शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:15 IST

डॉ. बालाजी तांबे यांचा जन्म २८ जून १९४० रोजी झाला. त्यांनी आयुर्वेदिक औषधीशास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले. ...

डॉ. बालाजी तांबे यांचा जन्म २८ जून १९४० रोजी झाला. त्यांनी आयुर्वेदिक औषधीशास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले. आयुर्वेदिक औषधोपचारांबाबत ते विविध माध्यमांतून प्रबोधन करत होते. नवी सुदृढ पिढी जन्माला यावी म्हणून त्यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले होते. त्यांच्या या पुस्तकाचे विविध भाषांमधून भाषांतर झाले. लोणावळ्याजवळ कार्ला येथील ‘आत्मसंतुलन व्हिलेज’मधून त्यांनी आयुर्वेदाबद्दल जनजागृती केली. त्यांनी आयुर्वेद आणि योगपोचारांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली.

लेखन

डॉ. बालाजी तांबे यांनी ‘गर्भसंस्कार’सह ‘फॅमिली डॉक्टर’,‘स्वयंपाकघरातील दवाखाना’, ‘चक्र सुदर्शन’, ‘आयुर्वेदिक घरगुती उपचार’, ‘स्वाथ्याचे २१ मंत्र’, ‘जय देवा गजानना आता व्हा प्रसन्न’, ‘श्रीमन प्रसन्न’, ‘श्री गीतायोग शोध ब्रम्हविद्येचा’, ‘मंत्र आरोग्याचा’, ‘नाते वनस्पतींशी’ अशा वैैविध्यपूर्ण पुस्तकांचे लेखन केले. ‘आत्मसंतुलन व्हिलेज’ येथून प्रकाशित होणाऱ्या ‘एको’ मासिकाचे ते संपादक होते.

पुरस्कार

तांबे यांना आयुर्वेदाच्या प्रसारासाठी रोटरी क्लब आॅफ पुणे अपटाऊन व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे २०१४ मध्ये ‘रोटरी ग्लोबल लीडरशिप एक्सलन्स’ अवॉर्ड आणि २०१७ मध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे डी.लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. ‘रेकगनिशन आॅफ एक्सलन्स इन हेल्थ केअर’साठी आयएमएचा पुरस्कार, आयुर्वेदाची जपणूक आणि विकासासाठीचा ‘प्रियदर्शनी पुरस्कार’, गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ‘सत्यशोधक समाजभूषण’ पुरस्कार, ‘संत गुलाबराव महाराज पुरस्कार’, इंडो यूएस कॉनक्लेव्हचा पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौैरवण्यात आले आहे.

--------------------

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी अध्यात्म, आयुर्वेद, योगोपचार, संगीतोपचारासारख्या पारंपरिक भारतीय उपचारपद्धतींचे पुनर्जीवन केले. आयुर्वेद, योगोपचारांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्ती, लोकप्रियता मिळवून दिली. आयुर्वेदाचे महत्व घराघरांत पोहोचवले. स्वयंपाकघरातल्या वस्तूंचे आयुर्वेदिक गुण गृहिणींना समजावून सांगितले. आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, सुदृढ, आनंदी समाज निर्माण करण्याचं फार मोठे काम त्यांनी केले. बालाजी तांबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातले ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.