शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
3
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
4
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
5
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
6
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
7
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
9
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
11
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
12
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
13
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
14
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
15
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
16
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
18
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
19
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
20
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!

आयटीआयला मिळालेले कोट्यवधी रुपये पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 01:47 IST

राज्यात अडीचशे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थां (आयटीआय) चा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून २००७ ते २०११ या चार वर्षांत तब्बल सव्वा सहाशे कोटी रुपये मिळाले.

- राजानंद मोरे पुणे : राज्यात अडीचशे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थां (आयटीआय) चा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून २००७ ते २०११ या चार वर्षांत तब्बल सव्वा सहाशे कोटी रुपये मिळाले. पण या निधीचा पुरेपुर वापर न झाल्याने कोट्यवधी रुपये बँकांमध्ये पडून असल्याची माहिती समोर आली आहे. आता शासनाला जाग आली असून ‘आयटीआय’मधील संस्था व्यवस्थापन समिती सोसायट्यांचे (आयएमसीएस) पुनरुज्जीवन करून हा खर्च करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत.शासकीय आयटीआयमधील शैक्षणिक दर्जा सुधारणे तसेच विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकारने२००७-०८ पासून ‘सार्वजनिकखासगी भागीदारी’ (पीपीपी)या संकल्पनेनुसार खासगीउद्योगांना संस्थांशी जोडण्याचा निर्णय घेतला.या योजनेअंतर्गत प्रत्येक संस्थेमध्ये ‘आयएमसी’ स्थापन करून सोसायटी म्हणून नोंदणी करणे आवश्यक होते. तसेच प्रत्येक संस्थेला २००७-०८, २००८-०९, २००९-१० आणि २०१०-११ या चार वर्षांत टप्प्याटप्याने अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार राज्यातील एकूण ४१७ पैकी २५० शासकीय आयटीआयला हा निधी मिळाला.उद्योगांना सहभागी करून घेत त्यांच्या मागणीनुसार नवीन अभ्यासक्रम, अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षणपद्धतीत बदल करून आयटीआयचे रूपडे पालटण्याचा हेतू होता. मात्र, बहुतेक संस्थांमधील ‘आयएमसी’ सक्रिय न राहिल्याने निधी खर्चच झाला नाही.हा निधी बँकांमध्ये तसाच पडूनआहे. या निधीचा वापर नझाल्याने संस्थांचा दर्जा अपेक्षेप्रमाणे वाढला नाही. परिणामी हजारो विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहिले.सध्या राज्यातील सर्व ‘आयटीआय’चा विस्तार आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या निमित्ताने बँकांमध्ये पडून राहिलेले कोट्यवधी रुपये खर्च करण्याबाबत शासनाला जाग आल्याचेदिसते. आराखड्यामध्ये ‘पीपीपी’ तत्त्वावरील २५० आयटीआयचाही समावेश केला आहे. त्यानुसार राज्य सरकारने संबंधित २५० आयटीआयमधील ‘आयएमसी’ पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे.बहुतेक सर्व ‘आयएमसी’ची पुनर्रचना करण्यात आली आहे. सक्रिय नसलेल्या कंपन्याचे प्रतिनिधी बदलून नवीन कंपन्यांना संधी देण्यातआली आहे. संस्थांचे जुने विकास आराखडे नव्याने तयार करून राज्य सुकाणू समितीकडे मान्यतेसाठी पाठविले जात आहे.हे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. या माध्यमातून केंद्र सरकारने दिलेल्या निधीचा पुरेपुर वापर करून ‘आयटीआय’सुसज्ज केले जाणार आहेत. तसेच उद्योग क्षेत्राचा सहभागही मोठ्या प्रमाणावर करून घेत त्यांच्या गरजेनुसार नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.>पुणे विभागात ३९ ‘आयटीआय’ : पुढील २ वर्षांत नवीन १९८ तुकड्या सुरूपुणे विभागात एकूण ६१ शासकीय आयटीआय असून त्यापैकी ३९ संस्थांची निवड करण्यात आली आहे. संस्थांचे विकास आराखडे तयार झाले असून सुकाणू समितीकडे पाठविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.या संस्थांमध्ये पुढील दोन वर्षांत नवीन १९८ तुकड्या सुरू करण्यात येतील. त्यातून तब्बल चार हजार नवीन प्रवेश क्षमता वाढणार आहे. नवीन समित्या करताना क्रियाशील नसणारे अध्यक्ष, कंपन्यांचे प्रतिनिधी बदलण्यात आले आहेत.त्यामुळे या समित्या सक्षमपणे कार्यरत राहतील, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या पुणे विभागाचे प्रभारी सहसंचालक राजेंद्र घुमे यांनी दिली.>‘आयएमसी’ची रचनाप्रत्येक आयटीआयमध्ये संस्था व्यवस्थापन समिती (आयएमसी) स्थापन करून त्यांची सोसायटी म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. या सोसायटीचे अध्यक्ष संस्थेच्या परिसरातील कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी असतात. तर संस्थेचे प्राचार्य हे सोसायटीचे सचिव, अन्य चार कंपन्यांचे प्रत्येक एक पदाधिकारी, रोजगार अधिकारी, विद्यार्थी व कर्मचारी प्रतिनिधी असे एकूण ११ सदस्य असतात. केंद्राने थेट या समित्यांनाच अडीच कोटी निधी खर्च करण्याचे अधिकार दिले आहेत. शासनाच्या नियमानुसार निर्णय घेणे अपेक्षित आहे.>असे होणार बदल...उद्योगांच्या गरजेनुसार नवीन अभ्यासक्रमकालबाह्य अभ्यासक्रम बंद करणारतुकड्या वाढविणारई-लर्निंग सुविधासंगणक कक्षउत्पन्नप्राप्तीसाठी प्रयत्नअद्ययावत यंत्रसामग्रीविद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी देणेशैक्षणिक दर्जा सुधारणेपरिसर सौंदर्यीकरणपायाभूत सुविधांचा विकास

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबई