शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पडताळणीनंतर जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळणार; राज्य सरकारकडून नवे आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:25 IST

नव्या कार्यपद्धतीमुळे बनावट प्रमाणपत्र आढळल्यास संबंधितांवर पोलिस कारवाई करण्यात येणार

पुणे: बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची प्रकरणे समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्यावर घातलेली बंदी आता उठविली आहे. याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा केली होती. या बंदीच्या काळातील दिलेल्या प्रमाणपत्रांपैकी जे तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहेत. त्या प्रमाणपत्रांची सक्षम अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेण्यात यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे. जन्म-मृत्यूची उशिरा नोंद करणाऱ्यांना विविध प्रकारचे पुरावे उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. या पुराव्यांची पडताळणी झाल्यानंतरच दाखले मिळणार आहेत. त्यामुळे जन्म-मृत्यूची नोंद वेळेत करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात बांगलादेशींनी बनावट प्रमाणपत्रे मिळविल्याची प्रकरणे उघड झाल्यानंतर याबाबत राज्य सरकारकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने ११ ऑगस्ट २०२३ रोजी अशा सर्व प्रमाणपत्रांवर बंदी घातली होती. मात्र, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही बंदी उठविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महसूल विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले असून, आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली प्रमाणपत्रे नागरिकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बावनकुळे यांनी विधिमंडळात जन्म-मृत्यूच्या नोंदीबाबत सुधारित कार्यपद्धती तयार केल्याचे जाहीर केले आहे. नव्या कार्यपद्धतीमुळे बनावट प्रमाणपत्र आढळल्यास संबंधितांवर पोलिस कारवाई करण्यात येणार आहे.

या परिपत्रकानुसार, अकोला जिल्ह्यासह राज्यात ११ ऑगस्ट २०२३ पासून स्थगिती आदेशापर्यंत तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी या पदांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत. अशा प्रमाणपत्रांची सक्षम अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेण्यात यावी, तसेच राज्य सरकारने १२ मार्चला प्रसिद्ध केलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या नव्या कार्यपद्धतीनुसारच दाखले देण्यात यावेत, असेही त्यात म्हटले आहे.

जन्म-मृत्यूची उशिरा नोंद करणाऱ्यांना विविध प्रकारचे पुरावे उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. या पुराव्यांची पडताळणी झाल्यानंतरच दाखले मिळणार आहेत. त्यामुळे जन्म-मृत्यूची नोंद वेळेत करणे महत्त्वाचे ठरणार आहे. जन्म व मृत्यूची नोंदणी एका वर्षापेक्षा अधिक विलंबाने होत असल्यास अशा नोंदीसाठी जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. त्या नोंदीच्या अचूकतेबाबत खात्री करून विलंब शुल्क आकारून अशा नोंदी घेण्याबाबत सुधारित तरतूद केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेDeathमृत्यू