शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
3
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
4
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
5
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
6
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
7
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
8
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
9
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
10
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
11
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
12
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
13
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
14
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
15
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
16
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
17
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
18
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
19
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
20
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीला पूर; दौंड-शिरूर तालुक्यांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:14 IST

हातवळण येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा, नानगाव आणि कानगाव येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी, या दोन्ही तालुक्यांमधील गावांचा संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे

रांजणगाव सांडस/वरवंड : दौंड तालुक्यातील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे दौंड आणि शिरूर तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे हातवळण येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा, नानगाव आणि कानगाव येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी, या दोन्ही तालुक्यांमधील गावांचा संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला, डिंभे, चासकमान आणि भामा आसखेड धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मुळा, मुठा आणि भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, खेड, शिरूर, हवेली आणि दौंड तालुक्यातील तब्बल १८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

रांजणगाव सांडस बेट परिसरात मुळा, मुठा आणि भीमा नदीचा संगम होतो. या ठिकाणी वाळकी-देलवडीला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने गेल्या दोन दिवसांपासून या भागातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. भीमा नदी दुथडी भरून वाहत असून, संगम परिसरात मुळा-मुठा नदीचे पाणी पारगावच्या बाजूकडील शेतांमधून राहू-पारगाव रस्त्यालगत पोहोचले आहे.

वडगाव रासाई, नानगाव आणि दौंड यांचा संपर्कही पुरामुळे तुटला आहे. नानगाव (ता. दौंड) येथील पूल पाण्याखाली गेला आहे. नानगाव, पिंपळगाव, हातवळण, वाळकी, रांजणगाव सांडस बेट, शितोळे वस्ती आणि राक्षेवाडी परिसरात भीमा आणि मुळा-मुठा नदीच्या पुरामुळे शेती पिके पाण्याखाली गेली आहेत.

शेतकऱ्यांना पुराची माहिती असल्याने अनेकांनी वीज पंप खोलून सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. मात्र, पाण्याच्या जास्त विसर्गामुळे हे पंप पाण्यात भिजले आहेत. नदीकाठच्या ऊस, मका, कडवळ, कोबी, कांदा आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे. परिसरातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे वीज पंप, केबल, स्टार्टर, मोटर आणि पाइप वाहून गेले आहेत. शासनाने पूरग्रस्त भागातील शेतीची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस