शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कचरा समस्येवर ‘मोबाईल कचरा प्रकल्पा’ची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:27 IST

पुणे : शहरात रोज जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी प्रक्रिया न होता शिल्लक राहिलेल्या कचऱ्यावर आता मोबाईल कचरा प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया ...

पुणे : शहरात रोज जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी प्रक्रिया न होता शिल्लक राहिलेल्या कचऱ्यावर आता मोबाईल कचरा प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया केली जाणार आहे. रामटेकडी, हडपसर, कात्रजसह चार कचरा रॅम्पवर हे प्रकल्प उभारले जाणार असून या प्रकल्पाची क्षमता १०० ते २०० मेट्रिक टनांची ची असणार आहे. रामटेकडीत साठवून राहिलेल्या कचऱ्याचे निर्मूलन करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी दिली.

शहरात दिवसाला साधारणपणे २१०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. स्वच्छ सेवा संस्थेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांमार्फत हा कचरा गोळा केला जातो. ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो. कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. शहरातील काही कचरा प्रकल्प कमी क्षमतेने सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा साठून राहिलेला आहे. आजमितीस मोठ्या प्रमाणावर कचरा प्रक्रिया न होता शिल्लक राहत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सध्या मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु नसल्याने तसेच काही प्रकल्प बंद असल्याने शहरात कचरा समस्या उद्भवली आहे. नुकताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया केली जात नसल्यामुळे ८० लाख रुपयांचा दंड केला आहे. महापालिकेने अद्याप हा दंड भरलेला नसून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीला उत्तर देण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. आम्ही शहरातून उचललेला कचरा अन्यत्र टाकत नसून कचरा डेपो वरच एकत्र करून ठेवला असला असल्याचे तसेच या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याचे धिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेला दंड मान्य नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, प्रक्रिया न होता पडून राहिलेला कचरा आता या मोबाईल कचरा प्रकल्पांच्या माध्यमातून निर्मूलन करण्यात येणार आहे.

मोबाईल कचरा प्रकल्प म्हणजे ?

रामटेकडी येथील कचरा प्रकल्पावर साठवून ठेवण्यात आलेल्या कचर्‍याचे निर्मूलन मोबाईल कचरा प्रकल्पांच्या मार्फत केले जाणार आहे. त्यासाठी छोटे-छोटे प्लांट उभारले जाणार असून या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. याला मोबाईल कचरा प्रकल्प म्हटले जाते. कचरा पुनर्प्रक्रियेसाठी पाठविला जाणार असून कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या लीचडच्या माध्यमातून लँडफिलिंगचेही काम केले जाणार आहे.