल?

-- का नाही वाटणार? त्यांच्या भाषेत सांगितले तर नक्की वाटेल. म्हणजे महात्मा गांधी यांनी त्यांच्या आयुष्यात एका मोठ्या प्रोजेक्टवर काम केले. विविध धर्म, पंथ, जात, वेगवेगळी संस्थाने यात विखुरलेल्या ३३ कोटी जनतेला एकत्र करून पारतंत्र्यांच्या विरोधात उभे केले. शस्त्राविना लढा दिला. हा प्रोजेक्ट त्यांनी यशस्वी करून दाखवला. ही एक विलक्षण गोष्ट आहे. जगभरातील अनेक विचारवंत, नेते, शास्त्रज्ञ, उद्योगपती यांना याचे आश्चर्य आहे. विदेशातील व्यवस्थापन शास्त्रात, आरोग्यशास्त्रात, पर्यावरण संवर्धनात, स्वयंरोजगारात अशा अनेक क्षेत्रात गांधीजींचे विचार अभ्यासले जातात, ते त्यांनी त्या क्षेत्रात मिळवलेल्या यशामुळेच. हे सगळे नव्या पिढीसमोर यायला हवे हाच आमचा उद्देश आहे. संमेलनाचे आयोजन त्यासाठीच आहे.

-- तीन दिवसांच्या संमेलनातून हे साध्य होईल असे वाटते?

-- आम्ही हे संमेलन एक मॉडेल म्हणून करत आहोत. काय अडचणी येतील त्या आम्ही सोडवत आहोत, त्यातून मार्ग कसा निघाला याची नोंद करतो आहोत. हेच मॉडेल नंतर प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवले जावे असे आम्हाला अपेक्षित आहे. नव्हे, तसेच व्हावे असा आमचा प्रयत्न आहे. विषय हवा? आम्ही देऊ! वक्ते हवे? आम्ही देऊ! आर्थिक मदत हवी? आम्ही ती कशी मिळवली ते सांगू! यातून एक वातावरण व्हावे, तुम्ही सुरुवातीला जो उल्लेख केला की, गांधी विचार आउटडेटेड झाला आहे, याला यातून उत्तर मिळावे. आजही या देशात गांधीच मोठे आहेत. ते म्हणजे भारतीय संस्कृतीचा अर्क आहेत. त्यांच्यावर टीका झाली, त्यांना काय काय ठरवले गेले, अजूनही ठरवले जाते, मात्र ते सगळे पचवून गांधी आज शरीराने गेल्यानंतरही तब्बल ७७ वर्षे हयात आहेत, उलट नव्यानव्या तेजाने उजळून निघत आहेत. ज्यांना ते सहन होत नाही, त्यांना ते समजावेत, उमजावेत व गांधी विचार मानणाऱ्यांनाही ते नव्याने कळावेत यासाठी हे संमेलन आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMahatma Gandhiमहात्मा गांधी