शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

भाजपा - शिवसेना युतीला ' धडकी ' पुण्याच्या पाण्याची.. आघाडीला 'संधी ' बापटांना घेरण्याची..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 20:03 IST

पालिका व जलसंपदा यात सातत्याने वाद होत असताना बापट यांनी मार्ग काढण्याऐवजी पुणेकरांनाच पाणी जपून वापरा असा सल्ला देण्याची भूमिका जाहीरपणे घेतली.

ठळक मुद्देजलसंपदाने तीन वेळा थेट पालिकेच्या पाणी उपसा केंद्रात जाऊन पंप बंद करण्याची केली कारवाई पालिकेला थेट घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांकडे धाव

पुणे : पालकमंत्री म्हणून पुण्याच्या पाण्यावर घेतलेली भूमिका भाजपा शिवसेना युतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांना महाग पडण्याची चिन्हे  आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी बापट यांना पाणी विषयावर त्यांनी घेतलेल्या निर्णयांवरून निवडणुकीच्या रिंगणात घेरण्याची चिन्हे आहेत. पुण्याचा पाणी कोटा वाढवून देण्याचा प्रश्न अजूनही अनिर्णित आहे. तो वाढवून मिळत नाही व मिळते आहे ते पाणी पुरत नाही अशी पुण्याची स्थिती आहे. त्यावर पालिका व जलसंपदा यात सातत्याने वाद होत असताना बापट यांनी मार्ग काढण्याऐवजी पुणेकरांनाच पाणी जपून वापरा असा सल्ला देण्याची भूमिका जाहीरपणे घेतली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुणेकरांना जास्त पाणी लागते अशी एकदा नव्हे तर अनेकदा टीका केला. त्याही वेळी पुणेकरांची बाजू घेण्याऐवजी बापट यांनी काहीच भूमिका न घेता मौन बाळगणे पसंत केले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी त्यावरून त्याचवेळी बापट यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना लक्ष्य केले होते.त्यानंतरही कालवा समितीच्या बैठकीत पुण्यावर पाण्यासाठी अन्याय होत असताना बापट व भाजपाचेही आमदार शांत बसले. परतीच्या पावसावर भरोसा ठेवून गरज नसताना धरणातील पाणी कालव्यात सोडले गेले त्यालाही बापट यांनी कधी हरकत घेतली नाही, उलट त्यांच्याच संमतीने दौंडचे आमदार राहूल कूल यांच्या मदतीसाठी म्हणून पाणी सोडले जात असल्याचे बोलले जात होते, त्याला बापट यांनी कधीच हरकत घेतली नाही. आता अमदार कूल यांच्या पत्नी कांचन बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार असल्यामुळे बापट त्यावेळी शांत का बसले होते याचा उलगडा होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे. आता लोकसभेला बापट भाजपाची उमेदवारी करत असताना नेमक्या पाण्याच्याच मुद्द्यावर त्यांना कचाट्यात पकडण्याची आघाडी रणनिती आहे. लोकसंख्येच्या आधारावर पुण्याचा पाणी कोटा जलसंपदाकडून वाढवून घेण्याची मागणी होत असताना त्यावर बापट यांनी काहीच केले नाही. जलसंपदाकडून लोकसंख्येचे पुरावे द्या, आधारकार्ड सादर करा, तरंगत्या लोकसंख्येची निश्चित आकडेवारी द्या असे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत पालिकेला त्रासच दिला गेला आहे. तसेच जलसंपदाने तीन वेळा थेट पालिकेच्या पाणी उपसा केंद्रात जाऊन पंप बंद करण्याची कारवाई केली तरीही बापट यांनी त्यावर काहीच केले नाही. पालिकेला थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घ्यावी लागली. हे सर्व मुद्दे प्रचारात उपस्थित करून बापट यांना घेरण्याचा विचार आघाडीत सुरू आहे. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक