शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडूंचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:27 IST

जात, धर्माच्या आधारावर तरुणांमध्ये फूट पाडली जाईल, मतांसाठी विरोध होईल, या कारणामुळेच या निवडणुका लढण्याची गरज नाही

पुणे : निवडणुकांपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, अशी घोषणा केली होती. ती अद्यापही अमलात आणली नाही. शेतकऱ्यांनी यासाठी आंदोलन करू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, शेतकरी विभागला जाऊ नये, यासाठी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रहार पक्ष बहिष्कार टाकेल, अशी घोषणा संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी केली. जात, धर्माच्या आधारावर तरुणांमध्ये फूट पाडली जाईल, मतांसाठी विरोध होईल, या कारणामुळेच या निवडणुका लढण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात शुक्रवारी आयोजित शेतकरी हक्क परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार कैलास पाटील, बाळासाहेब देशमुख, शेतकरी नेते अजित नवले, अनिल घनवट, पत्रकार रमेश जाधव उपस्थित होते.

डिसेंबर दरम्यान होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा बच्चू कडू यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. पुण्यात झालेल्या शेतकरी हक्क परिषदेत या संदर्भात कडू यांनी घेतलेली भूमिका राजू शेट्टी यांनी मात्र पुढील बैठकीत विचार करूनच मांडू, असे स्पष्ट केले. मात्र, त्यावर कडू यांनी आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडू यांनी यापूर्वी रायगड आणि मोझरी येथे आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यानुसार राज्यातील वेगवेगळ्या शेतकरी संघटना पुण्यातील या शेतकरी हक्क परिषदेच्या निमित्ताने एकत्रित आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्यात येणाऱ्या लढाई शेतकऱ्यांची मते विभागली जाऊ नयेत. त्यामुळेच या निवडणुकांवर बहिष्कार टाकावा का, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारला. त्यावर कार्यकर्त्यांनी होकार देत त्याला सहमती दर्शवली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जात, धर्मावरच प्रचार केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणत्याही सत्ताधारी पक्षाला निवडणूक लढवायची नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातील तरुणांना मतांसाठी तोडले जाईल. त्याला शेतकरी बळी पडतील. सध्याचे राजकारण वाहत गेले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्रित होण्याची गरज असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. राजकारण्यांना मतदाराची भीती कायम असते. त्यामुळे बहिष्कारचे ब्रह्मास्त्र वापरणे आपल्या हाती असल्याचे कडू यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

टॅग्स :PuneपुणेBachhu Kaduबच्चू कडूMuncipal Corporationनगर पालिकाPoliticsराजकारणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुतीFarmerशेतकरी