शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

'अपयशाने खचून जाऊ नका...' विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सांगितली महायुतीची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 13:20 IST

लोकसभेच्या वेळी आम्ही विकासावर बोलत होतो, ते सर्व बाजूला ठेवून घटना बदलतील, असा खोटा प्रचार केला गेला

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला अपयश आलं; पण अपयशाने खचून जायचे नसते. कालच्या विधान परिषदेत आपले दोन आमदार निवडून आले. यश पण पचवायला शिकलं पाहिजे. अपयश आलं तरी लोकांसमोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला. त्याचबरोबर आजची सभा राष्ट्रवादीची आहे. मात्र, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेतल्या जातील. महायुती आणि मित्र पक्षांच्या सभा प्रत्येक विभागात, जिल्ह्यात होणार आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभा निवडणुकीची रणनीती सांगितली.

बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान महामेळावा आणि जाहीर सभेत पवार यांनी त्यांची रणनीती सांगितली. तसेच महायुतीच्या माध्यमातूनच राष्ट्रवादी निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. विधानसभेचे मतदान होईपर्यंत राष्ट्रवादीची जनसन्मान रॅली थांबणार नसल्याचे देखील पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महायुती आतापासूनच कामाला लागल्याचे या सभेवरून दिसून आले.

लोकसभा निवडणुकीत सहानभुतीचे राजकारण यशस्वी ठरले. यंदा विधानसभा निवडणुकीत देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहानभुतीचे राजकारण पुन्हा डोकावणार असल्याची शक्यता गृहीत धरून बारामतीकरांना आवाहन केले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोणी भावनिक करत असेल तर भावनिक होऊ नका त्यातून विकास होत नाही. बारामती बघत बघत मला महाराष्ट्र फिरायचे आहे, त्यामुळे हे काम माझ्या घरचे नसून सर्वांचे आहे. असे समजून इथल्या माझ्या लोकांनी जबाबदारी पार पाडायची आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

लोकसभेला वेगळे वातावरण निर्माण झाले. आम्ही विकासावर बोलत होतो, त्या सर्वांना बाजूला ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली ती घटना बदलतील, असा खोटा प्रचार केला गेला. तुमच्या-माझ्या महाराष्ट्रात काम करत असताना महिला, पुरुष, वृद्ध, तरुण, मुलींवर अन्याय होणार नाही, असा शब्दही अजित पवार यांनी यावेळी दिला. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत राज्यघटनेला कोण धक्का लावणार नाही. आता कोण असे गैरसमज निर्माण करत असेल तर त्याला ठासून सांगा, आमचा अजितदादांवर विश्वास आहे, ही आपली भूमिका सर्वांना सांगा, असेही अजित पवार म्हणाले. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी लोकसभेतील अपयशाचे मुद्दे यंदा प्रभावीपणे खोडून काढण्याचा प्रभावी प्रयत्न सुरुवातीपासूनच चालविल्याचे दिसून आले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBaramatiबारामतीMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण