शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात पाण्याची बोंब :संतप्त नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 8:29 PM

गेल्या अनेक दिवसांपासून ढासळलेल्या पाणीपुरवठा नियोजनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी थेट महानगरपालिकेवरच मोर्चा काढला.

पुणे : पाटबंधारे विभागाने महापालिकेचे बंद केलेले तीनही  पंप सुरु केले असून, पुरेसा पाणी साठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. परंतु त्यानंतर देखील शहरा-या अनेक भागात नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. यामध्ये वडगावशेरी, लोहगाव, खांदवेनगर भागासह शहारातील अनेक भागात कमी दाबाने पाणी येणे, एक तासा ऐवजी अर्धा तासच पाणी मिळणे, चार घरांना पाणी मिळाले तर पाच घरांना पाणीच नाही असे अनेक प्रकार मंगळवार- बुधवारी देखील झाले. यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी बुधवारी पुन्हा महापालिकेवर मोर्चा काढला व प्रशासनाला जाब विचारला. यावर दस-याच्या मुहूर्तावर संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट केले. 

                   गेल्या अनेक दिवसांपासून ढासळलेल्या पाणीपुरवठा नियोजनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी थेट महानगरपालिकेवरच मोर्चा काढला. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या लोहगाव आणि खांदवे नगर या भागात पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो. त्याच प्रमाणे वडगाव शेरी ते इतर भागात फक्त एक ते दीड तास पाणी येते. कित्येक वेळा स्थानिक नगरसेवक यांच्याकडून आंदोलन करून देखील परिस्थिती बदलत नसल्यामुळे माजी आमदार बापू पठारे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मोर्चा काढण्यात आला. विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुं यांनी यावेळी विद्युत पंप पूर्ण क्षमतेने चालवण्याचे आश्वासन दिले, त्याच प्रमाणे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी येत्या काळामध्ये हा पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने सुरळीत केला जाईल व किमान प्रत्येक भागासाठी दोन तासांपेक्षा जास्त पाणी पुरवण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात दिले. यावेळी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, संजीला पठारे, सुमन पठारे, महेंद्र पठारे, उषा कळमकर, रमेश आढाव, राजेंद्र खांदवे, संदीप मोझे, नाना नलावडे, सुरेश शेजवळ, महेश तांबे, सोमनाथ साबळे, अशोक खांदवे, बंडू खांदवे हे या आंदोलनात सहभागी होते.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी