शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

भाजपला देशातील जनतेची नसच सापडली नसल्याने कायदे मागे घेतले; पुण्यातून काँग्रेसची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 16:08 IST

कृषी कायदे रद्द केल्याचा जल्लोष करत आंदोलनात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

पुणे: संसदेत या कायद्यांना सर्वप्रथम काँग्रेसनेच विरोध केला. केंद्रातील भारतीय जनता पक्षच्या सरकारला या देशातील जनतेची नस सापडलेली नाही. हेच त्यांच्या कायदे मागे घेण्याच्या निर्णयावरून सिद्ध झाले असे मत काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले. काँग्रेस भवनच्या आवारात फटाके फोडून केंद्र सरकारच्या या माघारीचा जल्लोष व आंदोलन शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

बागवे म्हणाले, काँग्रेस नेहमीच देशातील सर्व स्तरामधील जनतेला बरोबर घेऊन काम करत असते. जनतेचे काय म्हणणे आहे ते ऐकणे, त्याचा आदर करणे कोणत्याही सरकारचे कामच आहे. त्याऐवजी केंद्र सरकार दडपशाहीने त्यांचे म्हणणे शेतकऱ्यांवर लादत होते.

''सरकारने आंदोलन शेतकऱ्यांचा अंत पाहिला. वर्षभऱ् दुर्लक्ष केले. त्यात अनेक शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले, तरीही केंद्र सरकारला जाग आली नाही. आताही पंजाब, उत्तरप्रदेश निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय झाला आहे, पण उशीरा व कोणत्याही कारणाने का होईना त्यांनी शहाणपण दा‌खवले हे महत्वाचे असेे पदाधिकारी म्हणाले.'' 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, गटनेते आबा बागूल कमल व्यवहारे, संजय बालगुडे, रफिक शेख, लता राजगुरू, नीता रजपूत, दत्ता बहिरट, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, बाळासाहेब अमराळे व पक्षाचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आंदोलनात मरण पावलेल्या सर्व शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीBJPभाजपाcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार