शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'अपयशाने खचून जाऊ नका...' विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सांगितली महायुतीची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 13:20 IST

लोकसभेच्या वेळी आम्ही विकासावर बोलत होतो, ते सर्व बाजूला ठेवून घटना बदलतील, असा खोटा प्रचार केला गेला

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला अपयश आलं; पण अपयशाने खचून जायचे नसते. कालच्या विधान परिषदेत आपले दोन आमदार निवडून आले. यश पण पचवायला शिकलं पाहिजे. अपयश आलं तरी लोकांसमोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला. त्याचबरोबर आजची सभा राष्ट्रवादीची आहे. मात्र, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेतल्या जातील. महायुती आणि मित्र पक्षांच्या सभा प्रत्येक विभागात, जिल्ह्यात होणार आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभा निवडणुकीची रणनीती सांगितली.

बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान महामेळावा आणि जाहीर सभेत पवार यांनी त्यांची रणनीती सांगितली. तसेच महायुतीच्या माध्यमातूनच राष्ट्रवादी निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. विधानसभेचे मतदान होईपर्यंत राष्ट्रवादीची जनसन्मान रॅली थांबणार नसल्याचे देखील पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महायुती आतापासूनच कामाला लागल्याचे या सभेवरून दिसून आले.

लोकसभा निवडणुकीत सहानभुतीचे राजकारण यशस्वी ठरले. यंदा विधानसभा निवडणुकीत देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहानभुतीचे राजकारण पुन्हा डोकावणार असल्याची शक्यता गृहीत धरून बारामतीकरांना आवाहन केले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोणी भावनिक करत असेल तर भावनिक होऊ नका त्यातून विकास होत नाही. बारामती बघत बघत मला महाराष्ट्र फिरायचे आहे, त्यामुळे हे काम माझ्या घरचे नसून सर्वांचे आहे. असे समजून इथल्या माझ्या लोकांनी जबाबदारी पार पाडायची आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

लोकसभेला वेगळे वातावरण निर्माण झाले. आम्ही विकासावर बोलत होतो, त्या सर्वांना बाजूला ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली ती घटना बदलतील, असा खोटा प्रचार केला गेला. तुमच्या-माझ्या महाराष्ट्रात काम करत असताना महिला, पुरुष, वृद्ध, तरुण, मुलींवर अन्याय होणार नाही, असा शब्दही अजित पवार यांनी यावेळी दिला. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत राज्यघटनेला कोण धक्का लावणार नाही. आता कोण असे गैरसमज निर्माण करत असेल तर त्याला ठासून सांगा, आमचा अजितदादांवर विश्वास आहे, ही आपली भूमिका सर्वांना सांगा, असेही अजित पवार म्हणाले. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी लोकसभेतील अपयशाचे मुद्दे यंदा प्रभावीपणे खोडून काढण्याचा प्रभावी प्रयत्न सुरुवातीपासूनच चालविल्याचे दिसून आले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBaramatiबारामतीMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण