शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांमधील हवाई अंतर राहणार कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 20:50 IST

दोन साखर कारखान्यांमध्ये असलेले हवाई अंतराची अट कायम असणे ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने हीतावह असल्याचा अहवाल काही राज्यांनी दिला असल्याने दोन कारखान्यांमधील अंतर कायम राहणार आहे

पुणे : दोन साखर कारखान्यांमध्ये असलेले हवाई अंतराची अट कायम असणे ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने हीतावह असल्याचा अहवाल काही राज्यांनी दिला असल्याने दोन कारखान्यांमधील अंतर कायम राहणार आहे. साखर आयुक्तालयाकडून तसा अहवाल राज्य सरकारला लवकरच पाठविला जाणार आहे. 

देशात मुक्त बाजारपेठ असून, त्याचा फायदा ऊस व्यापाराला देखील मिळाला पाहीजे. त्यामुळे स्पर्धात्मकता वाढून उसाला चांगला भाव मिळेल. म्हणून, दोन साखर कारखान्यांमधील असलेली हवाई अंतराची अट रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तालयाला अहवाल देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून, अहवालाचा मसूदाही तयार झाला आहे. त्यात हवाई अंतराची अट कायम ठेवावी या निष्कर्षा पर्यंत आयुक्तालय पोहचले आहे. 

देशात दोन साखर कारखान्यांमध्ये १५ किलोमीटर हवाई अंतराची अट आहे. राज्यात हे अंतर २५ किलोमीटर इतके आहे. म्हणजेच राज्यात २५किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर दुसरा कारखाना सुरु करता येत नाही. कमी अंतरामध्ये अधिक कारखाने असल्यास दोन्ही कारखान्यांना गाळपासाठी कमी ऊस उपलब्ध होईल. त्यामुळे दोनही कारखान्यांचे आर्थिक व्यवस्थापन कोलमडेल. अंतिमत: ऊस उत्पादकांचे नुकसान होईल, असा उद्देश अंतराच्या नियमामागे  आहे. 

याबाबत माहिती देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अ‍ॅड. योगेश पांडे म्हणाले, हवाई अंतर रद्द केल्यास साखर कारखान्यांमध्ये स्पर्धात्मकता निर्माण होईल. त्यामुळे उसाला चांगले भाव मिळतील. तसेच, चांगले व्यवस्थापन असलेला कारखाना निवडण्याचा अधिकार देखील शेतकºयांना मिळेल. मुक्त बाजारपेठेचा पुरस्कार करीत असताना त्याला उसाचा अपवाद असू नये. उसापासून साखरेबरोबरच मळी, अल्कहोल, बगॅस असे उपपदार्थ मिळतात. हा लोण्याचा गोळा प्रत्येक राजकारण्यांना हवा आहे. त्यामुळे हवाई अंतर रद्द करण्याची आमची मागणी मान्य होणार नाही. 

शेखर गायकवाड, साखर आयुक्त :

दोन कारखान्यांमधील हवाई अंतराची अट कायम असावी की नसावी याबाबत हरयाणा, तेलंगणा आंध्रप्रदेशासह काही ऊस उत्पादक राज्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यात सर्वांनीच हवाई अंतर कायम असणे शेतकºयांच्या हीताचे असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार अहवालाचा मसूदा तयार करण्यात आला आहे. लवकरच अहवाल पाठविला जाईल.  

योगेश पांडे, प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना :

हवाई अंतराबरोबरच उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) अट देखील काढून टाकली पाहीजे. इतर उद्योगांप्रमाणे स्पर्धात्मक दर ठेवण्यास आमची हरकत नाही. उलट स्पर्धेमुळे उसाला चांगला भाव मिळेल. चांगले व्यवस्थापन करणारे कारखानेच टिकतील. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी