शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यांबाबत जनजागृती; काँग्रेसचे राज्यभर लवकरच मशाल मोर्चे

By राजू इनामदार | Updated: June 10, 2025 19:18 IST

राहुल गांधींच्या आरोपांचे निराकरण निवडणूक आयोगाने करणे अपेक्षित असताना त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे

पुणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले. आता त्यावर जनजागृती करण्यासाठी काँग्रेसकडून १२ ते १४ जून दरम्यान राज्यभर मशाल मोर्चे काढण्यात येणार आहेत. प्रदेश शाखेकडून सर्व जिल्हा व शहर शाखांना त्याबाबत कळवण्यात आले आहे.

पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी ही माहिती दिली. राहुल गांधी यांनी मतदान प्रक्रियेत बराच मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी आयोगाकडूनच प्रसिद्ध करण्यात आलेली काही आकडेवारीही दिली होती. त्यांच्या आरोपांचे निराकरण निवडणूक आयोगाने करणे अपेक्षित असताना त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा अधिकार फडणवीस यांना कोणी दिला, आयोगावर केलेल्या आरोपांची मिरची फडणवीस यांना का लागली, असा प्रश्न जोशी यांनी केला.

फडणवीस यांनी दिलेले उत्तरही राज्यातील जनतेची दिशाभूल करणारे आहे. आधीच्या निवडणूक आयोगामध्ये देशाच्या सरन्यायाधीशांचा समावेश होता. पंतप्रधान, विरोधी पक्षाचा प्रतिनिधी व सरन्यायाधीश अशी ती रचना होती. कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र सरकारने सरन्यायाधीशांना वगळून त्या जागेवर केंद्रीय मंत्री अशी रचना केली व लगेचच तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नियुक्ती केली. याबाबत राहुल यांनी प्रश्न विचारला होता. फडणवीस यांनी आपल्या उत्तरात नेमकी या विषयाला बगल दिली आहे, अशी टीका जोशी यांनी केली. मशाल मोर्चांमधून काँग्रेस राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या अशा अनेक घोटाळ्यांबाबत जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीPoliticsराजकारण