शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

काँग्रेसभवनमध्ये अवतरला ब्राह्मण महासंघ अन्...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 11:13 IST

ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आणि काँग्रेसच्या प्रमुखांमध्ये राजकीय चर्चा...

- राजू इनामदार

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक काँग्रेसभवनमध्ये सोमवारची सायंकाळ विशेष ठरली. येथे ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आणि काँग्रेसच्या प्रमुखांमध्ये राजकीय चर्चा झाली. मात्र, हीच संवादभेट दोन्ही संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण करणारी ठरली. या राजकीय वादंगानंतरही दोन्ही संघटनांचे प्रमुख मात्र यात काहीही गैर नाही यावर ठाम आहेत.

अशी झाली भेट

ब्राह्मण महासंघाला काँग्रेसभवनमधूनच भेटीचे निमंत्रण गेले होते. चहापानाला म्हणून बोलावण्यात आले होते. त्यानुसार महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे सोमवारी सायंकाळी काँग्रेसभवनमध्ये गेले. संघटनेचे विश्वस्त मनोज तारे, चैतन्य जोशी, संजय देशमुख, आशिष पेंढारकर हे देखील त्यांच्यासमवेत होते. ते काँग्रेसभवनात आल्यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासमवेत माजी आमदार दीप्ती चौधरी, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस संगीता तिवारी, अल्पसंख्याक आघाडीचे रफिक शेखदेखील होते.

काेण काय म्हणाले?

- काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘काँग्रेसचा हिंदूंना कधीही विरोध नाही. काँग्रेसचे सर्वोच्च नेते व राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वत: धर्म मानणारेच होते. मात्र, धार्मिक मांडणी, जातीयवाद, दंगेधोपे हे काँग्रेसला मान्य नाही. वैयक्तिक स्वरूपात सगळेच धर्म मानणारे असतात. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात समाजस्तरावर विचार करताना धार्मिक विचार करून चालणार नाही हीच काँग्रेसची विचारधारा आहे. सर्वच धर्म शांततेचा मार्ग सांगतात. आम्ही दवे यांना महात्मा गांधीजींची प्रतिमा भेट दिली आहे.

- ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले, ‘‘हिंदूंचा किंवा ब्राह्मणांचाही काँग्रेसला कधीही विरोध नव्हता व नाही. उलटपक्षी काँग्रेसचे बहुसंख्य नेते ब्राह्मणच होते. सध्या काहीजणांकडून गांधी, नेहरूंना जसे दुर्लक्षित केले जातेय ते सर्वसामान्य हिंदूंना मान्य नाही. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी सोरटी सोमनाथ मंदिराचा जीणोद्धार केला, पंडित नेहरूंनी अनेक विज्ञानवादी संस्था स्थापन केल्या. ज्याचा सर्वाधिक उपयोग ब्राह्मण समाजाला झाला. अयोध्येतील राम मंदिराचे कुलूपही राजीव गांधी यांनीच उघडले, हे आम्हाला विसरता येणार नाही. महात्मा गांधीजींची प्रतिमा मी आमच्या कार्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेशेजारी ठेवली आहे.’’

विरोध करणारे म्हणतात...

- दोन्ही संघटनांमधील या भेटीला विरोध असणारे खुलेपणाने काहीच बोलायला तयार नाहीत; मात्र काँग्रेसमधील विरोधकांचे म्हणणे आहे की, हिंदुत्ववादाबाबत कायम आग्रही असणाऱ्यांना कशासाठी बोलावले? का म्हणून त्यांच्याबरोबर चर्चा करायची? काँग्रेसची विचारधारा निधर्मी आहे. असे असताना असंगाबरोबर संग का करायचा?

- ब्राह्मण समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, स्थापनेपासून एका विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण, हिंदू समाजाला तुच्छ लेखणाऱ्यांबरोबर कशासाठी बसायचे? आता राजकीय दृष्ट्या अडचणीत आहेत म्हणून त्यांना ब्राह्मण समाजाबरोबर बोलावेसे वाटते, आपण त्याला कशासाठी बळी पडायचे?

शहराध्यक्ष म्हणून मी फक्त ब्राह्मण संघटनांनाच नाही, तर सर्वच समाजातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेसभवनमध्ये निमंत्रित करणार आहे. त्यांच्याबरोबर चर्चा व्हावी, असे माझे मत आहे. काँग्रेस नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा विचार करते. त्याच्याशी जुळणारा हा उपक्रम आहे. त्यांचे म्हणणे काय आहे, आपले म्हणणे काय आहे, हे चर्चेशिवाय समजणारच नाही, म्हणून ही चर्चा आहे.

- अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस

निमंत्रण नाकारून ताठपणा का दाखवायचा? तिथे गेलो याचा अर्थ आम्ही आमचे विचार सोडून दिले, असा होत नाही. अशा भेटी म्हणजे आमचे म्हणणे काय आहे हे सांगण्याची संधी असते. लवकरच आम्ही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचीही भेट घेणार आहोत. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही संघटनेच्या वतीने भेट घेतली. मला यात काहीही गैर वाटत नाही.

- आनंद दवे, अध्यक्ष, ब्राह्मण महासंघ

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसbrahman mahasanghब्राह्मण महासंघ