शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
2
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
5
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
6
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
7
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
8
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
9
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
10
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
11
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
12
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
13
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
14
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
15
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
16
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
17
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
18
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
19
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
20
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक

पीक घेता नाही आलं अन् घरातलं धान्यही गेलं, आता जगायचं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 6:19 AM

होते नव्हते ते सारे संपले : शिरूर तालुक्यातील वयोवृद्ध जोडप्यापुढे प्रश्न

श्रीकिशन काळे 

पुणे : ‘‘चार-पाच एकर शेतीत यंदा पीक घ्यायचे होते. पण पावसानं सर्व पाणी फेरलंय. कारण शेतात पाणी असल्याने खूप गवत वाढलंय. त्याला दुरूस्त करायला पैसेही नाहीत. घरात असलेलं पोतंभर धान्यही भिजल्यानं ते टाकून द्यावं लागलं. आसरा नसल्याने दोन-तीन शेळ्यांही मेल्यात. आता जगायचं तरी कसं ? हातात दमडी नाय आण शेतात पीक नाय ?,’’ हे हृदयाला पिळवटून टाकणारे बोल सत्तरीत असलेल्या गीताबाई काळे यांचे आहेत. त्या त्यांचे धनी माणिक काळे यांच्यासोबत शेतात जीवन जगत आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात चव्हाणवाडी हे छोटंसं खेडे आहे. त्यामध्ये सत्तर-ऐंशी वर्षांचे जोडपे आपली गुजराण शेती आणि शेळीपालन करून करत आहेत. त्यांनाही या पावसाने यंदा चांगलाच फटका दिला आहे. माणिक काळे आणि गीताबाई काळे हे जोडपे एकमेकांचे आधार असून, ते दोघे शेतातच पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. यंदा त्यांना पावसामुळे शेतात पीक घेता आले नाही. सात-आठ शेळ्याही पाळून त्यावर गुजराण करीत आहेत. पावसाने यंदा त्यांचे आर्थिक गणितच कोलमडून गेले आहे. घरात असलेले धान्य पाण्याने भिजून गेले. शेळ्यांना योग्य आसरा नसल्याने पावसात दोन-तीन शेळ्यांनी आपला जीव गमावला. दोघांनाही आता इकडून-तिकडून मागून पोटाची खळगी भरावी लागत आहे. कारण त्यांची मुले त्यांच्यासोबत राहत नाहीत. शेतात तर काहीच राहिले नसल्याने अन्न विकत घ्यायलाही पैसे नाहीत. परिणामी त्यांच्यावर भीक मागायची वेळ आली आहे.

पावसाने आहे ते संपवलंय...सुनीता भोसले या ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या असून, त्या म्हणाल्या, हे दोघेही स्वत: कमवून आयुष्य जगणारे जोडपे आहे. परंतु, यंदा पावसाने त्यांना झोडपले आहे. त्यांच्याकडे ना शेतात काही आहे, ना घरात. त्यांच्यावर आता भीक मागायचीच पाळी आली आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी