शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Maharashtra HSC result 2018 : गुणांच्या स्पर्धेत मुंबईने टाकले सगळयांना मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 3:51 PM

राज्यमंडळाने गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे बंद केले आहे. मात्र ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय संख्या मंडळाकडून जाहीर करण्यात आली

ठळक मुद्दे९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण : तब्बल ५ हजार ४८६ विद्यार्थ्यांची बाजी

पुणे : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेत राज्यभरातून ५ हजार ४८६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत, यामध्ये सर्वाधिक २ हजार २८८ विद्यार्थी एकटया मुंबई विभागाचे आहेत. त्यामुळे यंदा मुंबईच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळविण्यामध्ये सगळया विभागांना मागे टाकले आहे.  राज्य मंडळाचा बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. राज्यमंडळाने गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे बंद केले आहे. मात्र ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय संख्या मंडळाकडून जाहीर करण्यात आली.मुंबई विभागातून ३ लाख ११ हजार ६५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार २८८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. त्याचबरोबर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून ३८ हजार २१४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.  पुणे विभागातून २ लाख ३५ हजार ५०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७०० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. ७५टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळालेले २० हजार ८७० विद्यार्थी आहेत.  नागपूर विभागामधून १ लाख ६४ हजार ६२७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत बसले होते. यातील १ लाख ४४ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ६९८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळविणाऱ्यांचे प्रमाण १० हजार ३०२ इतके आहे.औरंगाबाद विभागामधून  १ लाख ५९ हजार ०८६ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. यापैकी २९४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले तर १६ हजार ०१६ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळाले. कोल्हापूर विभागामधून १ लाख २५ हजार ६४८विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३५० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळविणाऱ्यांचे प्रमाण ८ हजार ९०५ इतके आहे. अमरावती विभागामधून १ लाख ४४ हजार २३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५९९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले तर ७५ टक्क्यांपेक्षा १२ हजार ४०८ विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाले. नाशिक विभागातील १५६ विद्यार्थ्यांना तर लातूर विभागातील २५९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. .............५२ हजार विद्यार्थी ४५ टक्क्यांच्या आतराज्यातील ५२ हजार ६६० विद्यार्थ्यांना ३५ ते ४५ टक्क्यांच्या दरम्यान मिळाले आहेत. ४५ ते ६० टकक्क्यांच्या दरम्यान ५ लाख ६७ हजार ८५३ विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत.

टॅग्स :PuneपुणेHSC Result 2018बारावी निकाल २०१८educationशैक्षणिकStudentविद्यार्थी