शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

शिक्षण-रोजगाराच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या लॉंग मार्चला सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 17:29 IST

सरकारच्या शिक्षण व रोजगार यांच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज उठविणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराचा हक्क मिळावा हा आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक महात्मा फुले वाड्यापासून या लाँग मार्चला सुरुवात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिला पाठिंबातरुणांच्या नेतृत्वाखाली हा मोर्च्या मंत्रालयावर धडकणार

पुणे : शिक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या मालकीचे, केजी टू पीजी मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत उत्साहाच्या वातावरणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या लाँग मार्च काढण्यात आला. या लाँग मार्च पाठीमागचा उद्देश हा सरकारच्या शिक्षण व रोजगार यांच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज उठविणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराचा हक्क मिळावा हा आहे. गुरुवारी (दि. १५ नोव्हें) दुपारी ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यापासून या लाँग मार्चला सुरुवात झाली असून तो मुंबईतीलमंत्रालयावर धडकणार आहे.  शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना व राष्ट्र सेवा दलाच्या वतीने या लॉंग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. मोर्च्यामध्ये विद्यार्थिनींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. शासनाचे शाळा बंद करण्याचे धोरण, आक्षेपार्ह व चुकीचा अभ्यासक्रम निर्मिती,आदिवासी - मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बंद करणे , शिक्षक भरतीसह संपूर्ण नोकरभरती बंद करणे याविरोधात हा लॉंग मार्च मुंबईमंत्रालय येथे धडकणार आहे. या लाँग मार्चमध्ये ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ. बाबा आढाव , सुरेश खैरनार , पन्नालाल सुराणा , आमदार कपिल पाटील , आमदार सुधीर तांबे , जे यु नाना ठाकरे , सुभाष वारे , नगरसेविका अश्विनी कदम , अल्लाऊद्दीन शेख , विनय सावंत, संदेश भंडारे, जाकीर अत्तर , प्रमोद दिवेकर हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सरकारच्या शिक्षण व रोजगार विषयावरील अपयश अधोरेखित केले. विद्यार्थी युवकांनी या सरकारचे अपयश मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेला समजावून सांगण्याचे आवाहन केले. या लॉन्ग मार्चला पाठिंबा म्हणून आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी व पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला. या मोर्च्याचो संपूर्ण नियोजन दत्ता  ढगे  (७४४७८४४१३१), लोकेश लाटे(८३५६०८४४५१) , रशीद मणियार,  शिवराज सूर्यवंशी, प्रशांत दांडेकर, संदीप आखाडे, राकेश पवार, सागर भालेराव, कीर्ती इटकर , अनिकेत घुले यांनी केले असून पुणे ते मुंबई पर्यंत या तरुणांच्या नेतृत्वाखाली हा मोर्च्या मंत्रालयावर धडकणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईMantralayaमंत्रालयEducationशिक्षणStudentविद्यार्थी