शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

भाजपला काँग्रेसचे नेते पक्षात घेतल्याशिवाय एकही निवडणूक लढवता येत नाही - हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 18:04 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांनी थोडे मागे वळून पाहिले तर अर्ध्याहून अधिक मंत्री काँग्रेस पक्षातून घेतलेलेच आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल

पुणे: काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा करणारा भारतीय जनता पक्ष काँग्रेसयुक्त झाला आहे. काँग्रेसचा नेते पक्षात घेतल्याशिवाय त्यांना एकही निवडणूक लढवता येत नाही, हीच वस्तुस्थिती आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप मतांवर डल्ला मारत आहेत. विधानसभा निवडणुकीत मतांची अशी चोरी करूनच ते सत्तेवर आले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

खडकवासल्यात पक्षाने आयोजित केलेल्या दोनदिवसीय पदाधिकारी कार्यशाळेच्या उद्घाटनाआधी पत्रकारांबरोबर संवाद साधताना सपकाळ यांनी भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले, काँग्रेसला गळती लागली, हा विरोधकांचा कांगावा आहे. काँग्रेस पक्ष हा विचारधारा असलेला पक्ष आहे. या विचारधारेला धुडकावून लावणारे नेते पक्षाला नकोच आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोडे मागे वळून पाहिले तर अर्ध्याहून अधिक मंत्री काँग्रेस पक्षातून घेतलेलेच आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल. ही भाजपची शोकांतिका आहे.

तुमच्याकडे १ कोटी कार्यकर्ते असल्याचे सांगता, तर मग नेते कशासाठी आयात करता? असा प्रश्न सपकाळ यांनी भाजपला केला. राज्य सरकार शेतकरी विरोधी धोरणे राबवत आहेत, याचे उदाहरण देताना माजी मंत्री सतेज पाटील यांनी ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स जोडण्याबाबतच्या सरकारच्या निर्णयाबाबत सांगितले. याचा भार शेतकऱ्यांवरच पडणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या सरकारमध्ये सत्तेचा हावरटपणा सुरू असल्याची टीका केली.

कबुतरखाना...

मुंबईत सुरू असलेल्या कबुतरखान्यावरही सपकाळ यांनी भाष्य केले. कबुतरांना जगण्याचा अधिकार आहे, तसाच नागरिकांनाही जगण्याचा अधिकार आहे. तज्ज्ञ काय म्हणतात त्याकडे दुर्लक्ष करून सरकार कबुतरखाने मतांसाठी म्हणून वाचवत आहे, अशी टीका त्यांनी केली. नागरिकांना कबुतरांमुळे होत असलेल्या जीवघेण्या आजारांचा सरकारने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाMahayutiमहायुती