शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

मतदारांच्या मताची चोरी करून भाजप सत्तेत बसला; हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 20:06 IST

स्वत:चे असे कायकर्तेच नसल्याने भारतीय जनता पक्ष काँग्रेसकडे उधार उसनवारी करत आहे

पुणे: राज्याची कायदा सुव्यवस्था घाशीराम कोतवालाकडे आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. स्वत:चे असे कायकर्तेच नसल्याने भारतीय जनता पक्ष काँग्रेसकडे उधार उसनवारी करत आहे असे ते म्हणाले. धाक दाखवून पक्षप्रवेश केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसचे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसभवनमध्ये बुधवारी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्याआधी पत्रकारांबरोबर बोलताना सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मतदारांच्या मताची चोरी करून भाजप सत्तेत बसला आहे. ते त्यांच्या नेत्यांनाही मोठे करत नाही. त्यासाठी काँग्रेसमधील नेते पक्षात आयात करतात.

पक्षाने ज्यांना मुख्यमंत्रीपद दिले तेही भाजपत गेले, तिथे एका जिल्हाध्यक्षांची काय कथा अशी प्रतिक्रिया व्यक्त करून सपकाळ म्हणाले, जाणाऱ्यांना थांबवता येत नाही. ते त्यांच्या संस्था वाचवण्यासाठी गेले. पक्षाकडून सर्व काही घेतल्यानंतरही स्वार्थ साधण्यासाठी कोणी पक्षातून बाहेर पडत असेल तर त्याला संधीसाधूपणा म्हणतात. काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. आमच्याकडे वैचारिक भूमिका आहे. हा नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असे सपकाळ म्हणाले.

पक्ष कार्यकर्त्यांच्या काँग्रेसभवमधील मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. प्रदेश उपाध्यक्ष देवीदास भन्साळी यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, श्रीरंग गायकवाड, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांच्यासह अनेक आजीमाजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेते पक्ष सोडून गेल्यानंतर कार्यकर्त्यांनीच पक्ष टिकवला, वाढवला आहे. काँग्रेस हा समुद्र आहे, त्यातून चारदोन जण केले म्हणून काहीही होत नाही. मात्र पक्षाने आता निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच संधी द्यायला हवी असे मत बहुसंख्य वक्त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्षपदावरून बोलताना सपकाळ म्हणाले, “पक्षाच्या वाईट काळात पक्षाबरोबर राहणाऱ्यांच्या पाठीशी पक्ष नक्की उभा राहिल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघ निहाय आराखडा तयार करावा. आघाडीतून लढायचे की स्वबळावर याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. हा निर्णय घेताना तळातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भावना विचारात घेतल्या जातील.”

जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा निर्णय तातडीने घेतला जाईल. त्यासाठी येत्या काही दिवसातच निरीक्षक पाठवू. ते जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करतील. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेऊ असे सपकाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार