शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

जनआशीर्वाद यात्रेच्या गर्दीवरुन अजित पवार संतापले, केंद्राचेही कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 13:44 IST

गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, प्रशासनाने ज्या जिल्ह्यात कोरोना संक्रमित पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे त्यात प्रो एक्टिव कन्टेंन्मेंटसाठी पाऊल उचलावीत.

ठळक मुद्देआपल्याकडे केरळमध्ये सर्वाधिक कोरोना वाढत आहे. दुसऱ्या लाटेत देशपातळीवर महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्णसंख्या महाराष्ट्रात होती. त्यामुळे, केंद्राने आपल्याला सल्ला दिला आहे. मात्र, दुसरीकडे नवीन 4 मंत्र्यांना कसल्या यात्रा काढायला सांगतात

पुणे : देशभरात एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत असतानाच महाराष्ट्र आणि केरळात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येने चिंता वाढली आहे. वाढता पॉझिटिव्हिटी दर, सक्रीय रुग्ण यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. अचानक वाढणाऱ्या या संख्येमुळे गृह मंत्रालयही चिंतेत आहे. याबाबत गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. आता, या पत्रानंतर राज्यातील जनआशीर्वाद यात्रेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारचे कान टोचले आहेत. 

गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, प्रशासनाने ज्या जिल्ह्यात कोरोना संक्रमित पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे त्यात प्रो एक्टिव कन्टेंन्मेंटसाठी पाऊल उचलावीत. संक्रमण कमी करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. उत्सव, सणांचे दिवस लक्षात घेता गर्दी होण्यापासून आळा घालावा. लोकांची गर्दी रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्ती करा असंही त्यांनी म्हटलं आहे. या पत्राबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, केंद्राने केंद्राचं काम केलंय, आता महाराष्ट्राने आपलं काम करायचंय. केंद्राला काळजी वाटली म्हणून त्यांनी पत्र पाठवलं. आपणही नियम पाळले पाहिजेत, गर्दी टाळली पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यासोबतच, भाजपवर निशाणाही साधला. 

आपल्याकडे केरळमध्ये सर्वाधिक कोरोना वाढत आहे. दुसऱ्या लाटेत देशपातळीवर महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्णसंख्या महाराष्ट्रात होती. त्यामुळे, केंद्राने आपल्याला सल्ला दिला आहे. मात्र, दुसरीकडे नवीन 4 मंत्र्यांना कसल्या यात्रा काढायला सांगतात. आगामी काही दिवसांतच या यात्रेच्या ठिकाणी कोरोनाचा फटका बसलेला दिसेल, अर्थात तिथे कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये या मताचे आम्ही आहोत. पण, उद्या रुग्ण वाढले तर कोण जबाबदार? याचाही विचार केंद्राने करावा, असेही पवार यांनी म्हटले.  

कोरोना नियमांचे पालन करा

आपल्याला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चाचणी, पडताळणी, लसीकरण आणि कोरोना नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. सोशल डिस्टेंसिंग पाळणं, मास्क घालणं, हात धुणे या मार्गदर्शक सूचनांचं पालन लोकांनी करायला हवं असं अजय भल्ला यांनी पत्रात म्हटलं आहे. तर दुसरीकडे परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरलीधरन यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन केरळ सरकारवर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या