शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील भातलागवड संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 1:57 PM

पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्र ६३,८०० हेक्टर क्षेत्रापैकी ५१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते.

ठळक मुद्देआंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर वर्षानुवर्षे कष्ट करुन निसर्गाच्या या अवकृपेमुळे हे आदिवासी बांधवांचे कष्ट व्यर्थ

तळेघर : गेले दहा ते बारा दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाने दडी मारल्यामुळे भातरोपांच्या लागवडी रखडल्या असून, आदिवासी शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यातला परिसर भातशेतीचे आगार समजला जातो. येथील आदिवासी शेतकरी हा बारा महिन्यांतून भात एकमेव पीक काढतो. पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्र ६३,८०० हेक्टर क्षेत्रापैकी ५१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते. दर वर्षीप्रमाणे चालू वर्षीही आदिवासी बांधवांनी ह्या रोहिणी व मृग नक्षत्रांच्या कात्र्यांमध्ये काही ठिकाणी धूळवाफेत तर काही ठिकाणी चिडवाफेत पेरण्या उरकून घेतल्या. वरुणराजाने पाठ फिरविल्याने आदिवासी भागातील शेतकºयांचे तोंडचे पाणी पळाले होते. परंतु पुनर्वसू (कोर) थोरल्या नक्षत्रांच्या मध्यापासूनच पावसाने सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला होता. भातरोपे चांगल्या प्रकारे तरारून लागवडीयोग्य होताच आदिवासी शेतकºयांनी भातरोपांच्या लागवडी सुरू केल्या. परंतु गेले दहा ते बारा दिवसांपासून या परिसरामध्ये पावसाने पाठ फिरविल्याने भातलागवडी रखडल्या असून आदिवासी बांधव चिंंताग्रस्त झाला आहे. भातरोपे लागवडीसाठी लागणारा चिखल करण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे  काही शेतकरी विहिरी बंधाऱ्यांतून इंजिनाद्वारे पाणी घेऊन भातलागवडी करत आहेत. परंतु लागवड केलेल्या भातरोपांचे काय, असे प्रश्न्नचिन्ह आदिवासी शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर समजला जातो. परंतु गेले कित्येक वर्षांपासून या भागामध्ये निसर्गाच्या अवकृपेमुळे भातशेती संकटात आहे. वर्षानुवर्षे कष्ट करुन निसर्गाच्या या अवकृपेमुळे हे आदिवासी बांधवांचे कष्ट व्यर्थ जात आहेत.

टॅग्स :ambegaonआंबेगावFarmerशेतकरीRainपाऊस