शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

भाजपला देशातील जनतेची नसच सापडली नसल्याने कायदे मागे घेतले; पुण्यातून काँग्रेसची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 16:08 IST

कृषी कायदे रद्द केल्याचा जल्लोष करत आंदोलनात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

पुणे: संसदेत या कायद्यांना सर्वप्रथम काँग्रेसनेच विरोध केला. केंद्रातील भारतीय जनता पक्षच्या सरकारला या देशातील जनतेची नस सापडलेली नाही. हेच त्यांच्या कायदे मागे घेण्याच्या निर्णयावरून सिद्ध झाले असे मत काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले. काँग्रेस भवनच्या आवारात फटाके फोडून केंद्र सरकारच्या या माघारीचा जल्लोष व आंदोलन शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

बागवे म्हणाले, काँग्रेस नेहमीच देशातील सर्व स्तरामधील जनतेला बरोबर घेऊन काम करत असते. जनतेचे काय म्हणणे आहे ते ऐकणे, त्याचा आदर करणे कोणत्याही सरकारचे कामच आहे. त्याऐवजी केंद्र सरकार दडपशाहीने त्यांचे म्हणणे शेतकऱ्यांवर लादत होते.

''सरकारने आंदोलन शेतकऱ्यांचा अंत पाहिला. वर्षभऱ् दुर्लक्ष केले. त्यात अनेक शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले, तरीही केंद्र सरकारला जाग आली नाही. आताही पंजाब, उत्तरप्रदेश निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय झाला आहे, पण उशीरा व कोणत्याही कारणाने का होईना त्यांनी शहाणपण दा‌खवले हे महत्वाचे असेे पदाधिकारी म्हणाले.'' 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, गटनेते आबा बागूल कमल व्यवहारे, संजय बालगुडे, रफिक शेख, लता राजगुरू, नीता रजपूत, दत्ता बहिरट, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, बाळासाहेब अमराळे व पक्षाचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आंदोलनात मरण पावलेल्या सर्व शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीBJPभाजपाcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार