शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

बेघर, निराधारांसाठी बार्टी बनली अन्नदाता! संचारबंदी असेपर्यंत करणार भोजनाची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 17:38 IST

पुणे स्टेशन परिसर, मालधक्का, शिवाजीनगर, हडपसर, स्वारगेट येथील ६०० गरीब व बेघरांची अन्नपाण्याची व्यवस्था.

ठळक मुद्देकोरोनामुळे देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर

धनाजी कांबळे - पुणे : देशात लॉकडाउन असल्याने अनेक ठिकाणी बांधकाम मजूर, कष्टकरी, हातावर पोट असलेले लोक अतिशय कठिण परिस्थितीत जगत आहेत. शहरातील अनेक रस्त्यावर निराधार, गरीब लोक अन्नपाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशा गरीब, कष्टकरी, कामगारांसाठी अन्नदाता म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुढे आली आहे.कोरोनामुळे देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या काळात बेघरांसाठी, अनाथांसमोर अन्नपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, या सामाजिक जाणीवेतून बाटीर्ने या काळात अन्नपाणी पुरवण्याचे काम हातात घेतले आहे.बार्टीचे संचालक कैलास कणसे, निबंधक यादव गायकवाड आणि त्यांची टीम यासाठी विशेष प्रयत्न करीत असून, साठी अन्नपाण्याची व्यवस्था येरवड्यातील निवासी शाळेच्या भोजनालयात जेवण तयार करून दररोज सायंकाळी साधारण ५०० ते ६०० लोकांना जेवण पुरवण्यात येते. यासाठी बार्टीमध्ये काम करीत असलेले कर्मचारीच एकदिवसाआड कामावर येऊन पुरेशी काळजी आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवून हे काम करीत आहेत.त्याचप्रमाणे केवळ द्यायचे म्हणून नव्हे, तर गरीब असले तरी ती हाडामांसाची माणसेच आहेत, याची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकीतून जेवणाची गुणवत्ता तपासून उत्कृष्ट दजार्चे जेवण दिले जाते. त्यासाठी तीन गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली असून, बेघर व गरीब वस्त्या, झोपड्यांजवळ थांबून अधिकारी व कर्मचारी हे भोजनाची व्यवस्था करीत आहेत.पुणे स्टेशन परिसर, महापालिकेचे निवारा केंद्र, मालधक्का, महापालिका परिसर, शिवाजीनगर, हडपसर येथील रामटेकडी परिसर, स्वारगेट येथील ६०० गरीब व बेघरांना अन्नपाण्याची व्यवस्था केली जात आहे. ५०० ते ६०० लोकांना सध्या अन्नदान केले जात असून, मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे फूड पॅकेट्स आणि पाणी यांची संख्याही वाढविण्याचा विचार आहे. प्रकल संचालक नितीन सहारे, सहा. प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे, सुरक्षा रक्षक सुपरवायझर बाळासाहेब ढमाले, सुरक्षारक्षक गोपाळे, दर्शन सकट, वाहनचालक विश्वनाथ दोंडगे, सखाराम कदम, प्रदीप भालेराव यांच्यासह अनेक कर्मचारी या कामात स्वत:हून एकदिवसआड सहभागी होत आहेत.---कोरोनाचे संकट देशावरच आल्याने लॉकडाउनची स्थिती आहे. या काळात गरीब, निराधारांची अन्नपाण्यावाचून फरपट होऊ नये, यासाठी सामाजिक जाणीवेतून आम्ही दररोज ५०० ते ६०० जणांना भोजन देण्याची व्यवस्था केली आहे. झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही अन्नपाणी पुरवत आहोत. आपत्तीच्या काळात सर्वांनीच अशा निराधार माणसांचा आधार बनायला हवं. आम्ही बार्टीच्या वतीने जेवढे शक्य आहे, तेवढं करीत आहोत.- कैलास कणसे, महासंचालक, बार्टी---

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfoodअन्न