शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

शालेय जीवनापासूनच कलेची मूल्ये रुजवावी : अलारमेल वल्ली; पुण्यात ‘नूपुरनाद महोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 11:49 AM

नूपुरनाद महोत्सवास आजपासून (शनिवार) कोथरूड येथील आयडियल सोसायटी मैदान येथे सुरुवात होत आहे. महोत्सवाचा प्रारंभ अलारमेल वल्ली यांच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराने होणार आहे.

ठळक मुद्दे 'कलेची जाण असणारे आणि संगीताशी नाळ जुळलेले दर्दी रसिक पुण्यातच पाहायला मिळतात''तरुणांमध्ये नृत्यकलेबद्दलचे प्रबोधन करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज'

पुणे : नृत्य आणि संगीत हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. कलात्मक माध्यमं कुठलेही असो, कलेतून रसिक आणि कलाकारांचा एकमेकांशी संवाद घडत असतो. मात्र आज नृत्यातील ‘रसिकत्व’ भाव काहीसा हरवला आहे. युवा पिढीला नृत्याचे कार्यक्रम बोअरिंग वाटतात ही वस्तुस्थिती आहे. नृत्यविषयक जनजागृतीचा अभाव हे याचे प्रमुख कारण आहे. कलेतील गुंतवणूक वाढवायची असेल तर शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये कलेची मूल्य रुजविली गेली पाहिजेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ नृत्यांगना अलारमेल वल्ली यांनी व्यक्त केली. नूपुरनाद महोत्सवास आजपासून (शनिवार) कोथरूड येथील आयडियल सोसायटी मैदान येथे सुरुवात होत आहे. महोत्सवाचा प्रारंभ अलारमेल वल्ली यांच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराने होणार आहे. त्यानिमित्त महोत्सवाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी प्रसिद्ध नृत्यांगना स्वाती दैठणकर आणि नूपुर दैठणकर उपस्थित होते. चेन्नईप्रमाणे पुणे हेदेखील सांस्कृतिक हब बनले आहे. कलेची जाण असणारे आणि संगीताशी नाळ जुळलेले दर्दी रसिक पुण्यातच पाहायला मिळतात, अशा शब्दांत वल्ली यांनी पुण्याविषयी गौरवोद्गार काढले. नृत्य आणि संगीत हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. संगीतामध्ये  रसिक आणि कलाकारांचा एकमेकांशी आंतरिक संवाद घडतो. नृत्यामध्ये साहित्य, निसर्गसौंदर्य, संस्कृती अशा सर्व गोष्टींचा आस्वाद घेता येतो. वेशभूषा, नृत्यशैली, भाव याच्या सादरीकरणातून एका अद्वितीय कलाविष्काराची अनुभूती मिळते. परंतु नृत्यविषयक ज्ञानाच्या अभावामुळे नृत्यकलेमध्ये युवा पिढी फारसा रस घेताना दिसत नाही, तरुणांमध्ये नृत्यकलेबद्दलचे प्रबोधन करण्यासाठी शासन, कलाकार, कॉर्पोरेट आणि पालक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

कलेची कम्युनिटी एकच सध्या देशात अशांतता, असहिष्णुता या गोष्टी पाहायला मिळत आहेत. मात्र कला तू भारतीय, तू पाकिस्तानी अशा स्वरूपाचा धर्म किंवा जातिभेद मानत नाही. कला दोन भाषा आणि प्रांतांत सेतू बांधण्याचे काम करते. कलेची कम्युनिटी एकच आहे, अशा शब्दांत त्यांनी कलेचे महत्त्व विशद केले.

तमिळनाडूमध्येही हा प्रयोग व्हावामहाराष्ट्र शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांना कलेसाठी अतिरिक्त गुण देण्याचा जो निर्णय घेतला त्याचे वल्ली यांनी स्वागत केले. महाराष्ट्राप्रमाणे तमिळनाडू राज्यानेदेखील हा प्रयोग राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कलेमध्ये इन्स्टंट फॉर्म्युला नाहीसध्या पैसा आणि झटपट प्रसिद्धीमुळे रिअँलिटी शोकडे पालकांचा कल वाढत आहे. मात्र कलेमध्ये असा इन्स्टंट फॉर्म्युला नसतो. कलेबद्दल श्रद्धा, साधना आणि भक्ती असणे महत्त्वाचे आहे. कला मन:शांती देते, याकडे वल्ली यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकPuneपुणे