शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडूंचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:27 IST

जात, धर्माच्या आधारावर तरुणांमध्ये फूट पाडली जाईल, मतांसाठी विरोध होईल, या कारणामुळेच या निवडणुका लढण्याची गरज नाही

पुणे : निवडणुकांपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, अशी घोषणा केली होती. ती अद्यापही अमलात आणली नाही. शेतकऱ्यांनी यासाठी आंदोलन करू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, शेतकरी विभागला जाऊ नये, यासाठी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रहार पक्ष बहिष्कार टाकेल, अशी घोषणा संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी केली. जात, धर्माच्या आधारावर तरुणांमध्ये फूट पाडली जाईल, मतांसाठी विरोध होईल, या कारणामुळेच या निवडणुका लढण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात शुक्रवारी आयोजित शेतकरी हक्क परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार कैलास पाटील, बाळासाहेब देशमुख, शेतकरी नेते अजित नवले, अनिल घनवट, पत्रकार रमेश जाधव उपस्थित होते.

डिसेंबर दरम्यान होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा बच्चू कडू यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. पुण्यात झालेल्या शेतकरी हक्क परिषदेत या संदर्भात कडू यांनी घेतलेली भूमिका राजू शेट्टी यांनी मात्र पुढील बैठकीत विचार करूनच मांडू, असे स्पष्ट केले. मात्र, त्यावर कडू यांनी आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडू यांनी यापूर्वी रायगड आणि मोझरी येथे आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यानुसार राज्यातील वेगवेगळ्या शेतकरी संघटना पुण्यातील या शेतकरी हक्क परिषदेच्या निमित्ताने एकत्रित आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्यात येणाऱ्या लढाई शेतकऱ्यांची मते विभागली जाऊ नयेत. त्यामुळेच या निवडणुकांवर बहिष्कार टाकावा का, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारला. त्यावर कार्यकर्त्यांनी होकार देत त्याला सहमती दर्शवली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जात, धर्मावरच प्रचार केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणत्याही सत्ताधारी पक्षाला निवडणूक लढवायची नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातील तरुणांना मतांसाठी तोडले जाईल. त्याला शेतकरी बळी पडतील. सध्याचे राजकारण वाहत गेले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्रित होण्याची गरज असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. राजकारण्यांना मतदाराची भीती कायम असते. त्यामुळे बहिष्कारचे ब्रह्मास्त्र वापरणे आपल्या हाती असल्याचे कडू यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

टॅग्स :PuneपुणेBachhu Kaduबच्चू कडूMuncipal Corporationनगर पालिकाPoliticsराजकारणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुतीFarmerशेतकरी