शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भाजपा पुण्याची फसवणूक करत आहे : काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 6:33 PM

भाजपा फसवणूक करत आहे, हे विविध प्रश्नांच्या माध्यमातून नागपूर अधिवेशनात उघड करणार, असे काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अनंत गाडगीळ यांनी सांगितले.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी ही या शहराची आणखी एक फसवणूक : गाडगीळ'वाहतुकीबाबतही सरकारचे पुण्याकडे दुर्लक्षच, त्याचाही जाब विचारू'

पुणे : एक केंद्रीय मंत्री, राज्यात दोन मंत्री, त्याशिवाय ६ आमदार, १०१ नगरसेवक, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता असे असूनही भारतीय जनता पार्टी पुणेकरांची फसवणूक करत आहे हे मी विविध प्रश्नांच्या माध्यमातून नागपूर अधिवेशनात उघड करणार आहे असे काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अनंत गाडगीळ यांनी सांगितले. शहराच्या एकाही समस्येवर राज्य सरकार काम करायला किंवा निधी द्यायला तयार नाही हे पुणेकरांच्या नजरेस आणणार आहे असे ते म्हणाले.नागपूरचे हे अधिवेशन फक्त १० दिवसांचे आहे. त्याची मुदत वाढवावी अशी मागणी काँग्रेसने केली होती, मात्र ती अमान्य करण्यात आली. त्यामुळे आहे त्या दिवसांमध्येच समस्या मांडाव्या लागणार आहे. प्रामुख्याने कचरा प्रश्नाबाबत पुणेकरांची फसवणूक झाली आहे. राज्य सरकारच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांनी डेपोसाठी कायम स्वरूपी जागा मिळवून देऊ असा शब्द दिला होता. अजूनतरी त्यांनी तो पाळलेला नाही. ही समस्या बिकटच होत चालली आहे असे गाडगीळ म्हणाले.स्मार्ट सिटी ही या शहराची आणखी एक फसवणूक. त्यासाठी महापालिकेचे अधिकार कमी करून स्वतंत्र कंपनी स्थापन केली. या कंपनीचा अहवाल नुकताच बाहेर आला, त्यात ५२ पैकी एखादा प्रकल्प वगळता काहीही सुरू झालेले नाही. सल्लागार कंपन्याचे काम असमाधानकारक असताना त्यांच्यावर मात्र कोट्यवधी रूपये उधळले जात आहेत. ही कंपनी नक्की करते काय, कोणते काम करणार आहे, काही करते आहे किंवा नाही याबाबत विचारणा करणार आहे.नागपूरच्या मेट्रोची ट्रायल सुरू होणार आहे, पुण्याच्या मेट्रो चा एक खांबही अजून उभा राहिलेला नाही. हा दुजाभावच आहे व कोणीही त्याविरोधात आवाज उठवत नाही, म्हणून अन्याय वाढतच चालला आहे. वास्तविक नागपूरच्या तुलनेत पुण्याला मेट्रो आधी असणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. हा विषय अधिवेशनात उपस्थित नक्की करू. पुणेकरांच्या भावना सरकारच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे, अन्यथा यापुढेही असेच होत राहील.वाहतुकीबाबतही सरकारचे पुण्याकडे दुर्लक्षच झाले आहे, त्याचाही जाब विचारू असे गाडगीळ म्हणाले. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवून द्यावी, अशी अनेक वर्षे पुण्यातून मागणी होत आहे, मात्र सरकार त्यासाठी काहीही करत नाही. महापालिकेने त्यांचे असलेले वाहतूक सहायक काढून टाकले. त्यामुळे अडचणीत आणखी भर पडली आहे. या सर्वच गोष्टींबाबत अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसPuneपुणेnagpurनागपूर