शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांच्या किलबिलाटाने होतेय प्राधिकरण जागे

By admin | Updated: May 16, 2015 04:19 IST

घड्याळाचा गजर वाजला की, शहरातील नागरिकांना उठायची सवय आहे. आजही खेडेगावात कोंबडा आरवला की, गावातील माणसे जागी होतात. मात्र ,

सुवर्णा नवले, पिंपरी घड्याळाचा गजर वाजला की, शहरातील नागरिकांना उठायची सवय आहे. आजही खेडेगावात कोंबडा आरवला की, गावातील माणसे जागी होतात. मात्र , प्राधिकरण परिसरात आजही गेले कित्येक दिवसांपासून पक्ष्यांच्या सुमधुर आवाजाने नागरिकांच्या दिवसाची सुरुवात होत आहे. मात्र, खंत हीच आहे की, एवढ्या मोठ्या शहरात जागेचे सुनियोजन फक्त प्राधिकरण परिसरातच झाले आहे. यामुळेच दुर्मीळ पक्ष्यांचा किलबिलाट नागरिकांना सुखावह आहे व पक्ष्यांचे वास्तव्य टिकून राहिले आहे.पिंगळा, खंड्या ( किंंगफि शर), सुगरण, कोकिळा, रंगीत चिमण्या, पोपट, पारवे, बुलबुल, साळुंकी, मधमाश्या, घुबड आदी पक्ष्यांचे वास्तव्य प्राधिकरणात आहे. प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक २३ व २६मध्ये पक्ष्यांचा किलबिलाट पहाटे सुरू होतो. पहाटे ५ वाजल्यापासून ते ७ वाजेपर्यंत पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतो. एकत्रित समूहाने पक्षी आढळत असल्यामुळे पक्ष्यांचे वेगवेगळे आवाजाचे संगीतच तयार झाले आहे. प्राधिकरणात वृक्षांचे प्रमाण वाढल्यामुळे पक्ष्यांचे वास्तव्य टिकून आहे. मात्र, या पक्ष्यांचे वास्तव्य दीर्घ काळ टिकू न राहावे, यासाठी प्राधिकरण व महापालिकेच्या वतीने पराकाष्ठेची गरज आहे. प्राधिकरणात ५२ उद्याने आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये उद्यानाचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर उद्यान, संत तुकाराम, कबीर, दादा-दादी पार्क, गणेश तलाव, दुर्गादेवी उद्यान, रामबाग आदी विकसित भागांमध्ये उद्याने आहेत. या भागातही पक्ष्यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात जाळीदार वृक्षांमध्ये व फु लांच्या झाडांवर पक्ष्यांनी आपला निवारा केला आहे. चेरीच्या अथवा तुतीच्या वृक्षांवर कोकिळा दिसत आहे. एकाच झाडावर २५ ते ३० घरटी दिसून येत आहेत. तसेच, कोकिळेचा सुमधुर आवाज प्राधिकरणवासीयांच्या कानी पडत आहे. चिमण्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. खडकवासलासारखा पक्षी संवर्धन पॅटर्न पिंपरी-चिंचवड शहरात राबविणे आवश्यक आहे. प्राधिकरण व महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समिती, पर्यावरण समितीने आजपर्यंत पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. एकूण ४० वर्षांच्या कालखंडात प्राधिकरणाच्या १९६६ सालच्या स्थापनेपासून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. नदीपात्रातील अनधिकृत अतिक्रमणे हटविणे, तसेच निळ्या रेषेचा सुयोग्य वापर होणे गरजेचे आहे.