शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

संतापजनक ! समाजकंटकांनी जाळली मुलांच्या ‘शिक्षणा’ची झोपडी ; भोरमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 11:11 IST

गावात मोबाईलला नेटवर्क नसल्याने मुलांसाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून ही जागा निर्माण केली होती

ठळक मुद्देग्रामस्थांनी या घटनेचानिषेध केला असून दोषींवर कारवाईची मागणी

पुणे : ऑनलाईन शाळेकरिता गावामध्ये मोबाईलला रेंज येत नसल्याने गावकऱ्यांनी मुलांसाठी गावाबाहेर उभारलेल्या ‘शिक्षणा’ची झोपडी अज्ञात समाजकंटकांनी जाळली. या आगीमध्ये मुलांचे शैक्षणिक साहित्यही जळून गेले असून ही घटना भोर तालुक्यातील नाटंबे या गावामध्ये मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकाराचा ग्रामस्थांनी निषेध केला असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील नाटंबे या गावची लोकसंख्या साधारणपणे 900 च्या आसपास आहे. या गावामध्ये 80 ते 90 मुले शालेय शिक्षण घेत आहेत. कोरोनामुळे मुलांच्या ऑनलाईन शाळा सुरु आहेत. परंतू, गावामध्ये मोबाईलला नेटवर्क नसल्याने ग्रामस्थांनी मुलांच्या नलाईन शाळा सुरळीत सुरु राहाव्यात याकरिता गावापासून एक-दीड किलोमीटर अंतरावर एका उंच ठिकाणावर झोपडी बांधली होती. ऊन-वारा-पावासापासून मुलांचा बचाव होईल आणि मोबाईलला नेटवर्क येईल अशी देवधर-नीरा कालव्याजवळील जागा निवडण्यात आली होती. याठिकाणी बसून मुले अभ्यास करीत होती. मुले याठिकाणी बसूनच आॅनलाईन शिक्षण घेत होती.

     परंतू, मुलांची ही ज्ञानजिज्ञासा काही समाजकंटकांना बघवली नाही. त्यांनी मंगळवारी मध्यरात्री मुलांच्या शिक्षणासाठी बांधलेली ही झोपडीच जाळून टाकली. मंगळवारी सकाळी जेव्हा मुले अभ्यासाकरिता याठिकाणी पोचली तेव्हा त्यांना झोपडी पूर्णपणे जळाल्याचे दिसले. त्यांनी याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. सरपंच शोभा सुनिल खोपडे आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रभाकर जेधे यांच्या अध्यक्षांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मुलांसाठी पुन्हा झोपडी उभारुन देण्याची तयारी ग्रामस्थांनी सुरु केली आहे.शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. शाळांमधून मुलांना शालेय अभ्यासक्रमाचे व्हिडीओ पाठविले जात आहेत. यासोबतच ऑनलाईन तासही घेतले जात आहेत. परंतू, अनेक गावांमध्ये मोबाईलला नेटवर्कच नसल्याने या ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडालेला आहे. परंतू, आपल्या मुलांना शिक्षण घेता यावे याकरिता पालक आणि ग्रामस्थांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. परंतू, काही समाजकंटक मुलांच्या या शिक्षण साधनेत अडथळा निर्माण करीत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.=====मुलांचे शैक्षणिक नुकसान नको म्हणून देवधर-नीरा कालव्याजवळ झोपडी बांधून देण्यात आली होती. मुले या ठिकाणी दिवसभर अभ्यास करुन संध्याकाळी वह्या-पुस्तके तेथेच ठेवून घरी परतत होती. परंतू, कोणीतरी ही झोपडीच पेटवून दिली आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. हा प्रकार निंदनीय आहे. मुलांसाठी आम्ही पुन्हा अभ्यासाची सोय करु. दोषींवर कारवाई व्हायला हवी.- शोभा सुनिल खोपडे, सरपंच=====गावात मोबाईलला नेटवर्क नसल्याने मुलांसाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून ही जागा निर्माण केली होती. परंतू,  ही झोपडी जाळण्यात आल्याने मुलांची अडचणी झाली आहे. तसेच त्यांचे शैक्षणिक साहित्यही जळून गेले आहे. एकीकडे ऑनलाईन शिक्षणातील अडचणी आणि दुसरीकडे ही समस्या यामुळे मुले आणि त्यांचे पालक हवालदील झाले आहेत. येथील नेटवर्कची समस्या प्रशासनाने दूर करावी.- प्रभाकर जेधे, अध्यक्ष, तंटामुक्ती समिती

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीonlineऑनलाइनEducationशिक्षण