शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडूंचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:27 IST

जात, धर्माच्या आधारावर तरुणांमध्ये फूट पाडली जाईल, मतांसाठी विरोध होईल, या कारणामुळेच या निवडणुका लढण्याची गरज नाही

पुणे : निवडणुकांपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, अशी घोषणा केली होती. ती अद्यापही अमलात आणली नाही. शेतकऱ्यांनी यासाठी आंदोलन करू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, शेतकरी विभागला जाऊ नये, यासाठी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रहार पक्ष बहिष्कार टाकेल, अशी घोषणा संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी केली. जात, धर्माच्या आधारावर तरुणांमध्ये फूट पाडली जाईल, मतांसाठी विरोध होईल, या कारणामुळेच या निवडणुका लढण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात शुक्रवारी आयोजित शेतकरी हक्क परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार कैलास पाटील, बाळासाहेब देशमुख, शेतकरी नेते अजित नवले, अनिल घनवट, पत्रकार रमेश जाधव उपस्थित होते.

डिसेंबर दरम्यान होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा बच्चू कडू यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. पुण्यात झालेल्या शेतकरी हक्क परिषदेत या संदर्भात कडू यांनी घेतलेली भूमिका राजू शेट्टी यांनी मात्र पुढील बैठकीत विचार करूनच मांडू, असे स्पष्ट केले. मात्र, त्यावर कडू यांनी आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडू यांनी यापूर्वी रायगड आणि मोझरी येथे आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यानुसार राज्यातील वेगवेगळ्या शेतकरी संघटना पुण्यातील या शेतकरी हक्क परिषदेच्या निमित्ताने एकत्रित आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्यात येणाऱ्या लढाई शेतकऱ्यांची मते विभागली जाऊ नयेत. त्यामुळेच या निवडणुकांवर बहिष्कार टाकावा का, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारला. त्यावर कार्यकर्त्यांनी होकार देत त्याला सहमती दर्शवली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जात, धर्मावरच प्रचार केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणत्याही सत्ताधारी पक्षाला निवडणूक लढवायची नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातील तरुणांना मतांसाठी तोडले जाईल. त्याला शेतकरी बळी पडतील. सध्याचे राजकारण वाहत गेले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्रित होण्याची गरज असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. राजकारण्यांना मतदाराची भीती कायम असते. त्यामुळे बहिष्कारचे ब्रह्मास्त्र वापरणे आपल्या हाती असल्याचे कडू यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

टॅग्स :PuneपुणेBachhu Kaduबच्चू कडूMuncipal Corporationनगर पालिकाPoliticsराजकारणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुतीFarmerशेतकरी