शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे या नेत्याला घ्या, त्या नेत्याला घ्या, हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा असे प्रयत्न महाराष्ट्रात अयशस्वीच

By नितीन चौधरी | Updated: February 12, 2024 18:46 IST

भाजपच्या पायाखालची वाळू सरककल्याने राजकीय व्यक्तींसह अराजकीय व्यक्तींवरही कारवाई करीत आहे - प्रकाश आंबेडकर

पुणे: काँग्रेसचे आमदार भाजपाच्या संपर्कात आहे अशीही चर्चा आहे. राष्ट्रवादीचे आमदार अपात्रतेप्रकरनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे भाजपला आपण सुरक्षित होऊ असे वाटत असेल तर परिस्थिती कठीण दिसत आहे. कोणताही नेता कोणत्याही पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यावर फार फरक पडत नाही. पक्ष म्हणून कायम राहतो. एखादा दुसरा जाणे हे धक्कादायक आहे. पण त्यामुळे काँग्रेसवर फार परिणाम होईल असे वाटत नाही,’ असे मत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. 

कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे सुनावणीसाठी आंबेडकर पुण्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने काय होईल याबाबत ते म्हणाले, निवडणूक जशा जवळ येतात तसे राजकारण घडत राहील. भाजपाने या नेत्याला घ्या, त्या नेत्या घ्या. हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा असे कितीही प्रयत्न केले तरी भाजप महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही. पायाखालील वाळू सरककल्याने भाजप राजकीय व्यक्तींसह अराजकीय व्यक्तींवरही कारवाई करीत आहे.  

 राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले, ‘मतदारावर फारसा परिणाम होईल असे वाटत नाही. ६० ते ७० टक्के मतदारांनी आपले मत कोणाला द्यायचे हे पक्के केले आहे. त्यामुळे त्यांना जे हवय ते होईल असे वाटते. राज्यातील नागरिकांची मानसिकता बदलली आहे. मी अनेक दौरे केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा कधीही वादग्रस्त नव्हता अशी नागरिकांची मानसिकता समोर आली आहे. या काळात पक्ष फोडणे, गोळीबार करणे, संपविणे हे फार मोठ्या प्रमाणात चालले आहे. जे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारे नाही. तो त्याच्याशी सहमत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तो निवडणुकीची वाट पाहत आहे.’

‘मोदी हे रिंगमास्टर आहेत. काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षातील चौकशीत अडकलेले नेते असतील त्यांना ते नाचवित आहेत. देशात ४५० अराजकीय व्यक्तीवर धाडी घालण्यात आल्या आहेत. भाजपाच्या पायाखालील वाळू सरकली आहे. आम्ही चारशेच्या पुढे जाऊ असे ते कितीही म्हणत असतील तर ते एका भीतीपोटी आहे. भीती निर्माण करण्यासाठी राजकीय तसेच अराजकीय व्यापारी, मत नोंदवू शकणाऱ्या व्यक्तींवरही ते धाडी घालत आहेत,’ अशा शब्दांत आंबेडकर यांनी भाजपला लक्ष्य केले. 

महाविकास आघाडीत चर्चा कोणाशी झाली का याबाबत विचारता ते म्हणाले, ‘माझे अद्याप कोणाशीही बोलणे झाले नाही. जागा वाटपाचा आराखडा तयार करू आणि नंतर बोलणी करू असे ठरले आहे. गेल्या दोन दिवसांत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात चांगली चर्चा झाली आहे. त्यांचे काय ठरले हे अद्याप कळले नाही. एकूण परिस्थिती पाहता जागा वाटप हे आयाराम गयाराम होण्याची शक्यता आहे. ते गयाराम गेल्यावर चर्चेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.’

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण