शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
3
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
4
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
5
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
6
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
7
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
8
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
9
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
10
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
11
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
12
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
13
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
14
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
15
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
16
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
17
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
18
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
19
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
20
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'भीमसैनिक खवळला तर शांत राहणार नाही, चंद्रकांत पाटलांना भविष्यात...' अमोल मिटकरींनी केली भीती व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 15:55 IST

एकदा बोलता व नंतर माफी मागता, याचा अर्थ तुम्ही जाणीवपूर्वक बोलता.

दौंड : चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी देणगी मागून म्हणजेच भीक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते. तर भाजप मधील नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहेत. असे असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. याचा

राग मनात धरून काही कार्यकर्त्यांनी चिंचवड येथे सहा वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. पोलिसांनी शाई फेकणाऱ्या मनोज गरबडेसह तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर विरोधी पक्षातूनही या प्रकरणाबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्याबाबत भीती व्यक्त केली आहे.  या प्रकरणात भीमसैनिक खवळला तर शांत राहणार नाही, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना भविष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागेल असं ते यावेळी म्हणाले आहेत. 

मिटकरी म्हणाले, उच्च शिक्षण खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाईफेक किंवा ती प्रतिक्रिया लोकशाहीला धरून नाही. एकदा बोलता व नंतर माफी मागता, याचा अर्थ तुम्ही जाणीवपूर्वक बोलता. तुम्हा एवढी तरी अक्कल असावी की आपण कॅबिनेट मंत्री आहोत. महापुरूषांविषयी असे कसे बोलू शकतात ?. पण या प्रकरणात भीमसैनिक खवळला तर शांत राहणार नाही, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना भविष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागण्याची भीती अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली.

लवकरच हा राजकीय भूकंप होणार

सध्याच्या परिस्थितीत शिंदेगट आणि भाजप या दोन्ही गटातील काही आमदारांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. शिंदे गटातील काही आमदारांना विश्वास आहे की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडून येऊ शकतो, त्यानुसार शिंदे गटाचे तीन आमदार येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले असतील . त्या पाठोपाठ भाजपचे काही आमदार या दोन्ही गटातील आमदारांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली असून लवकरच हा राजकीय भूकंप होणार असल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले. 

''राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या काही वाचाळविरांनी राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याचा सपाटा लावला आहे, तेव्हा महाराष्ट्रात वाचाळविचारांविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. परिणामी, खुद्द भाजप आणि शिंदे गटाच्या काही मंत्री आणि आमदारांनीदेखील राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या वाचाळांबाबत संताप व्यक्त केलेला आहे. कर्नाटक सरकार मराठी माणसांवर अन्याय करीत आहे. मात्र, शिंदे आणि फडणवीस सरकार या प्रश्नावर गप्प आहे, ही महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.'' 

राज्यपालांनी वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत 

राज्यपाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील आहे. परिणामी, राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राज्यपालांपुढे नमते घ्यावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. मुळातच राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून काम करण्याची इच्छा नाही. दरम्यान, काहीतरी वादग्रस्त विधान केले तर आपली महाराष्ट्रातून हकालपट्टी होईल, म्हणून राज्यपालांनी वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य करीत असल्याचे शेवटी मिटकरी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलAmol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा