शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

काँग्रेसभवनमध्ये अवतरला ब्राह्मण महासंघ अन्...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 11:13 IST

ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आणि काँग्रेसच्या प्रमुखांमध्ये राजकीय चर्चा...

- राजू इनामदार

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक काँग्रेसभवनमध्ये सोमवारची सायंकाळ विशेष ठरली. येथे ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आणि काँग्रेसच्या प्रमुखांमध्ये राजकीय चर्चा झाली. मात्र, हीच संवादभेट दोन्ही संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण करणारी ठरली. या राजकीय वादंगानंतरही दोन्ही संघटनांचे प्रमुख मात्र यात काहीही गैर नाही यावर ठाम आहेत.

अशी झाली भेट

ब्राह्मण महासंघाला काँग्रेसभवनमधूनच भेटीचे निमंत्रण गेले होते. चहापानाला म्हणून बोलावण्यात आले होते. त्यानुसार महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे सोमवारी सायंकाळी काँग्रेसभवनमध्ये गेले. संघटनेचे विश्वस्त मनोज तारे, चैतन्य जोशी, संजय देशमुख, आशिष पेंढारकर हे देखील त्यांच्यासमवेत होते. ते काँग्रेसभवनात आल्यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासमवेत माजी आमदार दीप्ती चौधरी, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस संगीता तिवारी, अल्पसंख्याक आघाडीचे रफिक शेखदेखील होते.

काेण काय म्हणाले?

- काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘काँग्रेसचा हिंदूंना कधीही विरोध नाही. काँग्रेसचे सर्वोच्च नेते व राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वत: धर्म मानणारेच होते. मात्र, धार्मिक मांडणी, जातीयवाद, दंगेधोपे हे काँग्रेसला मान्य नाही. वैयक्तिक स्वरूपात सगळेच धर्म मानणारे असतात. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात समाजस्तरावर विचार करताना धार्मिक विचार करून चालणार नाही हीच काँग्रेसची विचारधारा आहे. सर्वच धर्म शांततेचा मार्ग सांगतात. आम्ही दवे यांना महात्मा गांधीजींची प्रतिमा भेट दिली आहे.

- ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले, ‘‘हिंदूंचा किंवा ब्राह्मणांचाही काँग्रेसला कधीही विरोध नव्हता व नाही. उलटपक्षी काँग्रेसचे बहुसंख्य नेते ब्राह्मणच होते. सध्या काहीजणांकडून गांधी, नेहरूंना जसे दुर्लक्षित केले जातेय ते सर्वसामान्य हिंदूंना मान्य नाही. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी सोरटी सोमनाथ मंदिराचा जीणोद्धार केला, पंडित नेहरूंनी अनेक विज्ञानवादी संस्था स्थापन केल्या. ज्याचा सर्वाधिक उपयोग ब्राह्मण समाजाला झाला. अयोध्येतील राम मंदिराचे कुलूपही राजीव गांधी यांनीच उघडले, हे आम्हाला विसरता येणार नाही. महात्मा गांधीजींची प्रतिमा मी आमच्या कार्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेशेजारी ठेवली आहे.’’

विरोध करणारे म्हणतात...

- दोन्ही संघटनांमधील या भेटीला विरोध असणारे खुलेपणाने काहीच बोलायला तयार नाहीत; मात्र काँग्रेसमधील विरोधकांचे म्हणणे आहे की, हिंदुत्ववादाबाबत कायम आग्रही असणाऱ्यांना कशासाठी बोलावले? का म्हणून त्यांच्याबरोबर चर्चा करायची? काँग्रेसची विचारधारा निधर्मी आहे. असे असताना असंगाबरोबर संग का करायचा?

- ब्राह्मण समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, स्थापनेपासून एका विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण, हिंदू समाजाला तुच्छ लेखणाऱ्यांबरोबर कशासाठी बसायचे? आता राजकीय दृष्ट्या अडचणीत आहेत म्हणून त्यांना ब्राह्मण समाजाबरोबर बोलावेसे वाटते, आपण त्याला कशासाठी बळी पडायचे?

शहराध्यक्ष म्हणून मी फक्त ब्राह्मण संघटनांनाच नाही, तर सर्वच समाजातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेसभवनमध्ये निमंत्रित करणार आहे. त्यांच्याबरोबर चर्चा व्हावी, असे माझे मत आहे. काँग्रेस नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा विचार करते. त्याच्याशी जुळणारा हा उपक्रम आहे. त्यांचे म्हणणे काय आहे, आपले म्हणणे काय आहे, हे चर्चेशिवाय समजणारच नाही, म्हणून ही चर्चा आहे.

- अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस

निमंत्रण नाकारून ताठपणा का दाखवायचा? तिथे गेलो याचा अर्थ आम्ही आमचे विचार सोडून दिले, असा होत नाही. अशा भेटी म्हणजे आमचे म्हणणे काय आहे हे सांगण्याची संधी असते. लवकरच आम्ही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचीही भेट घेणार आहोत. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही संघटनेच्या वतीने भेट घेतली. मला यात काहीही गैर वाटत नाही.

- आनंद दवे, अध्यक्ष, ब्राह्मण महासंघ

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसbrahman mahasanghब्राह्मण महासंघ