शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Dilip Walse Patil: भाजपवाले सगळेच धुतल्या तांदळासारखे आहेत का? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 16:46 IST

केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून लोकशाहीत भाजपला विरोध करणाऱ्या नेत्यांना अडचणीत आणुन सहकारी संस्था संपविण्याचे काम केंद्र सरकार करत आहे

टाकळी हाजी : केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून लोकशाहीत भाजपला विरोध करणाऱ्या नेत्यांना अडचणीत आणुन सहकारी संस्था संपविण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. भाजपवाले सगळेच धुतल्या तांदळा सारखे आहेत का? त्यांच्यावर का धाडी पडत नाही? असा सवाल राज्यांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला. मलठण ता शिरूर येथे विविध विकास कामांच्या कार्यक्रमाप्रसंगी गृहमंत्री वळसे पाटील उपस्थित होते. या प्रसंगी ते बोलत होते.

वळसे पाटील म्हणाले, काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचा इतिहास पुसण्याचे काम सुरु आहे. जाती धर्मात विष पेरून राजकीय पोळी भाजून घेण्याचे षडयंत्र हे देशासाठी खुप धोकादायक आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टिकेला उत्तर देताना, वळसे पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी या राज्यात सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या राज्यांतील जनतेच्या जीवनात विज, पाणी, धरणे, रस्ते, उदयोगधंदे या माध्यमातून विकास करण्याचे काम शरद पवार यांनी केले. मात्र काही लोक फक्त पवारांचे नाव घेऊन टिका करायची, धर्माधर्मात भांडणे लावण्याचे काम करत आहेत.

अजान सुरु होताचं गृहमंत्र्यांनी थांबवले भाषण...  

मलठण येथे सभेत भाषण सुरु असतानाच अचानक भोंग्या मधून अजानाचा आवाज आला. त्यावेळी वळसे पाटील आता काय करणार याकडे उपस्थितांचे लक्ष होते. मात्र तत्काळ गृहमंत्री वळसे पाटील यांनी भाषण बंद करून शांत उभे राहीले. व अजान संपल्यावर पुन्हा भाषण सुरु केले. यावेळी गृहमंत्री म्हणाले की, प्रत्येक धर्माचा आदर करण्याचे काम सर्वानी केले पाहीजे. हा देश एकसंघ व येथील जनतेची एकात्मता टिकविण्यासाठी अनेक साधुसंत विचारवंत नेते स्वातंत्र्य सैनिक समाज सुधारक यांनी कष्ट केले आहेत. मात्र सध्या जाती धर्मात मतभेद निर्माण करीत विष पेरण्याचे काम काही लोक करत आहेत. हे मोठे दुर्देव असुन याबाबत कार्यकर्त्यांनी जागृती निर्माण केली पाहीजे.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलSocialसामाजिकcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाMNSमनसेSharad Pawarशरद पवार