शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला काँग्रेसचे नेते पक्षात घेतल्याशिवाय एकही निवडणूक लढवता येत नाही - हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 18:04 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांनी थोडे मागे वळून पाहिले तर अर्ध्याहून अधिक मंत्री काँग्रेस पक्षातून घेतलेलेच आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल

पुणे: काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा करणारा भारतीय जनता पक्ष काँग्रेसयुक्त झाला आहे. काँग्रेसचा नेते पक्षात घेतल्याशिवाय त्यांना एकही निवडणूक लढवता येत नाही, हीच वस्तुस्थिती आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप मतांवर डल्ला मारत आहेत. विधानसभा निवडणुकीत मतांची अशी चोरी करूनच ते सत्तेवर आले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

खडकवासल्यात पक्षाने आयोजित केलेल्या दोनदिवसीय पदाधिकारी कार्यशाळेच्या उद्घाटनाआधी पत्रकारांबरोबर संवाद साधताना सपकाळ यांनी भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले, काँग्रेसला गळती लागली, हा विरोधकांचा कांगावा आहे. काँग्रेस पक्ष हा विचारधारा असलेला पक्ष आहे. या विचारधारेला धुडकावून लावणारे नेते पक्षाला नकोच आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोडे मागे वळून पाहिले तर अर्ध्याहून अधिक मंत्री काँग्रेस पक्षातून घेतलेलेच आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल. ही भाजपची शोकांतिका आहे.

तुमच्याकडे १ कोटी कार्यकर्ते असल्याचे सांगता, तर मग नेते कशासाठी आयात करता? असा प्रश्न सपकाळ यांनी भाजपला केला. राज्य सरकार शेतकरी विरोधी धोरणे राबवत आहेत, याचे उदाहरण देताना माजी मंत्री सतेज पाटील यांनी ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स जोडण्याबाबतच्या सरकारच्या निर्णयाबाबत सांगितले. याचा भार शेतकऱ्यांवरच पडणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या सरकारमध्ये सत्तेचा हावरटपणा सुरू असल्याची टीका केली.

कबुतरखाना...

मुंबईत सुरू असलेल्या कबुतरखान्यावरही सपकाळ यांनी भाष्य केले. कबुतरांना जगण्याचा अधिकार आहे, तसाच नागरिकांनाही जगण्याचा अधिकार आहे. तज्ज्ञ काय म्हणतात त्याकडे दुर्लक्ष करून सरकार कबुतरखाने मतांसाठी म्हणून वाचवत आहे, अशी टीका त्यांनी केली. नागरिकांना कबुतरांमुळे होत असलेल्या जीवघेण्या आजारांचा सरकारने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाMahayutiमहायुती