शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

Maharashtra HSC Result 2025: अतिउत्साह अन् खचून जाणे दाेन्ही टाळा, निकालाला शांतपणे सामाेरे जा अन् त्याचा स्वीकार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:22 IST

अपेक्षेच्या विरुद्ध निकाल लागला असेल तर इतरांशी संवाद वाढवा, काही काळ खेळामध्ये गुंतवून घ्या, बारावी म्हणजे सर्व काही नाही

पुणे : बारावीचे वर्ष जीवनातील अतिशय महत्त्वाचे...जीवनाला कलाटणी देणारे...त्यामुळे सर्वस्व पणाला लावून अभ्यासाला लागा...असा विद्यार्थ्यांवर आधीच मारा झालेला. पालकही त्याला अपवाद नाहीत. विद्यार्थ्यांइतकेच पालकही पॅनिक झालेले. हे वर्ष मुलाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे, असे मानून पालकही कामाकडे थाेडे दुर्लक्ष करून मुलांवर फाेकस केलेले, त्यामुळे विद्यार्थ्यांइतकीच पालकांनाही निकालाची उत्सुकता लागलेली. त्याच वेळी धाकधूकदेखील वाढलेली. मानसाेपचार तज्ज्ञ म्हणून मी पालक आणि विद्यार्थी दाेघांनाही एकच सांगेन की, जाे काही निकाल लागेल ताे शांतपणे स्वीकारा. चांगले मार्क मिळाले म्हणून अतिउत्साहात काही करू नका. कमी मार्क पडले म्हणून खचून जाऊ नका, दाेन्ही प्रकारचा मानसिक धक्का स्वत:ला आणि कुटुंबाला धाेका निर्माण करणारा ठरू शकलाे, असा सल्ला ज्येष्ठ मानसाेपचार तज्ज्ञ डाॅ. अमर शिंदे यांनी दिला आहे.

बऱ्याचदा निकालापूर्वीची स्थिती खूप वेगळी असते. अनेक आखाडे बांधलेले असतात. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल लागताे तेव्हा विद्यार्थी आणि पालकांनाही धक्का बसत असताे. मग ताे सुखद असाे की धक्कादायक. दाेन्ही प्रकारचा ताण जीवघेणा ठरू शकताे. त्यामुळे आपण निकालाला कसे सामाेरे जाताे, यावर पुढील सर्व काही अवलंबून आहे. तेव्हा पालक आणि विद्यार्थी दाेघांनीही एक ठरवलं पाहिजे की, जाे काही निकाल लागेल त्याचा सर्वप्रथम शांतपणे स्वीकार करू. अन्यथा अनुचित प्रकार घडण्याचा धाेका अधिक असताे. संभाव्य धाेका टाळण्यासाठी आपण प्रथम वास्तव स्वीकारावे, त्यानंतर त्यावर विचार करून प्रतिक्रिया द्यावी. कमी मार्क पडले म्हणून, सर्व काही संपलं असं हाेत नाही आणि खूप जास्त मार्क पडले म्हणून सर्व जग खुलं झालं, असंही हाेत नाही. यामुळे एखाद्याला मार्क कमी पडले तरी ताे डिप्रेशनमध्ये जाणार नाही. मग ताे वास्तव नाकारणार नाही. शिवाय आई-वडील, नातेवाईक यांच्याशी वाटाघाटी (बार्गेनिंग) करणार नाही, विद्यार्थी आणि पालकांमध्ये हाेणारे संभाव्य आराेप-प्रत्याराेप टळतील, तणावातून मुक्तता मिळेल आणि विद्यार्थी टाेकाचे पाऊल उचलणार नाही.

आत्मविश्वास हरवू नका

समुपदेशक विवेक वेलणकर म्हणाले की, बारावीचा निकाल म्हणजे अंतिम नाही. परिस्थिती खूप बदललेली आहे. यात प्रत्येकाला संधी आहे. त्यामुळे आत्मविश्वास हरवू देऊ नका. विश्वासाने निकालाला सामाेरे जा आणि नवीन वाट शाेधा.

...तर काय कराल?

अपेक्षेच्या विरुद्ध निकाल लागला असेल तर इतरांशी संवाद वाढवा, काही काळ खेळामध्ये गुंतवून घ्या, बारावी म्हणजे सर्व काही नाही, आयुष्यात आणखी खूप काही करण्यासारखे आहे, हे स्वत:ला सांगा आणि समजून घ्या, फारच डिप्रेशन आलं असेल तर मानसाेपचार तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घ्या. हे केवळ विद्यार्थीच नाही, तर पालकांनीही करायचं आहे, असेही डाॅ. अमर शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थीHealthआरोग्यdoctorडॉक्टर