शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

केंद्र महागाईवर नियंत्रणासाठी प्रयत्नशील; मात्र राज्य सरकारनेही जबाबदारी घ्यावी-अश्वीनकुमार चौबे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 7:36 PM

रशिया युक्रेन युद्धामुळे महागाई वाढली आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतोय

पुणे : रशिया युक्रेन युद्धामुळे महागाई वाढली आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत, मात्र ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री अश्वीनकुमार चौबे यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात कार्यकर्ता बैठकीसाठी शुक्रवारी चौबे आले होते. तत्पुर्वी पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी महागाई कमी करण्याची जबाबदारी राज्य सरकारांची असल्याचे सांगितले. युद्धामुळे जगातील सर्वच देशांमध्ये महागाई वाढली आहे, भारत त्याला अपवाद असणार नाही. इथेही वाढते आहे, त्यावर आम्ही नियंत्रण मिळवतो आहोत. त्यासाठी काही गट स्थापन केले आहेत. पण राज्य सरकारांचीही यात मोठी जबाबदारी आहे. काही कर कमी करून ते यावर नियंत्रण ठेवू शकतात.

खाद्य तेल, गॅसच्या दरांवर नियंत्रण आणतो आहोत. बऱ्याचशा गोष्टी आपण बाहेरून घेत असतो. त्यामुळे या प्रयत्नांना मर्यादा येतात. शिधापत्रिकेवर धान्य व्यवस्थित कसे मिळेल यासाठी आपण बायोमेट्रिक पद्धत सुरू केली आहे. त्यामुळे या योजनेतील भ्रष्टाचाराला आळा बसला असा दावा चौबे यांनी केला. धान्य तसेच जीवनावश्यक वस्तू बाजारपेठेत उपलब्ध राहतील, त्याचा कोणी साठा करणार नाही याची काळजी घेत आहोत. राज्य सरकारांनी अशा वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे कळवण्यात आले आहे असे चौबे यांनी सांगितले.

बिहारमधील भाजपाच्या सत्तेत तिथे कोणीही एकत्र आले तरीही काही फरक पडत नाही. कोणकोणाला भेटत असेल तर त्यात काही चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. ती चांगलीच गोष्ट आहे, मात्र त्यामुळे भाजपाच्या तेथील सत्तेमध्ये बदल होईल, काही उलथापालथ होईल असे कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे असे चौबे म्हणाले.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाState Governmentराज्य सरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMONEYपैसा