शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

भाजपा - शिवसेना युतीला ' धडकी ' पुण्याच्या पाण्याची.. आघाडीला 'संधी ' बापटांना घेरण्याची..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 20:03 IST

पालिका व जलसंपदा यात सातत्याने वाद होत असताना बापट यांनी मार्ग काढण्याऐवजी पुणेकरांनाच पाणी जपून वापरा असा सल्ला देण्याची भूमिका जाहीरपणे घेतली.

ठळक मुद्देजलसंपदाने तीन वेळा थेट पालिकेच्या पाणी उपसा केंद्रात जाऊन पंप बंद करण्याची केली कारवाई पालिकेला थेट घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांकडे धाव

पुणे : पालकमंत्री म्हणून पुण्याच्या पाण्यावर घेतलेली भूमिका भाजपा शिवसेना युतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांना महाग पडण्याची चिन्हे  आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी बापट यांना पाणी विषयावर त्यांनी घेतलेल्या निर्णयांवरून निवडणुकीच्या रिंगणात घेरण्याची चिन्हे आहेत. पुण्याचा पाणी कोटा वाढवून देण्याचा प्रश्न अजूनही अनिर्णित आहे. तो वाढवून मिळत नाही व मिळते आहे ते पाणी पुरत नाही अशी पुण्याची स्थिती आहे. त्यावर पालिका व जलसंपदा यात सातत्याने वाद होत असताना बापट यांनी मार्ग काढण्याऐवजी पुणेकरांनाच पाणी जपून वापरा असा सल्ला देण्याची भूमिका जाहीरपणे घेतली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुणेकरांना जास्त पाणी लागते अशी एकदा नव्हे तर अनेकदा टीका केला. त्याही वेळी पुणेकरांची बाजू घेण्याऐवजी बापट यांनी काहीच भूमिका न घेता मौन बाळगणे पसंत केले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी त्यावरून त्याचवेळी बापट यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना लक्ष्य केले होते.त्यानंतरही कालवा समितीच्या बैठकीत पुण्यावर पाण्यासाठी अन्याय होत असताना बापट व भाजपाचेही आमदार शांत बसले. परतीच्या पावसावर भरोसा ठेवून गरज नसताना धरणातील पाणी कालव्यात सोडले गेले त्यालाही बापट यांनी कधी हरकत घेतली नाही, उलट त्यांच्याच संमतीने दौंडचे आमदार राहूल कूल यांच्या मदतीसाठी म्हणून पाणी सोडले जात असल्याचे बोलले जात होते, त्याला बापट यांनी कधीच हरकत घेतली नाही. आता अमदार कूल यांच्या पत्नी कांचन बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार असल्यामुळे बापट त्यावेळी शांत का बसले होते याचा उलगडा होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे. आता लोकसभेला बापट भाजपाची उमेदवारी करत असताना नेमक्या पाण्याच्याच मुद्द्यावर त्यांना कचाट्यात पकडण्याची आघाडी रणनिती आहे. लोकसंख्येच्या आधारावर पुण्याचा पाणी कोटा जलसंपदाकडून वाढवून घेण्याची मागणी होत असताना त्यावर बापट यांनी काहीच केले नाही. जलसंपदाकडून लोकसंख्येचे पुरावे द्या, आधारकार्ड सादर करा, तरंगत्या लोकसंख्येची निश्चित आकडेवारी द्या असे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत पालिकेला त्रासच दिला गेला आहे. तसेच जलसंपदाने तीन वेळा थेट पालिकेच्या पाणी उपसा केंद्रात जाऊन पंप बंद करण्याची कारवाई केली तरीही बापट यांनी त्यावर काहीच केले नाही. पालिकेला थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घ्यावी लागली. हे सर्व मुद्दे प्रचारात उपस्थित करून बापट यांना घेरण्याचा विचार आघाडीत सुरू आहे. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक