शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांमधील हवाई अंतर राहणार कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 20:50 IST

दोन साखर कारखान्यांमध्ये असलेले हवाई अंतराची अट कायम असणे ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने हीतावह असल्याचा अहवाल काही राज्यांनी दिला असल्याने दोन कारखान्यांमधील अंतर कायम राहणार आहे

पुणे : दोन साखर कारखान्यांमध्ये असलेले हवाई अंतराची अट कायम असणे ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने हीतावह असल्याचा अहवाल काही राज्यांनी दिला असल्याने दोन कारखान्यांमधील अंतर कायम राहणार आहे. साखर आयुक्तालयाकडून तसा अहवाल राज्य सरकारला लवकरच पाठविला जाणार आहे. 

देशात मुक्त बाजारपेठ असून, त्याचा फायदा ऊस व्यापाराला देखील मिळाला पाहीजे. त्यामुळे स्पर्धात्मकता वाढून उसाला चांगला भाव मिळेल. म्हणून, दोन साखर कारखान्यांमधील असलेली हवाई अंतराची अट रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तालयाला अहवाल देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून, अहवालाचा मसूदाही तयार झाला आहे. त्यात हवाई अंतराची अट कायम ठेवावी या निष्कर्षा पर्यंत आयुक्तालय पोहचले आहे. 

देशात दोन साखर कारखान्यांमध्ये १५ किलोमीटर हवाई अंतराची अट आहे. राज्यात हे अंतर २५ किलोमीटर इतके आहे. म्हणजेच राज्यात २५किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर दुसरा कारखाना सुरु करता येत नाही. कमी अंतरामध्ये अधिक कारखाने असल्यास दोन्ही कारखान्यांना गाळपासाठी कमी ऊस उपलब्ध होईल. त्यामुळे दोनही कारखान्यांचे आर्थिक व्यवस्थापन कोलमडेल. अंतिमत: ऊस उत्पादकांचे नुकसान होईल, असा उद्देश अंतराच्या नियमामागे  आहे. 

याबाबत माहिती देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अ‍ॅड. योगेश पांडे म्हणाले, हवाई अंतर रद्द केल्यास साखर कारखान्यांमध्ये स्पर्धात्मकता निर्माण होईल. त्यामुळे उसाला चांगले भाव मिळतील. तसेच, चांगले व्यवस्थापन असलेला कारखाना निवडण्याचा अधिकार देखील शेतकºयांना मिळेल. मुक्त बाजारपेठेचा पुरस्कार करीत असताना त्याला उसाचा अपवाद असू नये. उसापासून साखरेबरोबरच मळी, अल्कहोल, बगॅस असे उपपदार्थ मिळतात. हा लोण्याचा गोळा प्रत्येक राजकारण्यांना हवा आहे. त्यामुळे हवाई अंतर रद्द करण्याची आमची मागणी मान्य होणार नाही. 

शेखर गायकवाड, साखर आयुक्त :

दोन कारखान्यांमधील हवाई अंतराची अट कायम असावी की नसावी याबाबत हरयाणा, तेलंगणा आंध्रप्रदेशासह काही ऊस उत्पादक राज्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यात सर्वांनीच हवाई अंतर कायम असणे शेतकºयांच्या हीताचे असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार अहवालाचा मसूदा तयार करण्यात आला आहे. लवकरच अहवाल पाठविला जाईल.  

योगेश पांडे, प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना :

हवाई अंतराबरोबरच उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) अट देखील काढून टाकली पाहीजे. इतर उद्योगांप्रमाणे स्पर्धात्मक दर ठेवण्यास आमची हरकत नाही. उलट स्पर्धेमुळे उसाला चांगला भाव मिळेल. चांगले व्यवस्थापन करणारे कारखानेच टिकतील. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी