शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीला पूर; दौंड-शिरूर तालुक्यांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:14 IST

हातवळण येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा, नानगाव आणि कानगाव येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी, या दोन्ही तालुक्यांमधील गावांचा संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे

रांजणगाव सांडस/वरवंड : दौंड तालुक्यातील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे दौंड आणि शिरूर तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे हातवळण येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा, नानगाव आणि कानगाव येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी, या दोन्ही तालुक्यांमधील गावांचा संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला, डिंभे, चासकमान आणि भामा आसखेड धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मुळा, मुठा आणि भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, खेड, शिरूर, हवेली आणि दौंड तालुक्यातील तब्बल १८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

रांजणगाव सांडस बेट परिसरात मुळा, मुठा आणि भीमा नदीचा संगम होतो. या ठिकाणी वाळकी-देलवडीला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने गेल्या दोन दिवसांपासून या भागातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. भीमा नदी दुथडी भरून वाहत असून, संगम परिसरात मुळा-मुठा नदीचे पाणी पारगावच्या बाजूकडील शेतांमधून राहू-पारगाव रस्त्यालगत पोहोचले आहे.

वडगाव रासाई, नानगाव आणि दौंड यांचा संपर्कही पुरामुळे तुटला आहे. नानगाव (ता. दौंड) येथील पूल पाण्याखाली गेला आहे. नानगाव, पिंपळगाव, हातवळण, वाळकी, रांजणगाव सांडस बेट, शितोळे वस्ती आणि राक्षेवाडी परिसरात भीमा आणि मुळा-मुठा नदीच्या पुरामुळे शेती पिके पाण्याखाली गेली आहेत.

शेतकऱ्यांना पुराची माहिती असल्याने अनेकांनी वीज पंप खोलून सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. मात्र, पाण्याच्या जास्त विसर्गामुळे हे पंप पाण्यात भिजले आहेत. नदीकाठच्या ऊस, मका, कडवळ, कोबी, कांदा आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे. परिसरातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे वीज पंप, केबल, स्टार्टर, मोटर आणि पाइप वाहून गेले आहेत. शासनाने पूरग्रस्त भागातील शेतीची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस