शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

महाविकास आघाडीतून अजित पवार गेल्यामुळे झाडाचे पानही हललेले नाही - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 12:48 IST

चार महिन्यांनी देशातले सरकार बदलणार असून आमची गॅरंटी आहे, महाराष्ट्रात तुम्ही व केंद्रात मोदी नसणार

इंदापूर : महाविकास आघाडीतूनअजित पवार गेल्यामुळे झाडाचे पानही हललेले नाही. एकनाथ शिंदे गेल्यामुळे शिवसेना अधिक मजबूत झाली. अशोक चव्हाण गेल्यामुळे आदर्श टॉवर काही खाली आला नाही, तो तसाच आहे. शिवसेनेमुळे निर्माण झालेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली तरी राम ही मते देणार नाही, असे वातावरण या देशात आहे, असा घणाघात शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी

महाविकास आघाडीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. खा. राऊत म्हणाले की, अजित पवारांशिवाय बारामती किंवा महाराष्ट्र अडलेला नाही; पण जे ‘महाविकास’ला सोडून गेले, त्यांच्या जीवनात व राजकारणात जनता अडथळे आणल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई बारामतीची नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेची, स्वाभिमानाची लढाई आहे. पायाखालची वाळू सरकली की, माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो. समोरचा माणूस घाबरला, पराभवाची भीती वाटू लागली, लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत असे भय वाटू लागले की, मग मोदींचा मार्ग सुरू होतो.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ‘दोन दोन पक्ष फोडून आपण परत आलो,’ अशा आशयाच्या विधानाची ही खा. राऊत यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले की, विकासाची, लोकांची कामे करून मी येथपर्यंत आलो असे लोक सांगतात. मी दोन दोन पक्ष फोडून आलो, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. चार महिन्यांनी देशातले सरकार बदलणार आहे. आमची गॅरंटी आहे, महाराष्ट्रात तुम्ही व केंद्रात मोदी नसणार आहेत. सत्ता आमच्याकडे असेल. ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्या दहशतीवर तुम्ही पक्ष फोडले. ही यंत्रणा आमच्या हातात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हर्षवर्धन पाटलांना मैदानात उतरण्याचे आवाहन

हर्षवर्धन पाटील यांना शांत झोप लागते असे मला वाटत नाही. कारण काही काळापासून पाटील अस्वस्थ आहेत. त्यांच्या मनातील शांतता भाजपने संपवली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा वेळी कोणत्याही मराठी नेत्याने अगर माणसाने शांत झोपू नये. जो शांत झोपला तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे. तुम्ही या मातीतले मराठी माणूस म्हणून सांगायला लायक नाही आहात. मराठी अस्मितेसाठी मैदानात उतरा, असे आवाहन खा. राऊत यांनी हर्षवर्धन पाटील यांना केले.

टॅग्स :PuneपुणेSanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSocialसामाजिक