शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

पडताळणीनंतर जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळणार; राज्य सरकारकडून नवे आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:25 IST

नव्या कार्यपद्धतीमुळे बनावट प्रमाणपत्र आढळल्यास संबंधितांवर पोलिस कारवाई करण्यात येणार

पुणे: बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची प्रकरणे समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्यावर घातलेली बंदी आता उठविली आहे. याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा केली होती. या बंदीच्या काळातील दिलेल्या प्रमाणपत्रांपैकी जे तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहेत. त्या प्रमाणपत्रांची सक्षम अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेण्यात यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे. जन्म-मृत्यूची उशिरा नोंद करणाऱ्यांना विविध प्रकारचे पुरावे उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. या पुराव्यांची पडताळणी झाल्यानंतरच दाखले मिळणार आहेत. त्यामुळे जन्म-मृत्यूची नोंद वेळेत करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात बांगलादेशींनी बनावट प्रमाणपत्रे मिळविल्याची प्रकरणे उघड झाल्यानंतर याबाबत राज्य सरकारकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने ११ ऑगस्ट २०२३ रोजी अशा सर्व प्रमाणपत्रांवर बंदी घातली होती. मात्र, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही बंदी उठविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महसूल विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले असून, आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली प्रमाणपत्रे नागरिकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बावनकुळे यांनी विधिमंडळात जन्म-मृत्यूच्या नोंदीबाबत सुधारित कार्यपद्धती तयार केल्याचे जाहीर केले आहे. नव्या कार्यपद्धतीमुळे बनावट प्रमाणपत्र आढळल्यास संबंधितांवर पोलिस कारवाई करण्यात येणार आहे.

या परिपत्रकानुसार, अकोला जिल्ह्यासह राज्यात ११ ऑगस्ट २०२३ पासून स्थगिती आदेशापर्यंत तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी या पदांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत. अशा प्रमाणपत्रांची सक्षम अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेण्यात यावी, तसेच राज्य सरकारने १२ मार्चला प्रसिद्ध केलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या नव्या कार्यपद्धतीनुसारच दाखले देण्यात यावेत, असेही त्यात म्हटले आहे.

जन्म-मृत्यूची उशिरा नोंद करणाऱ्यांना विविध प्रकारचे पुरावे उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. या पुराव्यांची पडताळणी झाल्यानंतरच दाखले मिळणार आहेत. त्यामुळे जन्म-मृत्यूची नोंद वेळेत करणे महत्त्वाचे ठरणार आहे. जन्म व मृत्यूची नोंदणी एका वर्षापेक्षा अधिक विलंबाने होत असल्यास अशा नोंदीसाठी जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. त्या नोंदीच्या अचूकतेबाबत खात्री करून विलंब शुल्क आकारून अशा नोंदी घेण्याबाबत सुधारित तरतूद केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेDeathमृत्यू