शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

आजच्या लोकप्रतिनिधींची लालबहादूर शास्त्रींशी तुलना होऊ शकते का? अजित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 17:25 IST

यापूर्वी राजकारणात नसताना न्यायालयाने जरी ताशेरे ओढले तरी राजीनामा दिल्याचे पाहिले आहे..

पुणे : रेल्वे अपघात झाल्यानंतर लालबहाददूर शास्त्री यांच्यासह त्या काळात अनेक मंत्र्यांनी त्या त्या वेळच्या घटना पाहून राजीनामे दिले होते. आजच्या लोकप्रतिनिधींची त्यांच्याशी तुलना होऊ शकते का? असा सवाल उपस्थित करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी राजकारणात नसताना न्यायालयाने जरी ताशेरे ओढले तरी राजीनामा दिल्याचे पाहिले आहे. आत्ता काय घडतंय हे आपण पाहातच आहोत. प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते, असे सांगून निशाणा साधला.

रेल्वे अपघात झाल्यानंतर लालबहाददूर शास्त्री यांच्यासह त्या काळात अनेक मंत्र्यांनी त्या त्या वेळच्या घटना पाहून राजीनामे दिले होते. आजच्या लोकप्रतिनिधींची त्यांच्याशी तुलना होऊ शकते का? असा सवाल उपस्थित करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी राजकारणात नसताना न्यायालयाने जरी ताशेरे ओढले तरी राजीनामा दिल्याचे पाहिले आहे. आत्ता काय घडतंय हे आपण पाहातच आहोत. प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते, असे सांगून निशाणा साधला. 

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आजवर ज्या लोकप्रतिनिधींवर आरोप झाले, ते लोक पदापासून बाजूला झाले. याविषयी विचारले असता त्यांनी लालबहाददूर शास्त्री यांचा दाखला देत आरोप झालेल्या एका मंत्र्याचे नाव न घेता त्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाविषयी छेडले असता, मी सुरुवातपासून म्हणत आहे. कोणत्याही घटनेचा तपास अगदी व्यवस्थित झाला पाहिजे. सत्य बाहेर आले पाहिजे. सत्य बाहेर येत असताना जर कोणाची चूक असेल तर त्याला शासन झाले पाहिजे. पण अंतिमत: चौकशीतून सत्य बाहेर येईल. त्यावर  पूजा चव्हाण प्रकरणी संबधित मंत्री नॉट रिचेबल आहेत. बोलत नाही. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या घटनेत प्रतिक्रिया दिली. आता नेमकं काय झालं?  त्यावर जेव्हा मी त्यांना भेटेन. तेव्हा त्यांना नक्की सांगेन की माध्यमातील मंडळी तुमची आत्मीयतेने वाट पाहत आहेत. एकदा पुढे या अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

शिखर सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. हसन मुश्रीफ यांनी असा आरोप केला होता की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोटाळ्यात अडकवले याविषयी विचारल्यानंतर पवार यांनी यामध्ये तथ्य असेल तर कारवाई नक्की होईल. आता ज्या गोष्टी झाल्या त्या उगाळणं चांगलं नाही असे सांगून अजित पवार यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

पेट्रोल इंधन दरवाढीबाबत मागच्या सरकारवर खापर फोडले जात आहे, त्याविषयी बोलताना पवार यांनी या सरकारला जनतेने निवडून दिले आहे.मागच्या सरकारने जर काही चुका केल्या असतील तर त्यात सुधारणा करण्याचे काम या सरकारचे आहे. एकमेकांवर टोलवाटोलवी करण्यात काही अर्थ नाही. परभणीमध्ये पेट्रोलचे दर 100 रूपयांच्या पुढे गेले आहेत. ते कमी झाले पाहिजेत.  भाजपच्या पक्षातील लोकांना पण हे वाटत आहे. पण कुणी बोलू शकत नाही. ही दरवाढ कमी झालीच पाहिजे ही माझीच नाही तर सर्वसामान्यांची भावना आहे. महागाईमुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त होऊन गेला आहे. ज्यावेळी राज्याचा अर्थसंकल्प मांडेन त्यावेळी कोणत्या गोष्टीचा टॅक्स वाढवणार आणि कोणता कमी करणार हे निश्चित सांगेन

राज्य सरकार विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत कोरोनाचे कारण पुढे करीत आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे याकडे लक्ष वेधले असता जर आम्ही घाबरलो असतो तर आम्ही राजीनामा देऊ दिला असता का? त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा दिला आहे. विरोधक सातत्याने हे सरकार तीन महिने चालेल, सहा महिने चालेल असे म्हणतात. विरोधक सारखे तीन महिने वाढवत आहे. आता सरकारला सव्वा वर्षे पूर्ण झाले आहे. त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकाल पूर्ण करेल. तिन्ही पक्ष एकोप्याने काम करीत आहेत. पवार साहेबांचे आम्ही मार्गदर्शनही घेत आहोत असे अजितदादा म्हणाले.---------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकारSanjay Rathodसंजय राठोडDhananjay Mundeधनंजय मुंडे