शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पडताळणीनंतर जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळणार; राज्य सरकारकडून नवे आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:25 IST

नव्या कार्यपद्धतीमुळे बनावट प्रमाणपत्र आढळल्यास संबंधितांवर पोलिस कारवाई करण्यात येणार

पुणे: बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची प्रकरणे समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्यावर घातलेली बंदी आता उठविली आहे. याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा केली होती. या बंदीच्या काळातील दिलेल्या प्रमाणपत्रांपैकी जे तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहेत. त्या प्रमाणपत्रांची सक्षम अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेण्यात यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे. जन्म-मृत्यूची उशिरा नोंद करणाऱ्यांना विविध प्रकारचे पुरावे उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. या पुराव्यांची पडताळणी झाल्यानंतरच दाखले मिळणार आहेत. त्यामुळे जन्म-मृत्यूची नोंद वेळेत करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात बांगलादेशींनी बनावट प्रमाणपत्रे मिळविल्याची प्रकरणे उघड झाल्यानंतर याबाबत राज्य सरकारकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने ११ ऑगस्ट २०२३ रोजी अशा सर्व प्रमाणपत्रांवर बंदी घातली होती. मात्र, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही बंदी उठविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महसूल विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले असून, आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली प्रमाणपत्रे नागरिकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बावनकुळे यांनी विधिमंडळात जन्म-मृत्यूच्या नोंदीबाबत सुधारित कार्यपद्धती तयार केल्याचे जाहीर केले आहे. नव्या कार्यपद्धतीमुळे बनावट प्रमाणपत्र आढळल्यास संबंधितांवर पोलिस कारवाई करण्यात येणार आहे.

या परिपत्रकानुसार, अकोला जिल्ह्यासह राज्यात ११ ऑगस्ट २०२३ पासून स्थगिती आदेशापर्यंत तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी या पदांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत. अशा प्रमाणपत्रांची सक्षम अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेण्यात यावी, तसेच राज्य सरकारने १२ मार्चला प्रसिद्ध केलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या नव्या कार्यपद्धतीनुसारच दाखले देण्यात यावेत, असेही त्यात म्हटले आहे.

जन्म-मृत्यूची उशिरा नोंद करणाऱ्यांना विविध प्रकारचे पुरावे उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. या पुराव्यांची पडताळणी झाल्यानंतरच दाखले मिळणार आहेत. त्यामुळे जन्म-मृत्यूची नोंद वेळेत करणे महत्त्वाचे ठरणार आहे. जन्म व मृत्यूची नोंदणी एका वर्षापेक्षा अधिक विलंबाने होत असल्यास अशा नोंदीसाठी जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. त्या नोंदीच्या अचूकतेबाबत खात्री करून विलंब शुल्क आकारून अशा नोंदी घेण्याबाबत सुधारित तरतूद केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेDeathमृत्यू