शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

कोरोनाच्या संकटातही 'बळीराजाची सुपर कामगिरी' ; गतवर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या क्षेत्रात दहा पटीने भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 6:43 AM

कोरोना संकटाचे ढग संपूर्ण देशावर गडद होत असतानाच यंदा कृषी क्षेत्राने चांगलीच भरारी घेतली आहे...

ठळक मुद्देतुर, मूग, उडीद, बाजरी व सोयाबीनची शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड 

सुषमा नेहरकर -शिंदेपुणे : संपूर्ण देशावर कोरोनाच्या संकटाचे ढग गडद होत असतानाच यंदा कृषी क्षेत्राने चांगलीच भरारी घेतली आहे. कोरोनामुळे सर्व क्षेत्रातील लोकांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली असतानाच, एकट्या पुणे जिल्ह्यात यंदा खरीप पिकांच्या क्षेत्रात सरासरी तब्बल दहा पट्टीने वाढ झाली आहे. गतवर्षी आतापर्यंत सरासरी 12 हजार 239 हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. यंदा यामध्ये मोठी वाढ होऊन तब्बल 2 लाख 30 हजार 468 हेक्टरवर विविध पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. 

संपूर्ण जुलै महिना पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील भाताची पुर्नलागवड लांबणीवर पडल्या असून, भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. परंतु जुन महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात प्रथमच बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग आणि सोयाबीनच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात तब्बल दहा पट्टीने वाढ झाली आहे. 

यंदा कोरोनामुळे सर्वच क्षेत्र संकटा सापडले असले तरी कृषी क्षेत्राने शेतक-यांना चांगला आधार दिला आहे. त्यात यंदा जुन महिन्यांत सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने आता पर्यंत सरासरीच्या 125 टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. गत वर्षी आता पर्यंत 12 हजार 239 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. जिल्ह्यात सुमारे 1लाख 84 हजार 274 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या होतात. यामध्ये जिल्ह्यात प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यात खरीपाचे क्षेत्र अधिक आहे. तर दौंड, बारामती, इंदापूर आणि पुरंदर हे तालुके रब्बीचे तालुके म्हणून ओळखले जातात. परंतु जुन महिन्या चक्रीवादळात संपूर्ण जिल्ह्यातच चांगला पाऊस झाला. यामुळे यंदा अनेक वर्षांनंतर रब्बीच्या तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात बाजरी, तूर, मूग उडीद आणि सोयाबीनची लागवड झाली आहे. यामुळेच जिल्ह्याच्या खरीपाच्या लागवडी क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. ---- पावसाने ओढ दिल्याने भाताची पुनर्लागवड लांबणीवर पुणे जिल्ह्यात भाताचे सरासरी लागवड क्षेत्र 57 हजार 964 हेक्टर ऐवढे आहे . त्यापैकी आता पर्यंत केवळ 20 हजार 743 हेक्टर क्षेत्रावरच भाताची पुर्नलागवड झाली आहे. संपूर्ण जुलै महिन्या पावसाने ओढ दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, पाऊस आणखी लांबल्यास भात उत्पादक शेतक-यासह सर्वच शेतकरी अडचणीत सापडतील.----जिल्ह्यात प्रमुख खरीप पिकांची लागवडची माहिती पिकाच नाव                सरासरी क्षेत्र          प्रत्यक्ष पेरणी       टक्केभात                            57964                    20743              36बाजरी                         38761                    52614               136तूर                              1920                       9011                469मूग                           13804                     14838              107उडीद                        1557                         2479                159 भुईमूग                    16090                       14886               93 सोयाबीन                17472                        19932                 114

टॅग्स :PuneपुणेCrop Insuranceपीक विमाagricultureशेतीcorona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीRainपाऊस