शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी-मोहिते यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 10:56 IST

दोन्ही महायुद्धांमध्ये बाजी-मोहिते सैनिक आणि अधिकाऱ्यांनी यांनी मोठा पराक्रम गाजवून भारतीय लष्करामध्ये आपले नाव अजरामर करून ठेवले आहे

पुणे : सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी-मोहिते ( वय ९८) यांचे अल्पशा आजारामुळे दिनांक ३० जून २०२३ रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि दोन मुली व सुना, नातवंडे असा परिवार आहे.

कॅप्टन हंबीरराव मोहिते हे तळबीड (ता. कराड) येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तृतीय चिरंजीव रतोजी राजे, यांचे थेट वंशज होते. त्यांच्या घरातील ७ पिढ्यांनी भारतीय लष्करी सेवेत योगदान दिले आहे. दोन्ही महायुद्धांमध्ये बाजी-मोहिते सैनिक आणि अधिकाऱ्यांनी यांनी मोठा पराक्रम गाजवून भारतीय लष्करामध्ये आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. कॅप्टन हंबीरराव स्वतः मराठा लाईट इन्फंट्री तर्फे वयाच्या २० व्या वर्षी दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यांनी इटली येथील युद्धात हिटलरच्या नाझी सैन्याविरुद्ध ‘प्लॅटून टॅंक कमांडर’ म्हणून मोठी कामगिरी बजावली होती. महायुद्धानंतर त्यांची नेमणूक मित्र देशांच्या जपान येथील मुख्यालयात करण्यात आली, तेव्हा त्यांचा जपानी संस्कृती आणि सभ्यतेशी जवळचा संबंध आला, ज्याचा त्यांना आयुष्यभर उपयोग झाला.

वडिलांच्या निधनामुळे त्यांना लष्करी सेवेतून लवकर निवृत्त होऊन कौटुंबिक जबाबदारी आणि पणजोबा आणि वडिलांनी पराक्रम करून मिळवलेली नगर जिल्ह्यातील (जंगी इनाम) ८० एकर शेतीकडे वळावे लागले.‌ त्यामध्ये सुद्धा त्यांनी १९५०-६० च्या दशकापासून आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान वापरून आदर्श शेती केली. 

त्याच सुमारास कृषीमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील, अर्थमंत्री धनंजयराव गाडगीळ यांनी कॅप्टन हंबीरराव बाजी-मोहिते यांची देशातील पहिल्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नेमणूक केली, जी त्यांनी यशस्वीपणे पार पडली आणि आदर्श अशी सहकारी साखर कारखाना चालवण्याची व्यवस्था लावून दिली. या क्षेत्रात त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते.

पाकिस्तान आणि चीनने भारतावर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर सैनिकी शिक्षण देण्यावर दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वेळेस आणि दिवंगत बाळासाहेब देसाई शिक्षण मंत्री असताना देशाला जाणीव झाली. त्यावेळेस महाराष्ट्र मध्ये सातारा येथे "सैनिक स्कूल"  स्थापन करण्यामध्ये आणि त्याची आदर्श अशी रूपरेषा आखण्यात कॅप्टन हंबीरराव बाजी-मोहिते यांनी सरकारला महत्त्वाचे मार्गदर्शन केले. त्यामुळेच आज लष्करामध्ये सातारा येथील सैनिक स्कूल मधील विद्यार्थी महत्त्वाच्या अधिकारी पदावर भारतीय सैन्यामध्ये रुजू आहेत.

त्याव्यतिरिक्त कॅप्टन हंबीरराव बाजी-मोहिते यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा अशा संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करून सहकार्य क्षेत्र, तसेच शेतकी व्यवसायामध्ये आर्थिक व्यवस्थापनावर भर देऊन उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे धाकटे सुपुत्र अमेरिकेवरून येणार असल्यामुळे कॅप्टन हंबीरराव बाजी-मोहिते यांचा अंत्यविधी रविवारी २ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ पुणे येथे होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूSocialसामाजिकhistoryइतिहासMaharashtraमहाराष्ट्र