शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या लोकप्रतिनिधींची लालबहादूर शास्त्रींशी तुलना होऊ शकते का? अजित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 17:25 IST

यापूर्वी राजकारणात नसताना न्यायालयाने जरी ताशेरे ओढले तरी राजीनामा दिल्याचे पाहिले आहे..

पुणे : रेल्वे अपघात झाल्यानंतर लालबहाददूर शास्त्री यांच्यासह त्या काळात अनेक मंत्र्यांनी त्या त्या वेळच्या घटना पाहून राजीनामे दिले होते. आजच्या लोकप्रतिनिधींची त्यांच्याशी तुलना होऊ शकते का? असा सवाल उपस्थित करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी राजकारणात नसताना न्यायालयाने जरी ताशेरे ओढले तरी राजीनामा दिल्याचे पाहिले आहे. आत्ता काय घडतंय हे आपण पाहातच आहोत. प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते, असे सांगून निशाणा साधला.

रेल्वे अपघात झाल्यानंतर लालबहाददूर शास्त्री यांच्यासह त्या काळात अनेक मंत्र्यांनी त्या त्या वेळच्या घटना पाहून राजीनामे दिले होते. आजच्या लोकप्रतिनिधींची त्यांच्याशी तुलना होऊ शकते का? असा सवाल उपस्थित करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी राजकारणात नसताना न्यायालयाने जरी ताशेरे ओढले तरी राजीनामा दिल्याचे पाहिले आहे. आत्ता काय घडतंय हे आपण पाहातच आहोत. प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते, असे सांगून निशाणा साधला. 

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आजवर ज्या लोकप्रतिनिधींवर आरोप झाले, ते लोक पदापासून बाजूला झाले. याविषयी विचारले असता त्यांनी लालबहाददूर शास्त्री यांचा दाखला देत आरोप झालेल्या एका मंत्र्याचे नाव न घेता त्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाविषयी छेडले असता, मी सुरुवातपासून म्हणत आहे. कोणत्याही घटनेचा तपास अगदी व्यवस्थित झाला पाहिजे. सत्य बाहेर आले पाहिजे. सत्य बाहेर येत असताना जर कोणाची चूक असेल तर त्याला शासन झाले पाहिजे. पण अंतिमत: चौकशीतून सत्य बाहेर येईल. त्यावर  पूजा चव्हाण प्रकरणी संबधित मंत्री नॉट रिचेबल आहेत. बोलत नाही. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या घटनेत प्रतिक्रिया दिली. आता नेमकं काय झालं?  त्यावर जेव्हा मी त्यांना भेटेन. तेव्हा त्यांना नक्की सांगेन की माध्यमातील मंडळी तुमची आत्मीयतेने वाट पाहत आहेत. एकदा पुढे या अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

शिखर सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. हसन मुश्रीफ यांनी असा आरोप केला होता की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोटाळ्यात अडकवले याविषयी विचारल्यानंतर पवार यांनी यामध्ये तथ्य असेल तर कारवाई नक्की होईल. आता ज्या गोष्टी झाल्या त्या उगाळणं चांगलं नाही असे सांगून अजित पवार यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

पेट्रोल इंधन दरवाढीबाबत मागच्या सरकारवर खापर फोडले जात आहे, त्याविषयी बोलताना पवार यांनी या सरकारला जनतेने निवडून दिले आहे.मागच्या सरकारने जर काही चुका केल्या असतील तर त्यात सुधारणा करण्याचे काम या सरकारचे आहे. एकमेकांवर टोलवाटोलवी करण्यात काही अर्थ नाही. परभणीमध्ये पेट्रोलचे दर 100 रूपयांच्या पुढे गेले आहेत. ते कमी झाले पाहिजेत.  भाजपच्या पक्षातील लोकांना पण हे वाटत आहे. पण कुणी बोलू शकत नाही. ही दरवाढ कमी झालीच पाहिजे ही माझीच नाही तर सर्वसामान्यांची भावना आहे. महागाईमुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त होऊन गेला आहे. ज्यावेळी राज्याचा अर्थसंकल्प मांडेन त्यावेळी कोणत्या गोष्टीचा टॅक्स वाढवणार आणि कोणता कमी करणार हे निश्चित सांगेन

राज्य सरकार विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत कोरोनाचे कारण पुढे करीत आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे याकडे लक्ष वेधले असता जर आम्ही घाबरलो असतो तर आम्ही राजीनामा देऊ दिला असता का? त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा दिला आहे. विरोधक सातत्याने हे सरकार तीन महिने चालेल, सहा महिने चालेल असे म्हणतात. विरोधक सारखे तीन महिने वाढवत आहे. आता सरकारला सव्वा वर्षे पूर्ण झाले आहे. त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकाल पूर्ण करेल. तिन्ही पक्ष एकोप्याने काम करीत आहेत. पवार साहेबांचे आम्ही मार्गदर्शनही घेत आहोत असे अजितदादा म्हणाले.---------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकारSanjay Rathodसंजय राठोडDhananjay Mundeधनंजय मुंडे