शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

Ashadhi Wari 2025 : पांगुळ झालाे तरी, दणकट माझे बाहू अन् मजबूत दाेन्ही हात..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 16:43 IST

चैतन्याचा झरा म्हणजे वारी... जगण्याचे बळ म्हणजे वारी... शक्ती आणि भक्तीचा संयाेग म्हणजे वारी... याचा प्रत्यय जीवनात आला आणि मी वारकरी झालाे. सुरुवातीस काही वर्षे आषाढी वारीत सहभागी हाेणाऱ्या भाविकांना गंध लावण्याचे काम करीत असे...

 - उद्धव धुमाळे पुणे : चैतन्याचा झरा म्हणजे वारी... जगण्याचे बळ म्हणजे वारी... शक्ती आणि भक्तीचा संयाेग म्हणजे वारी... याचा प्रत्यय जीवनात आला आणि मी वारकरी झालाे. सुरुवातीस काही वर्षे आषाढी वारीत सहभागी हाेणाऱ्या भाविकांना गंध लावण्याचे काम करीत असे... रेल्वे अपघातात दाेन्ही पाय गेले आणि वारी करायची कसं, असा प्रश्न पडला. त्याच क्षणी भक्तिविजय ग्रंथ डाेळ्यासमाेर आला. दाेन हात, दाेन पाय गमावलेले कुर्मदास यांची विठ्ठल भक्ती आठवली. माझ्याकडे तर दणकट बाहू अन् मजबूत दाेन हात आहेत. या विचाराने नवी ऊर्जा मिळाली आणि ढकलगाडा घेऊन वारीत सहभागी झालाे. गेली २७ वर्षे वारी करीत आहे. विशेष म्हणजे परतीची वारीसुद्धा करत आहे.

अंगावर शहारे आणणारे हे बाेल आहेत साेलापूर जिल्ह्यातील म्हाळुंग गावचे वारकरी दीपक जालिंदर माने यांचे. ‘या रे या रे लहान थोर । याति भलते नारीनर, करावा विचार । न लगे चिंता कोणासी’ असा हा वारकरी सांप्रदाय आहे. येथे सर्वांना अधिकार आहे. वारीत सहभागी हाेणाऱ्या प्रत्येकाची काळजी साक्षात पांडुरंग घेत असताे. त्यामुळेच गेली २७ वर्षे मी वारी करू शकलाे. गावी छाेटेशे दुकान आहे. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालताे. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांचे शिक्षण सुरू आहे. मुलीची बारावी झाली आहे. मी वारीत आल्यानंतर कुटुंबाचा संपूर्ण डाेलारा पत्नीच सांभाळते, असे दीपक अभिमानाने सांगत हाेते.अपंगांकडे केवळ दया-करुणेतून न पाहता त्यांच्या ठिकाणी स्वत:ला ठेवून अनुभव मांडणारा हा वारकरी सांप्रदाय आहे. त्यामुळेच दिव्यांगांनाही वारी आपली वाटते. दाेन्ही डाेळ्यांनी अंध असलेले सूरदास महाराज इतक उत्कृष्ट गायचे की, पुढे काेणी चांगलं गात असेल तर काैतुकाने त्याला सूरदास उपाधी दिली जायची, असे डाॅ. सदानंद माेरे यांनी सांगतात. संत तुकाराम महाराज पालखीत सहभागी दीपक माने यांच्याकडे पाहिले की, जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते.

...अन देवच भेटीला आले..!पैठण गावातील कुर्मदास जन्माने पांगळा होते. त्यांना गुडघ्यांपासून पाय आणि कोपरापासून हात नव्हते. देवावर त्यांची गाढ श्रद्धा, भक्ती होती. लहान असल्यापासूनच टाळ-मृदंगाचा आवाज त्यांना स्वस्थ बसून देत नव्हता. गळ्यात माळ, कपाळावर गंध लावून कुर्मदास फरफटत फरफटत भजन, कीर्तनात जाऊन बसत. त्यांना पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागली. एके दिवशी कुर्मदास उठले आणि फरफटत फरफटत पंढरपूरच्या दिशेने निघाले. सकाळ हाेईपर्यंत पुढच्या गावात पोहोचलेही. असे करता करता येरमाळा बार्शी व नंतर लहुळे गाव गाठलं. अन्न-पाण्याविना प्रवास केल्याने अंगात शक्ती उरली नव्हती. प्राण कंठाशी आले होते. सगळे पोट रक्ताने माखले होते त्यात दगडाचे तुकडे काड्या, कचरा गेला होता सगळे अंग खरवडून निघाले होते. अखेर रुख्मिणी वारी तू सांभाळ मी चाललो माझ्या कुर्मदासाला भेटायला, असे म्हणून पांडुरंग स्वत: लहुळे येथे आल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे यावेळी देवासाेबत संत नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराज आले हाेते. त्यामुळे या लहुळे गावाला धाकट पंढरपूर म्हटले जाते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025PandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी