शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

पुण्यातील नवले ब्रिजजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात; भरधाव ट्रकची सात ते आठ वाहनांना धडक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 15:02 IST

मुंबईच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने सात ते आठ वाहनांना जोरदार धडक दिली.

ठळक मुद्देया अपघातात काहीजण किरकोळ जखमी झाले असून वाहनांचे प्रचंड नुकसान

पुणे (धायरी)  : पुण्यातील नवले ब्रीजजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. मुंबईच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने सात ते आठ वाहनांना जोरदार धडक दिली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात काहीजण किरकोळ जखमी झाले असून वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज बाह्य वळण महामार्गावर एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या वाहनांना धडक दिली. ह्या विचित्र अपघातात एकूण नऊ वाहनांचे नुकसान झाले असून दोनजण  जखमी झाले आहेत.हि घटना बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास नवले पुलाजवळ घडली. ह्याबाबत ट्रकचालकास भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने निघालेला माल ट्रक ( क्रमांक: एमएच.१२ एलटी. ४७५५) दुपारी नवले पुलाजवळील बाबजी पेट्रोल पंपाजवळ आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुढे असणाऱ्या ७ चारचाकी वाहनांना व एका रिक्षाला तसेच एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षाचालक व एक महिला जखमी झाली आहे. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने चारचाकी वाहनांमध्ये असणाऱ्या प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अपघातानंतर काहीवेळ मुंबई -बेंगलोर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नाने ती सुरळीत सुरु झाली होती.

मुंबई - बेंगलोर महामार्गावरील नवले ब्रिज जवळ सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात. तसेच अनेकांना निष्कारण आपला जीव देखील गमवावा लागला आहे. परंतू, तरीदेखील राष्ट्रीय महामार्ग प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर देखील महिन्यात अशाच प्रकारे अपघात झाले होते.

लहान मुले बालंबाल बचावली....

क्रिकेटचा सामना असल्याने लहान मुलांचा संघ क्रिकेट खेळण्यासाठी बालेवाडी स्टेडियम येथे चार चाकी वाहनाने निघाली होती. या अपघातात त्यांच्या वाहनांना जोरदार धडक बसली. मात्र सुदैवाने ह्यात कोणीही जखमी झाले नाही.

यामुळे घडतात नवले ब्रिजजवळ अपघात... नवीन कात्रज बोगदा ते वडगांव पुल दरम्यान तीव्र उतार असल्याने माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचे ब्रेक लागणे अशक्य होते. अशावेळी वाहनांची गती कमी करण्यासाठी महामार्गावर पांढरे पट्टे करणे गरजेचे आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस