शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

"भाजप राजकीय फायद्यासाठी मराठा आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर करते राज्य शासनालाच बदनाम"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 16:48 IST

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा आरोप, तर मराठा समाजाला आरक्षण मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यात कोणीही आडकाठी आणू नये, अशी त्यांची स्पष्ट भूमिका

ठळक मुद्देकेंद्राने घटनादुरुस्ती केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, ओबीसींची जातनिहाय स्वतंत्र जनगणना करा

पुणे: मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून मराठा समाज आणि ओबीसींची देशपातळीवर जातनिहाय जनगणना केल्यास सर्वांनाच न्याय मिळेल. परंतु राज्यातील भारतीय जनता पक्ष राजकीय फायदा घेण्यासाठी दोन्ही समाजाच्या प्रश्नांवर राज्य शासनाला बदनाम करत आहे. असा आरोप राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यात कोणीही आडकाठी आणू नये, अशी विनंती करतच राज्यातील प्रत्येक जात, घटकाला आपल्या न्याय, हक्क, आरक्षण आदी विविध मागण्यांसाठी लढण्याचा अधिकार असल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

अभय बंग महान जगव्यापी सामाजिक नेते

राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली. यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकार आणि तुमच्यावर टीका केली. या प्रश्नाला उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, अभय बंग हे महान सामाजिक नेते, चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांच्या अफाट प्रयत्नामुळे महाराष्ट्र व्यसनमुक्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात त्यांच्यामुळे एकही माणूस तंबाखू अथवा सिगारेट पित नाही. त्यामुळे त्यांना बोलण्याचा, टीका करण्याचा पूर्ण अधिकार असल्याची मिश्किल टिपणी त्यांनी यावेळी केली. 

रस्त्यावर बसणाऱ्या वि'स्मृती'बाई सध्या कुठे आहेत ?

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात ६०-७० रुपये पेट्रोल असताना भाजपच्या स्मृती इराणी या रस्त्यावर बसून आंदोलन करत होत्या. आता त्यांच्याच पक्षाचे सरकार असताना पेट्रोलचे भाव १०५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, त्यावर आता त्या वि'स्मृती'बाई कुठे आहेत. त्या बोलत नाहीत. आता त्या कुठे गायब झाल्या आहेत. आम्हाला सापडल्या की त्यांना याबाबत आम्ही आठवण करून देऊ, असा हल्ला वडेट्टीवार यांनी केला.

लोणावळ्यात ओबीसींचा राज्यस्तरीय मेळावा घेणार

राज्यातील ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी तसेच समाजाच्या इतर विविध मागण्यांसाठी येत्या २६ आणि २७ जूनला लोणावळा येथे मेळावा घेणार आहे. त्यात विविध गोष्टींची चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाMLAआमदार