शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे या नेत्याला घ्या, त्या नेत्याला घ्या, हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा असे प्रयत्न महाराष्ट्रात अयशस्वीच

By नितीन चौधरी | Updated: February 12, 2024 18:46 IST

भाजपच्या पायाखालची वाळू सरककल्याने राजकीय व्यक्तींसह अराजकीय व्यक्तींवरही कारवाई करीत आहे - प्रकाश आंबेडकर

पुणे: काँग्रेसचे आमदार भाजपाच्या संपर्कात आहे अशीही चर्चा आहे. राष्ट्रवादीचे आमदार अपात्रतेप्रकरनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे भाजपला आपण सुरक्षित होऊ असे वाटत असेल तर परिस्थिती कठीण दिसत आहे. कोणताही नेता कोणत्याही पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यावर फार फरक पडत नाही. पक्ष म्हणून कायम राहतो. एखादा दुसरा जाणे हे धक्कादायक आहे. पण त्यामुळे काँग्रेसवर फार परिणाम होईल असे वाटत नाही,’ असे मत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. 

कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे सुनावणीसाठी आंबेडकर पुण्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने काय होईल याबाबत ते म्हणाले, निवडणूक जशा जवळ येतात तसे राजकारण घडत राहील. भाजपाने या नेत्याला घ्या, त्या नेत्या घ्या. हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा असे कितीही प्रयत्न केले तरी भाजप महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही. पायाखालील वाळू सरककल्याने भाजप राजकीय व्यक्तींसह अराजकीय व्यक्तींवरही कारवाई करीत आहे.  

 राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले, ‘मतदारावर फारसा परिणाम होईल असे वाटत नाही. ६० ते ७० टक्के मतदारांनी आपले मत कोणाला द्यायचे हे पक्के केले आहे. त्यामुळे त्यांना जे हवय ते होईल असे वाटते. राज्यातील नागरिकांची मानसिकता बदलली आहे. मी अनेक दौरे केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा कधीही वादग्रस्त नव्हता अशी नागरिकांची मानसिकता समोर आली आहे. या काळात पक्ष फोडणे, गोळीबार करणे, संपविणे हे फार मोठ्या प्रमाणात चालले आहे. जे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारे नाही. तो त्याच्याशी सहमत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तो निवडणुकीची वाट पाहत आहे.’

‘मोदी हे रिंगमास्टर आहेत. काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षातील चौकशीत अडकलेले नेते असतील त्यांना ते नाचवित आहेत. देशात ४५० अराजकीय व्यक्तीवर धाडी घालण्यात आल्या आहेत. भाजपाच्या पायाखालील वाळू सरकली आहे. आम्ही चारशेच्या पुढे जाऊ असे ते कितीही म्हणत असतील तर ते एका भीतीपोटी आहे. भीती निर्माण करण्यासाठी राजकीय तसेच अराजकीय व्यापारी, मत नोंदवू शकणाऱ्या व्यक्तींवरही ते धाडी घालत आहेत,’ अशा शब्दांत आंबेडकर यांनी भाजपला लक्ष्य केले. 

महाविकास आघाडीत चर्चा कोणाशी झाली का याबाबत विचारता ते म्हणाले, ‘माझे अद्याप कोणाशीही बोलणे झाले नाही. जागा वाटपाचा आराखडा तयार करू आणि नंतर बोलणी करू असे ठरले आहे. गेल्या दोन दिवसांत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात चांगली चर्चा झाली आहे. त्यांचे काय ठरले हे अद्याप कळले नाही. एकूण परिस्थिती पाहता जागा वाटप हे आयाराम गयाराम होण्याची शक्यता आहे. ते गयाराम गेल्यावर चर्चेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.’

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण