शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

भारत जोडो यात्रा सुरू असतानाही ७ पैकी ५ जागा भाजपला मिळाल्या - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 20:38 IST

राहुल गांधींना ’प्रोजेक्ट’ करण्यासाठीच काँग्रेसची ’भारत जोडो यात्रा

पुणे: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न काँग्रेसने आत्तापर्यंत तेरा ते चौदा वेळा केला आहे. ‘भारत जोडो यात्रा’ ही राहुल गांधी यांना प्रोजेक्ट करण्यासाठीच आहे. पण अशा प्रयोगानंतरही काँग्रेसच्या खासदारांची संख्या 40 ते 50 च्या वर जात नाही. शिवाय त्यांचे वर्चस्व असलेल्या राज्याची संख्या एक दोनच्या वर जात नाही, अशी टिका जिल्हयाचे पालकमंत्री आणि च्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रा’चे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, कोणत्याही पक्षाने हार न मानता सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. ही यात्रा सुरू असतानाही सात पैकी पाच जागा भाजपला मिळाल्या, गुजरात आणि हिमाचलमध्येही आगामी काळात असेच दिसेल.

एकनाथ शिंदे यांच्या आमदार व मंत्र्यांना विनाकारण खोका संस्कृतीवरून टार्गेट केले जात आहे. शिवसेना ही आज पहिल्यांदा फोडली का? शिवसेनेतून भुजबळांना, गणेश नाईक, नारायण राणे यांना कोणी बाहेर काढले? महाराष्ट्रात आमदार फोडण्याची, खरेदी करण्याची संस्कृती कोणी सुरू केली? असा प्रश्न विचारून त्यावेळी ‘खोका' नव्हता तर ‘पेटी' शब्द होता. त्यावेळी त्यांना ’पेट्या' दिल्या असतील, असा आरोप पाटील यांनी यावेळी केला.

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याला कोणाची सहमती नाही. सत्तारांनी माफी मागावी असे मुख्यमंत्र्यांनीही त्यांना सांगितले आहे. त्याप्रमाणे माफी मागितलीही गेली. त्यामुळे दिलगिरी व्यक्त केल्यानंतर विषय संपवला पाहिजे, असे माझे मत आहे, असे पाटील म्हणाले.

राज्यातील राजकीय संस्कृती हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. काय बोलायचे, कसे वागायचे याची एक आचारसंहिता सगळ्या पक्षांनी एकत्र बसून बनवायला हवी असे मला वाटते. कोणीतरी हे बनवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

’हर हर महादेव' या चित्रपटाला होणा-या विरोधाबाबत बोलताना पाटील म्हणाले की, याविषयी तपशीलवार माहिती आपल्याला नाही. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा टेंभा मिरवणा-यांनी दुस-याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे कारण नाही. त्यासाठी कायदाही हातात घ्यायची आणि ’हम करे सो कायदा' असेही म्हणण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

समझने वालोंको इशारा काफी है

शिवसेना फोडणारे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत का, असे विचारले असता, समझने वालोंको इशारा काफी है. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात टोप्या फेकण्याचे काम केले आहे., ज्याच्या डोक्यावर बसेल ते बसेल.' अशी मिश्किल् टिप्पणी पाटील यांनी केली.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा