शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यांबाबत जनजागृती; काँग्रेसचे राज्यभर लवकरच मशाल मोर्चे

By राजू इनामदार | Updated: June 10, 2025 19:18 IST

राहुल गांधींच्या आरोपांचे निराकरण निवडणूक आयोगाने करणे अपेक्षित असताना त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे

पुणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले. आता त्यावर जनजागृती करण्यासाठी काँग्रेसकडून १२ ते १४ जून दरम्यान राज्यभर मशाल मोर्चे काढण्यात येणार आहेत. प्रदेश शाखेकडून सर्व जिल्हा व शहर शाखांना त्याबाबत कळवण्यात आले आहे.

पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी ही माहिती दिली. राहुल गांधी यांनी मतदान प्रक्रियेत बराच मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी आयोगाकडूनच प्रसिद्ध करण्यात आलेली काही आकडेवारीही दिली होती. त्यांच्या आरोपांचे निराकरण निवडणूक आयोगाने करणे अपेक्षित असताना त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा अधिकार फडणवीस यांना कोणी दिला, आयोगावर केलेल्या आरोपांची मिरची फडणवीस यांना का लागली, असा प्रश्न जोशी यांनी केला.

फडणवीस यांनी दिलेले उत्तरही राज्यातील जनतेची दिशाभूल करणारे आहे. आधीच्या निवडणूक आयोगामध्ये देशाच्या सरन्यायाधीशांचा समावेश होता. पंतप्रधान, विरोधी पक्षाचा प्रतिनिधी व सरन्यायाधीश अशी ती रचना होती. कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र सरकारने सरन्यायाधीशांना वगळून त्या जागेवर केंद्रीय मंत्री अशी रचना केली व लगेचच तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नियुक्ती केली. याबाबत राहुल यांनी प्रश्न विचारला होता. फडणवीस यांनी आपल्या उत्तरात नेमकी या विषयाला बगल दिली आहे, अशी टीका जोशी यांनी केली. मशाल मोर्चांमधून काँग्रेस राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या अशा अनेक घोटाळ्यांबाबत जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीPoliticsराजकारण