शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

संतापजनक ! समाजकंटकांनी जाळली मुलांच्या ‘शिक्षणा’ची झोपडी ; भोरमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 11:11 IST

गावात मोबाईलला नेटवर्क नसल्याने मुलांसाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून ही जागा निर्माण केली होती

ठळक मुद्देग्रामस्थांनी या घटनेचानिषेध केला असून दोषींवर कारवाईची मागणी

पुणे : ऑनलाईन शाळेकरिता गावामध्ये मोबाईलला रेंज येत नसल्याने गावकऱ्यांनी मुलांसाठी गावाबाहेर उभारलेल्या ‘शिक्षणा’ची झोपडी अज्ञात समाजकंटकांनी जाळली. या आगीमध्ये मुलांचे शैक्षणिक साहित्यही जळून गेले असून ही घटना भोर तालुक्यातील नाटंबे या गावामध्ये मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकाराचा ग्रामस्थांनी निषेध केला असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील नाटंबे या गावची लोकसंख्या साधारणपणे 900 च्या आसपास आहे. या गावामध्ये 80 ते 90 मुले शालेय शिक्षण घेत आहेत. कोरोनामुळे मुलांच्या ऑनलाईन शाळा सुरु आहेत. परंतू, गावामध्ये मोबाईलला नेटवर्क नसल्याने ग्रामस्थांनी मुलांच्या नलाईन शाळा सुरळीत सुरु राहाव्यात याकरिता गावापासून एक-दीड किलोमीटर अंतरावर एका उंच ठिकाणावर झोपडी बांधली होती. ऊन-वारा-पावासापासून मुलांचा बचाव होईल आणि मोबाईलला नेटवर्क येईल अशी देवधर-नीरा कालव्याजवळील जागा निवडण्यात आली होती. याठिकाणी बसून मुले अभ्यास करीत होती. मुले याठिकाणी बसूनच आॅनलाईन शिक्षण घेत होती.

     परंतू, मुलांची ही ज्ञानजिज्ञासा काही समाजकंटकांना बघवली नाही. त्यांनी मंगळवारी मध्यरात्री मुलांच्या शिक्षणासाठी बांधलेली ही झोपडीच जाळून टाकली. मंगळवारी सकाळी जेव्हा मुले अभ्यासाकरिता याठिकाणी पोचली तेव्हा त्यांना झोपडी पूर्णपणे जळाल्याचे दिसले. त्यांनी याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. सरपंच शोभा सुनिल खोपडे आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रभाकर जेधे यांच्या अध्यक्षांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मुलांसाठी पुन्हा झोपडी उभारुन देण्याची तयारी ग्रामस्थांनी सुरु केली आहे.शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. शाळांमधून मुलांना शालेय अभ्यासक्रमाचे व्हिडीओ पाठविले जात आहेत. यासोबतच ऑनलाईन तासही घेतले जात आहेत. परंतू, अनेक गावांमध्ये मोबाईलला नेटवर्कच नसल्याने या ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडालेला आहे. परंतू, आपल्या मुलांना शिक्षण घेता यावे याकरिता पालक आणि ग्रामस्थांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. परंतू, काही समाजकंटक मुलांच्या या शिक्षण साधनेत अडथळा निर्माण करीत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.=====मुलांचे शैक्षणिक नुकसान नको म्हणून देवधर-नीरा कालव्याजवळ झोपडी बांधून देण्यात आली होती. मुले या ठिकाणी दिवसभर अभ्यास करुन संध्याकाळी वह्या-पुस्तके तेथेच ठेवून घरी परतत होती. परंतू, कोणीतरी ही झोपडीच पेटवून दिली आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. हा प्रकार निंदनीय आहे. मुलांसाठी आम्ही पुन्हा अभ्यासाची सोय करु. दोषींवर कारवाई व्हायला हवी.- शोभा सुनिल खोपडे, सरपंच=====गावात मोबाईलला नेटवर्क नसल्याने मुलांसाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून ही जागा निर्माण केली होती. परंतू,  ही झोपडी जाळण्यात आल्याने मुलांची अडचणी झाली आहे. तसेच त्यांचे शैक्षणिक साहित्यही जळून गेले आहे. एकीकडे ऑनलाईन शिक्षणातील अडचणी आणि दुसरीकडे ही समस्या यामुळे मुले आणि त्यांचे पालक हवालदील झाले आहेत. येथील नेटवर्कची समस्या प्रशासनाने दूर करावी.- प्रभाकर जेधे, अध्यक्ष, तंटामुक्ती समिती

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीonlineऑनलाइनEducationशिक्षण