शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या पूजेला यायला हवे होते - दिग्विजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 2:42 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाचे भक्त असतील तर त्यांनी पंढरपूरला पूजेसाठी यायला हवं होतं, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुण्यात व्यक्त केले आहे.

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाचे भक्त असतील तर त्यांनी पंढरपूरला पूजेसाठी यायला हवं होतं, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. मराठा आणि धनगर समाजाच्या नाराजीला स्वतः मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली. दिग्विजय सिंह गेल्या 27 वर्षांपासून दर आषाढीला पंढरपूरला दर्शनासाठी जातात. यंदाही दर्शन घेऊन त्यांनी पुण्यातील पत्रकारांशी बातचीत केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतः ज्या मराठा आणि धनगर आरक्षणाचा सामना करत आहेत. या गोष्टीला ते स्वतः जबाबदार आहे. त्यांनी एका महिन्यात आरक्षण देतो असे सांगितले होते. त्यामुळे त्या समाजांची नाराजी साहजिक आहे. अनेक वर्षांची परंपरा होती की मुख्यमंत्री विठ्ठलाच्या पूजेला उपस्थित राहतात. यंदा मात्र भाजपचा कोणीही मंत्री नव्हता. एवढे का घाबरतात ते लोक असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

(Ashadhi Ekadashi : 'बा विठ्ठला' बळीराजाला सुखी ठेव, मुख्यमंत्र्यांचे वर्षावरुनच साकडे)

यावेळी त्यांनी अविश्वास ठरावावरही आपले मत मांडले. या ठरावावर भाषणे सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारलेल्या मिठीवरही त्यांनी भाष्य केले. मिठी मारणे संसदेच्या परंपरेच्या विरोधात नाही.यापूर्वीही लोकप्रतिनिधी एकमेकांना भेटायचे. हातात हात घेत असत असेही त्यांनी सांगितले. लोकांना काही कारण नसताना अफवा पसरवून मारलं जात आहे मात्र लहान लहान मुद्यांवर ट्विट करणारे पंतप्रधान मोदी यावर काहीही बोलत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेना कायम त्यांच्यासोबत निवडणूक लढवत आली. मात्र नुकत्याच अविश्वास प्रस्तावात त्यांनी भाजपाला मदत केली नाही.त्यांनीही भाजपावर अविश्वास दाखवला असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, भाजपा सरकारला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण त्यांना 125 कोटी भारतीयांचे समर्थन आहे असे नाही. यावेळी त्यांनी भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका केली. या सरकारने 15 लाख कोटी रुपये खात्यात जमा केले तर नाहीच. काळा पैसा परत आणू असेही सांगितले. पण ते आणणे तर लांबच पण भारतीयांचा आहे तो पैसा ही बाहेर गेला. नोटाबंदीनंतर भ्रष्टाचार, दहशतवाद संपेल असा सरकारचा दावा होता. मात्र त्यालाही यश आले नाही. मुख्यमंत्री म्हणून मोदींनी ज्या ज्या गोष्टी नाकारल्या त्यांचा पंतप्रधान झाल्यावर पूर्ण स्वीकार केला. भाजपा हिंदूंमध्ये धर्मांधता पसरवत आहे तर ओवैसी मुस्लिम समाजात धर्मांधता पसरवत आहेत असेही भाष्य त्यांनी केले.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीDigvijaya Singhदिग्विजय सिंहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNo Confidence motionअविश्वास ठरावBJPभाजपाcongressकाँग्रेस