शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीला पूर; दौंड-शिरूर तालुक्यांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:14 IST

हातवळण येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा, नानगाव आणि कानगाव येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी, या दोन्ही तालुक्यांमधील गावांचा संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे

रांजणगाव सांडस/वरवंड : दौंड तालुक्यातील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे दौंड आणि शिरूर तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे हातवळण येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा, नानगाव आणि कानगाव येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी, या दोन्ही तालुक्यांमधील गावांचा संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला, डिंभे, चासकमान आणि भामा आसखेड धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मुळा, मुठा आणि भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, खेड, शिरूर, हवेली आणि दौंड तालुक्यातील तब्बल १८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

रांजणगाव सांडस बेट परिसरात मुळा, मुठा आणि भीमा नदीचा संगम होतो. या ठिकाणी वाळकी-देलवडीला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने गेल्या दोन दिवसांपासून या भागातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. भीमा नदी दुथडी भरून वाहत असून, संगम परिसरात मुळा-मुठा नदीचे पाणी पारगावच्या बाजूकडील शेतांमधून राहू-पारगाव रस्त्यालगत पोहोचले आहे.

वडगाव रासाई, नानगाव आणि दौंड यांचा संपर्कही पुरामुळे तुटला आहे. नानगाव (ता. दौंड) येथील पूल पाण्याखाली गेला आहे. नानगाव, पिंपळगाव, हातवळण, वाळकी, रांजणगाव सांडस बेट, शितोळे वस्ती आणि राक्षेवाडी परिसरात भीमा आणि मुळा-मुठा नदीच्या पुरामुळे शेती पिके पाण्याखाली गेली आहेत.

शेतकऱ्यांना पुराची माहिती असल्याने अनेकांनी वीज पंप खोलून सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. मात्र, पाण्याच्या जास्त विसर्गामुळे हे पंप पाण्यात भिजले आहेत. नदीकाठच्या ऊस, मका, कडवळ, कोबी, कांदा आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे. परिसरातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे वीज पंप, केबल, स्टार्टर, मोटर आणि पाइप वाहून गेले आहेत. शासनाने पूरग्रस्त भागातील शेतीची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस