शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

पुण्यातील कालवा १५ ठिकाणी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 1:15 AM

अतिक्रमणांनी पडझड : तीन खात्यांची तोंडे तीन दिशांना, दुरुस्तीला होतोय विलंब

पुणे : खडकवासला धरणातून निघालेला कालवा हडपसरपर्यंत पाटबंधारे, महापालिका तसेच पोलीस या तीन खात्यांमधील समन्वयाअभावी धोकादायक झाला आहे. मध्यंतरीच्या कालवाफुटीमुळे पाटबंधारे विभागाने तात्पुरती दुरुस्ती केली असून अजूनही तो अनेक ठिकाणी अतिक्रमणांच्या विळख्यातून मुक्त करण्याची गरज आहे. याशिवाय कालवा दुरुस्तीच्या कामातही नियमितता नसल्यामुळे किमान १५ ठिकाणी तो पडण्याच्या अवस्थेत आहे.

वारंवार मागणी करूनही महापालिकेकडून कर्मचारी व पोलिसांकडून बंदोबस्त दिला जात नाही. त्यामुळे अतिक्रमणे काढता येत नाहीत. महापालिका कोट्यवधी रुपयांची थकबाकी देत नाही. त्यामुळे कालवा दुरुस्तीसाठी म्हणून स्वतंत्र तरतूदच पाटबंधारे खात्याकडून केली जात नाही. कालव्याला अगदी लागून अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहे. अतिक्रमण करून राहणाऱ्यांकडून कालव्याची कायम पडझड होत असते. खड्डे पाडणे, माती उचलणे, यातून भराव खचतो. यात सांडपाणी सोडले जाते. ते जमिनीत मुरते व भराव खचतो. भिंत धोकादायक होते.

जनता वसाहत, स्वारगेट, ससाणेनगर, शिंदे वस्ती, बी.टी. कवडे रोड, हडपसर अशा जवळपास १५ ठिकाणी कालवा धोकादायक झाला आहे. तेथील भिंतींची दुरुस्ती करावी लागणार आहे. तसेच अस्तरीकरण करणेही गरजेचे झाले आहे. कालवा दुरुस्तीकडे तसेच अतिक्रमणे काढण्याकडे पाटबंधारे खात्याचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. कालव्याची मालकी त्यांच्याकडे असल्याने त्याच्या संरक्षणाची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. ते केले जात नसल्यामुळे कालव्याच्या अगदी कडेने जनता वसाहतीसारख्या वसाहती उभ्या राहात आहेत. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

पाटबंधारे खाते महापालिकेकडे अतिक्रमणे काढण्यासाठी त्यांच्या विभागाचे कर्मचारी मागतात. ते त्यांना मिळत नाही. अतिक्रमणे काढण्यासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी उत्सुक नसतात. त्यांना पोलीस बंदोबस्त हवा असतो. वारंवार मागणी करूनही तो मिळत नाही. पाटबंधारे खात्याकडे यासाठी लागणारे मनुष्यबळ, जेसीबी, पोकलेन सारखी यंत्रसामग्री नाही. त्यामुळे महापालिका व पोलीस यांना पत्र पाठवले की ते निवांत होतात.

जबाबदारी महापालिकेचीहीकालवा दुरुस्तीसाठी आमच्याकडे अडचणी असतात. तरीही आम्ही ती करत असतो. कालवा फुटीनंतर पाहणी करताना १५ ठिकाणे धोकादायक आढळली. पाणी सोडलेले असल्यामुळे त्याची दुरुस्ती करणे अवघड होते, मात्र तात्पुरती दुरुस्ती केली आहे. आता काही धोका नाही. महापालिका हद्दीतील कालव्यावर अतिक्रमण होऊ न देणे ही महापालिकेचीही जबाबदारी आहे.- पांडुरंग शेलार, अधीक्षक अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभागसंरक्षणाची जबाबदारी त्यांचीचकालव्याची मालकी पाटबंधारे विभागाची आहे. त्यामुळे त्याचे संरक्षणही त्यांनीच करणे अपेक्षित आहे. महापालिकेची शहरात अतिक्रमण कारवाई सुरू असते. त्यातून नियोजन करून पाटबंधारे विभागाला वेळ देणे शक्य आहे, मात्र त्यासाठी त्यांनी महापालिकेबरोबर समन्वय ठेवणे गरजेचे आहे.- व्ही. जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा

संयुक्त बैठक व्हावीपाटबंधारे खाते व महापालिका यांच्यात पाणी मोजण्यावरून, दर आकारणीवरून तसेच कालवा दुरुस्तीवरूनही वाद आहेत. पुणेकरांसाठी म्हणून त्यांनी संयुक्त बैठक घेऊन एकदाच हे सर्व वाद मोडीत काढावेत व पुणेकरांना पाण्याच्या वादापासून मुक्त करावे अशी मागणी आता होत आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका